शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

मंत्र्यांना राज्यात फिरु देणार नाही, राजू शेट्टी कडाडले; २५ नोव्हेंबरला राज्यभर चक्काजाम

By राजाराम लोंढे | Updated: November 18, 2022 17:42 IST

‘स्वाभिमानी’ ने पंजा मारला नाही म्हणून कोणी आम्हाला वाघ समजत नसेल तर आम्ही वाघ आहे की शेळी हे दाखवून देऊ.

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन करुनही राज्य सरकार दखल घेत नसेल तर अशा असंवेदनशील सरकारला घेरण्यासाठी राज्यात एकाही मंत्र्याला फिरु देणार नाही. मंत्र्यांचे जिथे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी जाऊन त्यांना आडवले जाईल. असा इशारा देत २५ नोव्हेंबर पासून राज्यभर चक्काजाम आंदोलनाची हाक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.शेट्टी म्हणाले, गेल्या हंगामातील एफआरपी अधिक दोनशे रुपये द्या, एकरकमी एफआरपीच्या कायद्यात केलेला बदल रद्द करा, वजन काटे डिजीटल करा आदी मागण्यांसाठी दोन दिवस ऊस तोड बंद आंदोलन केले. मात्र असंवेदनशील राज्य सरकारने चर्चेलाही बोलावले नाही. ‘स्वाभिमानी’ ने पंजा मारला नाही म्हणून कोणी आम्हाला वाघ समजत नसेल तर आम्ही वाघ आहे की शेळी हे दाखवून देऊ. आज पासून राज्यभर मंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन त्यांना रोखले जाईल. त्याचबरोबर २५ नोव्हेंबरला राष्ट्रीय व राज्य मार्ग रोखून शेतकऱ्यांचा हिसका दाखवून देऊ.राज्य सरकारला खोके मिळालेत का?एफ. आर. पी. चा कायदा रद्द करू नका म्हणून राज्यातील साखर सम्राटाकडून राज्य सरकारला ५० खोके मिळाले आहेत काय ? असा सवालही शेट्टी यांनी यावेळी केला. संजय राऊत यांच्याकडे पाच लाख सापडल्यावर त्यांना आत टाकणारी ईडी वर्षाला ४५०० कोटीचा दरोडा टाकणाऱ्या साखर सम्राटांना आत टाकणार का ? असाही सवाल केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSugar factoryसाखर कारखाने