शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

दादांच्या पाकिटावर पक्षाने लिहिला थेट अमरावतीचाच पत्ता, स्थिर होऊ द्यायचे नाही का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 12:12 IST

‘मी कोरे पाकीट असून पक्ष जो पत्ता टाकेल तेथे जातो’ असे पाटील यांनी जाहीर केले होते

कोल्हापूर : भाजपचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुण्याचे पालकमंत्रिपद काढून घेऊन त्यांना सोलापूर आणि अमरावतीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पाटील यांनी ‘मी कोरे पाकीट असून पक्ष जो पत्ता टाकेल तेथे जातो’ असे जाहीर केले होते. पक्षाने त्यांचा पुण्याचा पत्ता बदलून थेट विदर्भातील अमरावती व सोलापूर या दोन जिल्ह्यांचा पत्ता टाकल्याने कोल्हापूरचे भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले. सख्खीला सोगा आणि सवतीला मोगा असाच काहीसा अनुभव त्यांच्या वाट्याला आल्याचे कार्यकर्ते बोलत आहे.अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रिपद मिळाले तर चंद्रकांत पाटील निश्चितच कोल्हापूरचे पुन्हा पालकमंत्री होतील अशी कार्यकर्त्यांची अटकळ होती. परंतु ती फोल ठरली. लोकसभेच्या विजयासाठी भाजप आपल्याच महत्त्वाच्या नेत्यांना किती टोकाच्या तडजोडी कराव्या लावू शकते हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. त्यामुळेच पुण्यात स्थिरस्थावर झालेल्या मंत्री पाटील यांना थेट एका टोकाच्या अमरावतीचीही जबाबदारी देऊन त्यांना गुंतवून टाकले आहे.

राज्यात २०१४ साली सत्तांतर झाल्यानंतर विधानपरिषदेचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम, नंतरच्या काळात सहकार, कृषी अशी महत्त्वाची खाती देण्यात आली. दरम्यान २०१९ च्या निवडणुकीवेळी त्यांना पुण्यातून निवडणूक लढवण्याचे आदेश देण्यात आले. तेथून ते निवडून आले. परंतु राज्यात सत्ता आली नाही. गतवर्षी भाजप पुन्हा सत्तेत आल्यानंतर पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण खाते आणि पुण्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले. पाटील यांनी पुढची निवडणूक कोथरूड येथूनच लढवायची यासाठी जोरदार नियोजन करून त्याची अंमलबजावणी सुरू केली असतानाच त्यांच्याकडून पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली.

दादांना स्थिर होऊ द्यायचे नाही कापाटील हे मूळचे कोल्हापूरचे असताना त्यांना गेल्यावेळी पुण्यातून निवडणूक लढवण्यास सांगणे, आता अजित पवार यांचा पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा आग्रह मान्य करताना कोल्हापूरचे पद मुश्रीफ यांना देणे, पाटील यांना सोलापूरसह अमरावतीचीही जबाबदारी देणे या सगळ्यात त्यांना स्थिर होऊ द्यायचेच नाही, असे काही ठरले आहे का अशी विचारणाही कार्यकर्ते करत आहेत. मंत्री पाटील यांचे पक्ष संघटनेतील व सरकारमधीलही वजन जाणीवपूर्वक कमी करण्याचाच हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. जिल्ह्यातील भाजपमध्येही त्यांना मानणारे मूळचे कार्यकर्ते व नवे पदाधिकारी यांच्यातील संघर्ष वाढला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा