शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत पुढील आठवड्यात बैठक, पालकमंत्र्यांचे राजू शेट्टींना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 17:21 IST

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या घटकांवर कारवाई करून प्रदूषण मुक्तीबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा

कोल्हापूर : जिल्ह्यात पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत चालला असून शासनाने तातडीची बैठक घेऊन याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सोमवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. पुढील आठवड्यात याबाबत मुंबईत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मंत्री केसरकर यांनी दिले.संघटनेच्या वतीने अनेक वर्षांपासून पंचगंगा प्रदूषणाबाबत सातत्याने आंदोलन व उपाययोजनांबाबत शासनाकडे पाठपुरावा करूनही याबाबत सरकार गांभीर्याने घेत नाही. सध्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असून पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा खच पडत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून साथींचे आजार पसरण्याचा धोका आहे.

डिसेंबरनंतर नदीतील पाण्याचा विसर्ग कमी होतो आणि साखर कारखाने, कोल्हापूर महापालिका, शिरोली, हातकणंगले , इचलकरंजी औद्योगिक वसाहतीमधील पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जाते. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांचे आरोग्याशी खेळणाऱ्या घटकांवर कारवाई करून प्रदूषण मुक्तीबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा, असे शेट्टी यांनी सांगितले.जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती सावकर मादनाईक, नगरसेवक शैलेश चौगुले आदी उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण