शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात येत्या मंगळवारी ‘घेरा डालो.. डेरा डालो’ मोर्चा

By राजाराम लोंढे | Updated: June 14, 2024 13:38 IST

सत्ताधीशांचे सुलतानी संकट परतवून लावण्यासाठी एक व्हा: संजय घाटगे यांचे आवाहन

कोल्हापूर : देवाच्या आडून शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला असून धनदांडग्यांना पोसण्यासाठी चालवलेला हा उद्योग आहे. सत्ताधीशांनी शेतकऱ्यांवर लादलेले हे सुलतानी संकट परतावून लावण्यासाठी मोर्चा मध्ये कुटूंबासह सहभागी व्हा, असे आवाहन माजी आमदार संजय घाटगे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. मंगळवारी (दि. १८) दसरा चौकातून ‘घेरा डालो डेरा डालो’ मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.संजय घाटगे म्हणाले, अकरा जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमिनी, त्यातील विहीरी, तलाव, पाणी पुरवठा योजना उध्दवस्त होणार आहेत. देवाच्या नावाखाली धनदांडग्यांना पोसून त्यातून माया गोळा करण्याचा उद्योग सुरु आहे. अध्यादेश मागे घेतल्याशिवाय आता थांबणार नाही.शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले, सत्ताधारी नेते प्रक्रिया थांबवल्याचे सांगतात आणि अधिकारी आदेश काढत आहेत. जनतेला फसवण्याचे काम सत्तारुढ नेते करत असून हे फार काळ चालणार नाही. मंगळवारी सकाळी दहा वाजता दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात होईल. यामध्ये शेतकऱ्यांनी कुटूंबासह यावे. यावेळी, बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील-भुयेकर, अतुल दिघे, ‘गोकुळ’चे संचालक प्रकाश पाटील, भगवान काटे, विक्रांत पाटील-किणीकर, शिवाजी मगदूम आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गagitationआंदोलन