शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

Kolhapur- गिरीष फोंडे निलंबन प्रकरण: सतेज पाटील, राजू शेट्टींची सरकारवर जोरदार टीका, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:42 IST

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील सहायक शिक्षक गिरीष आनंदा फोंडे यांना शुक्रवारी प्रशासनाने तडकाफडकी निलंबित केले. कोल्हापूर जिल्ह्यात ...

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील सहायक शिक्षक गिरीष आनंदा फोंडे यांना शुक्रवारी प्रशासनाने तडकाफडकी निलंबित केले. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात फोंडे यांनी जनआंदोलन उभे केले आहे. फोंडे यांचा आवाज बंद करण्यासाठी सरकारने सूडबुद्धीने केलेली ही कारवाई म्हणजे हुकूमशाहीचे लक्षण आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे  विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली. कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासकांनी कोणताही खुलासा न घेता फोंडे यांच्यावर कारवाई केली. त्यामुळे कोल्हापुरातील लोक हे जर्मनी व इटलीतील निरंकुश हुकूमशाही अनुभवत असल्याची भावना आमदार पाटील यांनी व्यक्त केली. गिरीश फोंडे यांनी यापूर्वी शिवाजी विद्यापीठापासून ते जगातील कानाकोपऱ्यात विद्यार्थी युवक चळवळीचे नेतृत्व केले आहे. पन्नासहून अधिक गावांमध्ये त्यांनी दारूबंदी केली आहे. शाळा वाचवण्यासाठी व विद्यार्थी, शिक्षकांच्या हक्कासाठी ते अग्रेसर राहिले आहेत.पर्यावरण चळवळीत सक्रिय आहेत. जातीअंतासाठी त्यांनी आंतरजातीय चळवळ उभी केली आहे. अशा व्यक्तीविरोधात सरकार सूड बुद्धीने कारवाई करत असेल तर ते निषेधार्थ आहे. अशा कितीही कारवाया केल्या तरी जनतेच्या मनातील आवाज सरकारला बंद करता येणार नाही. कोल्हापूरची जनता फोंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून ही लढाई लढेल, अशा शब्दात आमदार पाटील यांनी फोंडे यांच्यावर झालेल्या कारवाईचा जाहीर निषेध केला.

चळवळ मोडण्याचा प्रयत्न : राजू शेट्टीगिरीष फोंडे यांच्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्याला सरकारच्या विरोधात बोलले म्हणून निलंबित केले जाते. यावरून राज्याच्या राजकारणाची पातळी किती घसरली आहे, हे दिसते. फोंडेंना निलंबित करून चळवळ मोडण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांचा असून सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर सामान्य माणूस त्यांना भर चौकात तुडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकातून दिला.शेट्टी म्हणाले, सरकारच्या विरोधात बाेलले म्हणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फोंडे यांची सहायक शिक्षक पदावरून तडकाफडकी निलंबन केले. राज्यकर्ते किती षंड झालेले आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात राज्यकर्त्यांनी अशा पद्धतीने चळवळी संपविण्यासाठीच काम त्यांनी केले तर आम्ही त्याविरोधात लढत राहू. सत्तेच्या जीवावर अतिरेक करून ज्या भानगडी व कारनामे करत आहात, हे जनतेला माहिती आहे. शक्तिपीठ महामार्गातून ५० हजार कोटी हाणण्याचा डाव राज्यकर्त्यांचा आहे. त्यांची सत्ता जाईल, त्यावेळी हीच जनता भर चौकात पायाखाली तुडवायला मागे-पुढे बघणार नाही, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलRaju Shettyराजू शेट्टी