शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

कोल्हापूर खंडपीठ: १५ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत भेट, पालकमंत्री आबिटकर यांचे आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 13:38 IST

चुयेकर यांचे उपोषण मागे

कोल्हापूर : खंडपीठाच्या चर्चेसाठी खंडपीठ कृती समितीला १५ दिवसात भेटीची वेळ देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी (दि. २४) उपोषणस्थळी भेट देऊन सांगितले. त्यामुळे माणिक पाटील-चुयेकर यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते नारळपाणी घेऊन उपोषण संपवले. खंडपीठासाठी पुन्हा उपोषण करायला लागू नये, अशी अपेक्षा चुयेकर यांनी व्यक्त केली. खासदार धनंजय महाडिक आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनी आंदोलन निर्णायक टप्प्यात असल्याचा विश्वास व्यक्त केला.मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात सुरू व्हावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पदवीधर मित्रचे माणिक पाटील-चुयेकर यांनी १६ फेब्रुवारीपासून दसरा चौकात आमरण उपोषण सुरू केले होते. खंडपीठाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी खंडपीठ कृती समितीला वेळ द्यावा, असा आग्रह चुयेकर यांनी धरला होता. उपोषण मागे घेण्याबाबत लोकप्रतिनिधींनी वारंवार विनंती केली होती. तरीही मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर चुयेकर ठाम होते.अखेर पालकमंत्री आबिटकर यांनी सोमवारी चुयेकर यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांचा निरोप दिला. येत्या १५ दिवसात कृती समितीला भेट देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यानुसार भेट होऊन खंडपीठासाठी सरकार ठोस पावले उचलेल, असे त्यांनी सांगितले. बैठकीसह खंडपीठाच्या पाठपुराव्यासाठी सामूहिक प्रयत्न करून हा लढा गतिमान करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.चुयेकर यांचे मनोगत प्रा. मधुकर पाटील यांनी वाचून दाखवले. लोकप्रतिनिधींसह सर्व संघटना, संस्थांनी मनोधैर्य वाढवल्यामुळे उपोषणाचे शिवधनुष्य पेलू शकलो, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अशोकराव माने, वसंतराव मुळीक, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत, ॲड. शिवाजीराव राणे, आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे आश्वासन मिळताच उपस्थितांनी गूळ वाटून आनंद साजरा केला.कोण काय म्हणाले?कोल्हापुरातील खंडपीठासाठी राज्य सरकारने आता आग्रही बनावे. सरकारला चुयेकरांच्या उपोषणाची दखल घ्यावी लागली. पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन लवकरात लवकर कृती समितीची बैठक घडवून आणावी. - सर्जेराव खोत, अध्यक्ष, जिल्हा बार असोसिएशनखंडपीठाच्या मागणीला मूर्त स्वरूप यावे, यासाठी चुयेकरांचे प्रयत्न उपयुक्त ठरतील. लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही सगळ्यांनी खंडपीठासाठी प्रयत्न केले आहेत. यापुढेही ते सुरूच राहतील. निर्णायक लढा अंतिम टप्प्यात आला आहे. - धनंजय महाडिक, खासदारनिवडणुकांमुळे खंडपीठाचा मुद्दा थोडा पुढे गेला. याला पुन्हा गती देण्याचे काम चुयेकर यांच्या उपोषणाने झाले. खंडपीठ कृती समिती आणि मुख्यमंत्र्यांची भेट व्हावी, एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. लवकरच या भेटीने खंडपीठाच्या मागणीला बळ मिळेल. - संजय मंडलिक, माजी खासदार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालयChief Ministerमुख्यमंत्री