शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

..तर उद्धव ठाकरेंवर अशी वेळ आली नसती, मंत्री चंद्रकांत पाटलांचा टोला

By संताजी मिठारी | Updated: August 30, 2022 18:13 IST

त्यामुळे आमच्या लोकसभा प्रवासावर त्यांनी हरकत घेण्याची गरज नाही

कोल्हापूर : प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार, स्वातंत्र्य आहे. उद्धव ठाकरेंही तेच प्रयत्न करत आहेत. त्यांनी हे जर यापूर्वी केले असते, तर बहुधा त्यांच्यावर अशी वेळ आली नसती, असा टोला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला. आज, मंगळवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.शिवसेनेतील बंडखोरीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ठाणे, मुंबईवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. त्यातून मुख्यमंत्री शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न आहे का? अशी विचारणा मंत्री पाटील यांना केली असता ते म्हणाले, प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार, स्वातंत्र्य आहे. त्यानुसार त्यांनी केले असेल. त्यामुळे आमच्या लोकसभा प्रवासावर त्यांनी हरकत घेण्याची गरज नाही. असा प्रवास आणि लक्ष केंद्रीत जर, उद्धव ठाकरे यांनी केले असते, तर बहुधा त्यांच्यावर अशी वेळ आली नसती.लोकसभेच्या ४०० जागा जिंकण्याचे ध्येयसन २०२४ मध्ये लोकसभेच्या ४०० जागा जिंकण्याचे ध्येय भाजपचे आहे. ३०३ जागा कायम राखत आणखी १०० जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील १६ मतदारसंघासाठी १६ केंद्रीय मंत्री ठरले असून त्यांनी तीन दिवसांचा प्रवास करायचा आहे. त्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या बारामतीमध्ये जाणार आहेत. त्यांची पूर्वतयारी करण्यासाठी बावनकुळे जातील...त्याचा फायदा शिंदे गटातील खासदारांना१६ पैकी १२ खासदार हे शिवसेनेचे होते. ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे झाले आहेत. त्याठिकाणी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांचा त्यांना फायदा होणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. एखादी जबाबदारी आल्यानंतर आपण समाजातील वेगवेगळ्या घटकांना भेटतो. त्याप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची नवी जबाबदारी आल्याने ते सर्वांना भेटत आहेत. त्याअंतर्गत राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना