शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Kolhapur- गिरीष फोंडे निलंबन प्रकरण: सतेज पाटील, राजू शेट्टींची सरकारवर जोरदार टीका, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:42 IST

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील सहायक शिक्षक गिरीष आनंदा फोंडे यांना शुक्रवारी प्रशासनाने तडकाफडकी निलंबित केले. कोल्हापूर जिल्ह्यात ...

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील सहायक शिक्षक गिरीष आनंदा फोंडे यांना शुक्रवारी प्रशासनाने तडकाफडकी निलंबित केले. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात फोंडे यांनी जनआंदोलन उभे केले आहे. फोंडे यांचा आवाज बंद करण्यासाठी सरकारने सूडबुद्धीने केलेली ही कारवाई म्हणजे हुकूमशाहीचे लक्षण आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे  विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली. कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासकांनी कोणताही खुलासा न घेता फोंडे यांच्यावर कारवाई केली. त्यामुळे कोल्हापुरातील लोक हे जर्मनी व इटलीतील निरंकुश हुकूमशाही अनुभवत असल्याची भावना आमदार पाटील यांनी व्यक्त केली. गिरीश फोंडे यांनी यापूर्वी शिवाजी विद्यापीठापासून ते जगातील कानाकोपऱ्यात विद्यार्थी युवक चळवळीचे नेतृत्व केले आहे. पन्नासहून अधिक गावांमध्ये त्यांनी दारूबंदी केली आहे. शाळा वाचवण्यासाठी व विद्यार्थी, शिक्षकांच्या हक्कासाठी ते अग्रेसर राहिले आहेत.पर्यावरण चळवळीत सक्रिय आहेत. जातीअंतासाठी त्यांनी आंतरजातीय चळवळ उभी केली आहे. अशा व्यक्तीविरोधात सरकार सूड बुद्धीने कारवाई करत असेल तर ते निषेधार्थ आहे. अशा कितीही कारवाया केल्या तरी जनतेच्या मनातील आवाज सरकारला बंद करता येणार नाही. कोल्हापूरची जनता फोंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून ही लढाई लढेल, अशा शब्दात आमदार पाटील यांनी फोंडे यांच्यावर झालेल्या कारवाईचा जाहीर निषेध केला.

चळवळ मोडण्याचा प्रयत्न : राजू शेट्टीगिरीष फोंडे यांच्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्याला सरकारच्या विरोधात बोलले म्हणून निलंबित केले जाते. यावरून राज्याच्या राजकारणाची पातळी किती घसरली आहे, हे दिसते. फोंडेंना निलंबित करून चळवळ मोडण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांचा असून सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर सामान्य माणूस त्यांना भर चौकात तुडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकातून दिला.शेट्टी म्हणाले, सरकारच्या विरोधात बाेलले म्हणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फोंडे यांची सहायक शिक्षक पदावरून तडकाफडकी निलंबन केले. राज्यकर्ते किती षंड झालेले आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात राज्यकर्त्यांनी अशा पद्धतीने चळवळी संपविण्यासाठीच काम त्यांनी केले तर आम्ही त्याविरोधात लढत राहू. सत्तेच्या जीवावर अतिरेक करून ज्या भानगडी व कारनामे करत आहात, हे जनतेला माहिती आहे. शक्तिपीठ महामार्गातून ५० हजार कोटी हाणण्याचा डाव राज्यकर्त्यांचा आहे. त्यांची सत्ता जाईल, त्यावेळी हीच जनता भर चौकात पायाखाली तुडवायला मागे-पुढे बघणार नाही, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलRaju Shettyराजू शेट्टी