शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
3
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
4
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
5
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
6
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
7
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
8
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
9
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
10
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
11
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
12
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
13
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
14
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
15
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
16
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
17
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
18
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
19
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
20
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

छोटे पक्ष संपविण्याचा मोदी सरकारचा कट : जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 12:00 IST

मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच विजय मिळणार

कोल्हापूर : ‘एक देश एक निवडणुका’ या केंद्र सरकारच्या धोरणातून प्रादेशिक आणि छोटे पक्ष संपविण्याचा मोदी सरकारचा कट आहे. त्यामुळे हे केंद्रातील सरकार उलथून टाकण्यासाठी प्रागतिक पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेत असून त्याला साथ द्या, असे आवाहन शेकापचे राज्य सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी केले.कोल्हापुरात महासैनिक दरबार हॉल येथे प्रागतिक पक्षांच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शेकापचे माजी आमदार संपतराव पवार होते. स्वाभिमानी पक्षाचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते.आमदार जयंत पाटील म्हणाले, दोन वर्षांपूर्वीच आम्ही १३ राजकीय पक्षांचा समावेश असलेल्या एकत्रित प्रागतिक पक्षाची स्थापना केली आहे. राजकीय पक्षांचा विचार आणि बांधिलकीशी बांधील असलेल्या भूमिकेवरून इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला असला तरी ही तिसरी आघाडी नाही. ‘भाजप हटाव, मोदी हटाव’ या समान भूमिकेसाठी सर्व जण एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात प्रादेशिक आणि छोट्या पक्षांची मदत सत्तास्थापनेत घ्यावीच लागेल; परंतु, भाजपसारखा पक्ष सत्तेत येणार नाही, याची काळजी घेऊ.राजू शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडीतही छोट्या पक्षांचा समावेश होता. पण, चळवळीतील नेत्यांकडे दुर्लक्ष झाले. म्हणून त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी प्रागतिक पक्षांची गरज निर्माण झाली आहे. काळाच्या ओघात नष्ट झालेल्या चळवळीतील अनेक नेत्यांना इतर राजकीय पक्षांनी वाचवले असते तर हे लोकशाहीचे धिंडवडे निघाले नसते. यापुढे तरी चळवळी टिकल्या पाहिजेत त्यासाठी सहकार्य करा. इंडियाची भूमिकाही एनडीएसारखीच असेल तर ते प्रागतिक पक्षांना चालणार का? यावर विचार करून पाठिंब्याचा निर्णय घ्यावा, असेही शेट्टी यांनी सूचित केले.संपतराव पवार म्हणाले, प्रागतिक पक्ष हा समविचारी राजकीय पक्षांना बांधून ठेवणारा पक्ष आहे. याचा समुद्र होईल, तो खवळल्यानंतर देशाचे चित्र बदलेल. प्रारंभी लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मान्यवरांनी अभिवादन केले. बाबासाहेब देवकर यांनी स्वागत केले. गिरीश फोंडे यांनी प्रास्तविक केले. डॉ. सुभाष जाधव, रेहाना शेख, माणिक अवघडे, सतीशचंद्र कांबळे, प्रा. विनाेदसिंह पाटील, रामचंद्र कांबळे, राजूू देसले, प्रताप होगाडे, डॉ. जालंदर पाटील, अतुल दिघे, संपत देसाई, उदय नारकर यांनी मनोगत व्यक्त केले. वसंतराव पाटील यांनी आभार मानले. संभाजी जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले.पक्ष छोटे, पण विचाराने पक्के

प्रागतिक पक्षांकडून राजू शेट्टी आणि मी इंडियाच्या बैठकीत सहभागी झालो होतो. राहुल गांधी यांनी आवर्जून आमची भेट घेतली. आमचे पक्ष छोटे आहेत, असे त्यांना सांगताच त्यांनी पक्ष छोटे असतील, मते कमी असतील परंतु जी असतील ती पक्की असतील, विचार पक्का असेल, असे सांगितले. त्यांच्या या भूमिकेेमुळे आम्ही भारावून गेलो, असे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

मराठ्यांना आरक्षण मिळण्याचा अधिकारसरकार खरेदी करो अथवा ना करो, किमान हमीभावाचा कायदा संसदेत मंजूर होण्याची गरज आहे, असे राजू शेट्टी आपल्या भाषणात म्हणाले, बहुतांश मराठे शेती करणारे आहेत, ते नोकऱ्यांपासून वंचित आहेत, म्हणून त्यांना आरक्षण मिळण्याचा अधिकार आहे, असेही ते म्हणाले. जालन्यातील लाठीमार हा मूळ विषयांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी होता, असेही ते म्हणाले.

आरक्षण आणि काँग्रेसओबीसीतून मराठा आरक्षण देण्याची मागणी होत आहे. या स्थितीला काँग्रेसही दोषी आहे. आता इंडियासोबत आमची आघाडी असल्यामुळे याविषयी हळुवारपणे बोलतो, असे जयंत पाटील म्हणाले. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ५० टक्क्यांची गरजच काय, विशेष अधिवेशन बोलवा आणि कायद्यात बदल करा, असे ते म्हणाले.

मुंबईत उद्धवच जिंकणारमुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच विजय मिळणार, खोकेवाले भविष्यात पुन्हा आमदार म्हणून दिसणार नाहीत, असे जयंत पाटील म्हणाले.

राजू शेट्टी भावी खासदारकोणी काही म्हणोत, पण राजू शेट्टी आज जरी माजी खासदार असले तरी ते भावी खासदारच असतील, असे सांगून जयंत पाटील म्हणाले. शेतकऱ्यांच्या हिताच्या कायद्यांना संरक्षण मिळावे, हीच भूमिका असेल. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत