शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

कोल्हापूर जिल्हयात दोन वर्षात हजाराहून अधिक किलोमीटरचे अतिक्रमीत रस्ते मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 4:54 PM

गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण, बंद झालेले पाणंदरस्ते तसेच शेतरस्ते, शिवाररस्ते मोकळे करुन देण्याची विशेष मोहिम प्रशासनाने हाती घेतली असून गेल्या दोन वर्षात जिल्हयात १ हजार ४४ किलोमीटर लांबीच्या ८७७ रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची माहिती जिल्हयात महाराजस्व अभियान गतीमान गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित, बंद झालेले पानंद-शेत रस्ते मोकळे करण्यावर भर

कोल्हापूर, दि. ०७ :  गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण, बंद झालेले पाणंदरस्ते तसेच शेतरस्ते, शिवाररस्ते मोकळे करुन देण्याची विशेष मोहिम प्रशासनाने हाती घेतली असून गेल्या दोन वर्षात जिल्हयात १ हजार ४४ किलोमीटर लांबीच्या ८७७ रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.

जनतेचे दैनंदिन प्रश्न आणि समस्यांची गावातच सोडविण्याच्यादृष्टीने जिल्हयात महाराजस्व अभियान गतीमान केले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले की, महाराजस्व अभियांनाच्या माध्यमातून महसूल प्रशासन अधिक पारदर्शी, लोकाभिमुख आणि गतीमान करण्यावर भर दिला असून या अभियानातून गावागावात शिबिरांचे आयोजन करुन जनतेला लागणारे दाखले, प्रमाणपत्रे यासह अन्य अनेकविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, यामध्ये प्रामुख्याने गाव नकाशा प्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले पानंद व शेत रस्ते मोकळे करण्यावर भर दिला गेला.

गेल्या दोन वर्षात म्हणजे सन 2015-2016 तसेच सन 2016-2017 या दोन वर्षात जिल्हयात 1 हजार 44 किलोमीटर लांबीच्या 877 रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून जनतेसाठी रस्ते मोकळे करुन देण्यात आले आहेत.

यामध्ये करवीर तालुक्यात 219.04 कि.मी. लांबीचे 225 रस्ते, गगनबावडा तालुक्यात 26.50 कि.मी. लांबीचे 22 रस्ते, पन्हाळा तालुक्यात 91.10 कि.मी. लांबीचे 68 रस्ते, शाहुवाडी तालुक्यात 18.52 कि.मी. लांबीचे 21 रस्ते, हातकणंगले तालुक्यात 62 कि.मी. लांबीचे 53 रस्ते, शिरोळ तालुक्यात 21.85 कि.मी. लांबीचे 22 रस्ते, राधानगरी तालुक्यात 83.20 कि.मी. लांबीचे 57 रस्ते, कागल तालुक्यात 91.90 कि.मी. लांबीचे 65 रस्ते, भुदरगड तालुक्यात 58.50 कि.मी. लांबीचे 53 रस्ते, आजरा तालुक्यात 75.21 कि.मी. लांबीचे 57 रस्ते, गडहिंग्जल तालुक्यात 156.91 कि.मी. लांबीचे 91 रस्ते आणि चंदगड तालुक्यातील 138.90 कि.मी. लांबीचे 143 रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून ते मोकळे करण्यात आले आहेत. यापुढेही ही मोहिम गतीमान करण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचेही जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad safetyरस्ते सुरक्षा