कोल्हापूर : जिल्ह्यातील गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळणार आहेत. याबाबत गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी एकही पात्र गिरणी कामगार हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या तसेच घरे देण्यासाठी कालबद्ध नियोजन करा, अशी सूचना केली. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह म्हाडा, नगरविकास विभागाचे अधिकारी, व जिल्ह्यातील गिरणी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.मंत्री आबिटकर म्हणाले, शासन निर्णयामुळे अनेक गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचे घर मिळाले आहे. उर्वरित कामगारांनाही लवकर घरे मिळावीत, एकही गिरणी कामगार घरापासून वंचित राहू नये. सेंच्युरी, एनटीसी व इतर गिरण्यातील कामगारांनाही लवकर घरे मिळावी यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून काम गतीने करण्यावर भर द्यावा.ज्या गिरणी कामगारांनी शेलू (कर्जत) आणि कारव (ठाणे) येथील गृह प्रकल्पात संमती दिली आहे त्याची पुन्हा एकदा खात्री करावी. गिरणी कामगारांच्या पात्रता यादीत चुकीचे लाभार्थी येऊ नयेत यासाठी संमतीपत्रांची पुन्हा पडताळणी करा. संबंधित विभागांना प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आणि गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी प्रशासनाने तातडीने व समन्वयाने काम करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
Web Summary : Kolhapur's mill workers will receive rightful homes. Minister Abitkar instructed officials to ensure all eligible workers get homes with a time-bound plan. Verification of consent forms is crucial to avoid incorrect beneficiaries. Authorities were ordered to expedite the project.
Web Summary : कोल्हापुर के मिल श्रमिकों को उनके हक के घर मिलेंगे। मंत्री आबिटकर ने अधिकारियों को यह सुनिश्चित करने का निर्देश दिया कि सभी पात्र श्रमिकों को समयबद्ध योजना के साथ घर मिलें। गलत लाभार्थियों से बचने के लिए सहमति पत्रों का सत्यापन महत्वपूर्ण है। अधिकारियों को परियोजना में तेजी लाने का आदेश दिया गया।