शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मंत्र्यांना राज्यात फिरु देणार नाही, राजू शेट्टी कडाडले; २५ नोव्हेंबरला राज्यभर चक्काजाम

By राजाराम लोंढे | Updated: November 18, 2022 17:42 IST

‘स्वाभिमानी’ ने पंजा मारला नाही म्हणून कोणी आम्हाला वाघ समजत नसेल तर आम्ही वाघ आहे की शेळी हे दाखवून देऊ.

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन करुनही राज्य सरकार दखल घेत नसेल तर अशा असंवेदनशील सरकारला घेरण्यासाठी राज्यात एकाही मंत्र्याला फिरु देणार नाही. मंत्र्यांचे जिथे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी जाऊन त्यांना आडवले जाईल. असा इशारा देत २५ नोव्हेंबर पासून राज्यभर चक्काजाम आंदोलनाची हाक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.शेट्टी म्हणाले, गेल्या हंगामातील एफआरपी अधिक दोनशे रुपये द्या, एकरकमी एफआरपीच्या कायद्यात केलेला बदल रद्द करा, वजन काटे डिजीटल करा आदी मागण्यांसाठी दोन दिवस ऊस तोड बंद आंदोलन केले. मात्र असंवेदनशील राज्य सरकारने चर्चेलाही बोलावले नाही. ‘स्वाभिमानी’ ने पंजा मारला नाही म्हणून कोणी आम्हाला वाघ समजत नसेल तर आम्ही वाघ आहे की शेळी हे दाखवून देऊ. आज पासून राज्यभर मंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन त्यांना रोखले जाईल. त्याचबरोबर २५ नोव्हेंबरला राष्ट्रीय व राज्य मार्ग रोखून शेतकऱ्यांचा हिसका दाखवून देऊ.राज्य सरकारला खोके मिळालेत का?एफ. आर. पी. चा कायदा रद्द करू नका म्हणून राज्यातील साखर सम्राटाकडून राज्य सरकारला ५० खोके मिळाले आहेत काय ? असा सवालही शेट्टी यांनी यावेळी केला. संजय राऊत यांच्याकडे पाच लाख सापडल्यावर त्यांना आत टाकणारी ईडी वर्षाला ४५०० कोटीचा दरोडा टाकणाऱ्या साखर सम्राटांना आत टाकणार का ? असाही सवाल केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSugar factoryसाखर कारखाने