शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

Kolhapur: दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणपत्रके रोखली, संस्थाचालकांच्या वादात विद्यार्थी अडचणीत; चंदगड तालुक्यातील प्रकार

By समीर देशपांडे | Updated: June 19, 2023 12:10 IST

शैक्षणिक प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी ही गुणपत्रके अत्यावश्यक असताना ती न देण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालक हवालदिल

समीर देशपांडेकोल्हापूर : दहावीचा निकाल लागून सोळा दिवस झाले तरी चंदगड तालुक्यातील दाटे येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांची दहावीची गुणपत्रके अद्यापही देण्यात आलेली नाहीत. डिप्लोमासह अन्य शैक्षणिक प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी ही गुणपत्रके अत्यावश्यक असताना ती न देण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालक हवालदिल झाले आहेत.शारदा शिक्षण प्रसारक मंडळ यशवंतनगर या शिक्षण संस्थेची चंदगड तालुक्यात सात माध्यमिक शाळा, दोन कनिष्ठ महाविद्यालये आणि एक वरिष्ठ महाविद्यालय आहे. यातील दाटे येथील माध्यमिक विद्यालयातून यंदा दहावी परीक्षेला १५ विद्यार्थी बसले होते. त्यांचा ऑनलाइन निकाल २ जून रोजी त्यांना समजला आहे. मात्र, त्यानंतर अतिशय गरजेची असलेली गुणपत्रके त्यांना मिळालेली नाहीत. शिक्षण संस्थेचे सचिव जे. बी. पाटील आणि माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांच्यातील वादात एस.एस.सी. बोर्डाने ही गुणपत्रके दिलेली नसल्याचे सांगण्यात आले.याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी विभागीय सचिव डी. एस. पोवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ज्या संस्थांमध्ये वाद आहेत अशा संस्थांची यादी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून आम्हाला दरवर्षी प्राप्त होते. यातील कोणाला अधिकृतपणे गुणपत्रिका द्यावयाच्या आहेत याची माहिती माध्यमिक विभागाकडून आल्यानंतर खात्री करूनच आम्ही या गुणपत्रिका देतो. परंतु, या शाळेकडून अधिकृतपणे कोणीही आले नसल्यामुळे या गुणपत्रिका दिलेल्या नाहीत. माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आज, सोमवारी या विषयाची माहिती घेऊन त्यातून मार्ग काढणार असल्याचे सांगितले.

मुलांच्या भवितव्याशी खेळ कशासाठी?शिक्षण संस्थाचालकांचा वाद जरी असला तरी तो मुलांच्या भवितव्याशी खेळणारा नसावा. या शिक्षण संस्थेच्या अन्य माध्यमिक विद्यालयांच्या गुणपत्रिका मिळालेल्या असताना याच विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका न मिळण्यात नेमका कोणी खोडा घातला, अशी विचारणा होत आहे.

आमचा आणि विरोधकांचा शिक्षण संस्थेत वाद आहे. परंतु, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर होता कामा नये. सोमवारी कोल्हापूरमध्ये येऊन हा विषय संपवणार आहे. - जे. बी.पाटील, सचिव, शारदा शिक्षण प्रसारक मंडळ, यशवंतनगर 

शिक्षण संस्थेत आमचा काहीही वाद असला तरी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका देण्यापासून कोणीच कोणाला रोखलेले नाही. या गुणपत्रिका तातडीने मिळाव्यात. - भरमूआण्णा पाटील, माजी राज्यमंत्री

टॅग्स :kolhapurकोल्हापूरssc examदहावीStudentविद्यार्थीSchoolशाळा