शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मंत्र्यांना राज्यात फिरु देणार नाही, राजू शेट्टी कडाडले; २५ नोव्हेंबरला राज्यभर चक्काजाम

By राजाराम लोंढे | Updated: November 18, 2022 17:42 IST

‘स्वाभिमानी’ ने पंजा मारला नाही म्हणून कोणी आम्हाला वाघ समजत नसेल तर आम्ही वाघ आहे की शेळी हे दाखवून देऊ.

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन करुनही राज्य सरकार दखल घेत नसेल तर अशा असंवेदनशील सरकारला घेरण्यासाठी राज्यात एकाही मंत्र्याला फिरु देणार नाही. मंत्र्यांचे जिथे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी जाऊन त्यांना आडवले जाईल. असा इशारा देत २५ नोव्हेंबर पासून राज्यभर चक्काजाम आंदोलनाची हाक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.शेट्टी म्हणाले, गेल्या हंगामातील एफआरपी अधिक दोनशे रुपये द्या, एकरकमी एफआरपीच्या कायद्यात केलेला बदल रद्द करा, वजन काटे डिजीटल करा आदी मागण्यांसाठी दोन दिवस ऊस तोड बंद आंदोलन केले. मात्र असंवेदनशील राज्य सरकारने चर्चेलाही बोलावले नाही. ‘स्वाभिमानी’ ने पंजा मारला नाही म्हणून कोणी आम्हाला वाघ समजत नसेल तर आम्ही वाघ आहे की शेळी हे दाखवून देऊ. आज पासून राज्यभर मंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन त्यांना रोखले जाईल. त्याचबरोबर २५ नोव्हेंबरला राष्ट्रीय व राज्य मार्ग रोखून शेतकऱ्यांचा हिसका दाखवून देऊ.राज्य सरकारला खोके मिळालेत का?एफ. आर. पी. चा कायदा रद्द करू नका म्हणून राज्यातील साखर सम्राटाकडून राज्य सरकारला ५० खोके मिळाले आहेत काय ? असा सवालही शेट्टी यांनी यावेळी केला. संजय राऊत यांच्याकडे पाच लाख सापडल्यावर त्यांना आत टाकणारी ईडी वर्षाला ४५०० कोटीचा दरोडा टाकणाऱ्या साखर सम्राटांना आत टाकणार का ? असाही सवाल केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSugar factoryसाखर कारखाने