शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

..तर उद्धव ठाकरेंवर अशी वेळ आली नसती, मंत्री चंद्रकांत पाटलांचा टोला

By संताजी मिठारी | Updated: August 30, 2022 18:13 IST

त्यामुळे आमच्या लोकसभा प्रवासावर त्यांनी हरकत घेण्याची गरज नाही

कोल्हापूर : प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार, स्वातंत्र्य आहे. उद्धव ठाकरेंही तेच प्रयत्न करत आहेत. त्यांनी हे जर यापूर्वी केले असते, तर बहुधा त्यांच्यावर अशी वेळ आली नसती, असा टोला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला. आज, मंगळवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.शिवसेनेतील बंडखोरीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ठाणे, मुंबईवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. त्यातून मुख्यमंत्री शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न आहे का? अशी विचारणा मंत्री पाटील यांना केली असता ते म्हणाले, प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार, स्वातंत्र्य आहे. त्यानुसार त्यांनी केले असेल. त्यामुळे आमच्या लोकसभा प्रवासावर त्यांनी हरकत घेण्याची गरज नाही. असा प्रवास आणि लक्ष केंद्रीत जर, उद्धव ठाकरे यांनी केले असते, तर बहुधा त्यांच्यावर अशी वेळ आली नसती.लोकसभेच्या ४०० जागा जिंकण्याचे ध्येयसन २०२४ मध्ये लोकसभेच्या ४०० जागा जिंकण्याचे ध्येय भाजपचे आहे. ३०३ जागा कायम राखत आणखी १०० जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील १६ मतदारसंघासाठी १६ केंद्रीय मंत्री ठरले असून त्यांनी तीन दिवसांचा प्रवास करायचा आहे. त्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या बारामतीमध्ये जाणार आहेत. त्यांची पूर्वतयारी करण्यासाठी बावनकुळे जातील...त्याचा फायदा शिंदे गटातील खासदारांना१६ पैकी १२ खासदार हे शिवसेनेचे होते. ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे झाले आहेत. त्याठिकाणी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांचा त्यांना फायदा होणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. एखादी जबाबदारी आल्यानंतर आपण समाजातील वेगवेगळ्या घटकांना भेटतो. त्याप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची नवी जबाबदारी आल्याने ते सर्वांना भेटत आहेत. त्याअंतर्गत राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना