शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’प्रश्नी ‘स्वाभिमानी’ पुन्हा आक्रमक, मंत्र्यांची दालने सजवायला पैसे कसे येतात?; राजू शेट्टींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 12:01 IST

मोर्चा नंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार

कोल्हापूर : एफआरपीचा दोनशे रुपयांचा दुसरा हप्ता लवकर मिळावा. वीज जोडण्या तोडण्याची कारवाई त्वरित थांबवा, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकरी दि.१४ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडक देणार आहेत. त्या दिवशी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याच्या निर्णयाची महाविकास आघाडी सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी. या रकमेतून वीज बिलाची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. बिंदू चौकातून मोर्चाला सुरुवात होईल. त्यात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होतील. एफआरपी वाढली असली, तरी खत, इंधन दरवाढ आणि उत्पादन खर्च पाहता गेल्या तीन वर्षांपूर्वी इतकीच एफआरपी सध्या मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण होत आहे. त्यामुळे दोनशे रुपयांचा दुसरा हप्ता लवकर मिळावा.कोल्हापूर जिल्ह्यातील वीज बिल वसुली चांगली आणि वीज गळती, चोरी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. तरीही थकबाकीचा मुद्दा पुढे करून येथील शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडण्याची कारवाई महावितरण करत आहे. ते थांबविण्यात यावे. दोन तास वीज वाढवून द्यावी. वीजदर कमी करावा. भूमी अधिग्रहण कायद्यातील नव्या दुरुस्तीमुळे शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला ७० टक्क्यांनी कमी होणार आहे. ते अन्यायकारक असून, पूर्वीप्रमाणे मोबादला मिळावा. महापुरात बुडालेला ऊस तोडण्यास टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांना ऊसतोडणीची सूचना द्यावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे माजी खासदार शेट्टी यांनी सांगितले. यावेळी प्रा. जालिंदर पाटील, वैभव कांबळे, अनिल मादनाईक, राजेंद्र गड्ड्यानवार आदींची उपस्थिती होती.

मंत्र्यांची दालने सजवायला पैसे कसे येतात?

वीज बिल थकबाकीमुळे राज्य अंधारात जाईल, असे ऊर्जामंत्री सांगत आहेत. मला, त्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे की, अशी स्थिती राज्यात असेल, तर मंत्र्यांची दालने सजवायला, नवीन वाहने घ्यायला पैसे कसे येतात? शेतकऱ्यांची अशी किती थकबाकी आहे. त्यांना देय असणाऱ्यांना ५० हजार रुपयांतून वीज बिलाची रक्कम घ्यावी. ही रक्कम देतो असे केवळ उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात; पण देतही नाहीत. त्यांना या अर्थसंकल्पात हे पैसे देण्याची तरतूद करावी; अन्यथा मंत्र्यांना ग्रामीण भागात फिरू देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

पालकमंत्री कुठे गायब?

वीज दरवाढीच्या आंदोलनात पालकमंत्री सतेज पाटील माझ्या खांद्याला खांदा लावून लढत होते. मात्र, आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडण्याची महावितरणकडून कारवाई होताना पालकमंत्री पाटील कुठे गायब आहेत, अशी विचारणा शेट्टी यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टी