शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

कृषी पंप वीज दरवाढीबाबत सतेज पाटलांनी विचारला जाब; ऊर्जामंत्री फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले..

By विश्वास पाटील | Updated: March 11, 2023 16:07 IST

शेतकऱ्यांवर, सर्वसामान्य माणसांवर याचा बोजा पडणार

कोल्हापूर : कृषी पंपाच्या वीज बिलात कोणतीही वाढ केली जाणार नसल्याचे स्पष्ट आश्वासन ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले. काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी त्या संदर्भात सभागृहात नियम ९३ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडून चर्चा उपस्थित केली.आमदार पाटील म्हणाले, महावितरणने ६७ हजार कोटींची वीज दरवाढ आयोगाकडे मागितली आहे. ती २.५५ पैसे प्रती युनिट आहे. साधारणपणे ११ व १४ टक्के वीज दरवाढ सांगितली जात असली तरी ती प्रत्यक्षात ३७ टक्के आहे. शेतकऱ्यांवर, सर्वसामान्य माणसांवर याचा बोजा पडणार आहे. आयोगाची स्थापना झाल्यापासून एवढी वीज दरवाढ महावितरणने मागितली नव्हती. अनेक न्यायालयीन प्राधिकरणाचे निर्णय आहेत, कुठलीही दरवाढ दहा टक्क्यांपेक्षा अधिक नसावी. मात्र, ती ३७ टक्के इतकी आहे. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा केला जातो, याचे भांडवल केले जाते. पण राज्यातील वीजचोरी, वीजगळती किती आहे याबाबत चर्चा होत नाही. देशात सर्वाधिक वीजदर महाराष्ट्रात आहे, हे दुर्दैवाने सांगावे लागते. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देणार आणि वीज दरवाढीमुळे एक एप्रिलनंतर पुन्हा ते सरकार काढून घेणार, असे त्यांनी सरकारला सुनावले.ऊर्जामंत्री फडणवीस म्हणाले, वीजदरवाढीबद्दल जे मांडले जाते आहे, प्रत्यक्षात तसे नाही. ३७ टक्के वीज दरवाढ ही वस्तुस्थिती नाही. महावितरणने आयोगाकडे याचिकेद्वारे वीज दरवाढ मागितली हे खरे आहे. मात्र वीज दरवाढीचा आकडा मोठा दिसतो, याचे कारण पूर्वी एक-एक वर्षाची वीज दरवाढ मागितली जात होती. आता बहुवार्षिक दरवाढ मागणी करण्यात आली आहे.महावितरण जितकी वीज दरवाढ मागते तेवढी आयोग देत नाही. आयोग विविध भागधारक, ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेऊन मगच किती दरवाढ द्यायची, हा निर्णय घेते. आवश्यकता भासल्यास शासन मध्यस्थी करेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलelectricityवीजDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस