शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

कॅन्सरला रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:43 IST

जयसिंगपूर : कॅन्सरला शेतकरी जबाबदार नसून, पंचगंगा नदीपात्रातील रासायनिक दूषित पाणीच जबाबदार असल्याचे तपासणीतून पुढे आले आहे. पंचगंगेचे प्रदूषण ...

जयसिंगपूर : कॅन्सरला शेतकरी जबाबदार नसून, पंचगंगा नदीपात्रातील रासायनिक दूषित पाणीच जबाबदार असल्याचे तपासणीतून पुढे आले आहे. पंचगंगेचे प्रदूषण हेच मोठे दुखणे असून, शिरोळ तालुक्याबरोबरच पंचगंगा नदीकाठच्या गावांत कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. कॅन्सरला थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था, जयसिंगपूर नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कॅन्सर दिनानिमित्त येथील स्व. शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृहात कॅन्सर मुक्ती परिषद झाली.

कॅन्सर तज्ज्ञ डॉ. आशितोष पाटील म्हणाले, धूम्रपानाच्या सवयीमुळे ९५ टक्के लोकांना कॅन्सर होतो. बदलत्या जीवनशैलीमुळे साडेसतरा लाख कॅन्सरचे रुग्ण दरवर्षी आढळतात, तर दररोज अडीच हजार लोकांचा मृत्यू होतो आहे. कॅन्सर होऊ नये यासाठी प्रतिबंध करण्याची गरज आहे. यासाठी नागरिकांची मानसिकता बदलावी.

बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड म्हणाले, शिरोळ तालुक्यात कॅन्सरमुक्तीची चळवळ यशस्वी करायची असेल तर विषमुक्त शेती व निरोगी भारत अभियान राबविले पाहिजे.

यावेळी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, सावकर मादनाईक यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, रेखा देशमुख, आसावरी आडके, मुक्ताबाई वगरे, डॉ. महावीर अक्कोळे, सचिन शिंदे, सागर मादनाईक, अभय भिलवडे, वासुदेव भोजणे, आदी उपस्थित होते. स्वागत नगरसेवक शैलेश चौगुले यांनी केले. शैलेश आडके यांनी आभार मानले.

--------------

चौकट - जीवनशैली बदलण्याची गरज : शंकर गौडा

शेतीसाठी वापरली जाणारी ५०० कीटकनाशके धोकादायक आहेत. औषधे फवारणेबाबत प्रबोधन गरजेचे असून, आरोग्याला की उत्पादनाला महत्त्व द्यायचे हे शेतकऱ्यांनी समजून घ्यावे. शिरोळ तालुक्यातील एक हजार शेतकऱ्यांच्या रक्तांचे नमुने तपासले तर आरोग्याची नेमकी वस्तुस्थिती पुढे येणार आहे, असे रायचूर विद्यापीठाचे कार्यकारी संचालक शंकर गौडा यांनी सांगितले.

फोटो - ०४०२२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे कॅन्सर मुक्ती परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले.