शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

‘एफआरपी’प्रश्नी ‘स्वाभिमानी’ पुन्हा आक्रमक, मंत्र्यांची दालने सजवायला पैसे कसे येतात?; राजू शेट्टींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 12:01 IST

मोर्चा नंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार

कोल्हापूर : एफआरपीचा दोनशे रुपयांचा दुसरा हप्ता लवकर मिळावा. वीज जोडण्या तोडण्याची कारवाई त्वरित थांबवा, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकरी दि.१४ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडक देणार आहेत. त्या दिवशी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याच्या निर्णयाची महाविकास आघाडी सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी. या रकमेतून वीज बिलाची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. बिंदू चौकातून मोर्चाला सुरुवात होईल. त्यात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होतील. एफआरपी वाढली असली, तरी खत, इंधन दरवाढ आणि उत्पादन खर्च पाहता गेल्या तीन वर्षांपूर्वी इतकीच एफआरपी सध्या मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण होत आहे. त्यामुळे दोनशे रुपयांचा दुसरा हप्ता लवकर मिळावा.कोल्हापूर जिल्ह्यातील वीज बिल वसुली चांगली आणि वीज गळती, चोरी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. तरीही थकबाकीचा मुद्दा पुढे करून येथील शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडण्याची कारवाई महावितरण करत आहे. ते थांबविण्यात यावे. दोन तास वीज वाढवून द्यावी. वीजदर कमी करावा. भूमी अधिग्रहण कायद्यातील नव्या दुरुस्तीमुळे शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला ७० टक्क्यांनी कमी होणार आहे. ते अन्यायकारक असून, पूर्वीप्रमाणे मोबादला मिळावा. महापुरात बुडालेला ऊस तोडण्यास टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांना ऊसतोडणीची सूचना द्यावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे माजी खासदार शेट्टी यांनी सांगितले. यावेळी प्रा. जालिंदर पाटील, वैभव कांबळे, अनिल मादनाईक, राजेंद्र गड्ड्यानवार आदींची उपस्थिती होती.

मंत्र्यांची दालने सजवायला पैसे कसे येतात?

वीज बिल थकबाकीमुळे राज्य अंधारात जाईल, असे ऊर्जामंत्री सांगत आहेत. मला, त्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे की, अशी स्थिती राज्यात असेल, तर मंत्र्यांची दालने सजवायला, नवीन वाहने घ्यायला पैसे कसे येतात? शेतकऱ्यांची अशी किती थकबाकी आहे. त्यांना देय असणाऱ्यांना ५० हजार रुपयांतून वीज बिलाची रक्कम घ्यावी. ही रक्कम देतो असे केवळ उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात; पण देतही नाहीत. त्यांना या अर्थसंकल्पात हे पैसे देण्याची तरतूद करावी; अन्यथा मंत्र्यांना ग्रामीण भागात फिरू देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

पालकमंत्री कुठे गायब?

वीज दरवाढीच्या आंदोलनात पालकमंत्री सतेज पाटील माझ्या खांद्याला खांदा लावून लढत होते. मात्र, आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडण्याची महावितरणकडून कारवाई होताना पालकमंत्री पाटील कुठे गायब आहेत, अशी विचारणा शेट्टी यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टी