शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
6
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
7
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
8
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
9
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
10
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
11
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
12
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
13
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
14
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
15
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
16
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
17
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
18
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
19
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
20
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी

Maratha Reservation : मुंबईतील ‘मराठा स्वाभिमान गाडी मार्च’ होणारच; सकल मराठा समाजाचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 11:05 IST

पूर्वनियोजनाप्रमाणे सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे दि. ४ सप्टेंबरला मुंबईत ‘मराठा स्वाभिमान गाडी मार्च’ हा चारचाकी वाहनासमवेतचा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा शांततेत, पण पूर्ण ताकदीनिशी काढण्याचा ठाम निर्धार कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे समन्वयक, बांधवांनी केला.

ठळक मुद्देमुंबईतील ‘मराठा स्वाभिमान गाडी मार्च’ होणारच; सकल मराठा समाजाचा निर्धारचार सप्टेंबरला कोल्हापुरातून निघणार

कोल्हापूर : पूर्वनियोजनाप्रमाणे सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे दि. ४ सप्टेंबरला मुंबईत ‘मराठा स्वाभिमान गाडी मार्च’ हा चारचाकी वाहनासमवेतचा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा शांततेत, पण पूर्ण ताकदीनिशी काढण्याचा ठाम निर्धार कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे समन्वयक, बांधवांनी केला.मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याच्या मागणीबाबत जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमवेत केलेल्या चर्चेची माहिती सकल मराठा समाजाच्या समन्वयक, बांधवांना शासकीय विश्रामगृहातील बैठकीमध्ये शुक्रवारी दिली. त्यानंतर मुंबईतील दि. ४ सप्टेंबरच्या आंदोलनाबाबत दिशा ठरविण्यासाठी जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची बैठक झाली.

यामध्ये नंदिनी बाभूळकर म्हणाल्या, आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी विश्वास दिला, तर आयोगाचा अहवाल येईपर्यंत थांबण्याचा विचार करता येईल. मात्र, त्यांनी विश्वास दिला नाही तर आंदोलनाची धार वाढवूया. इंद्रजित सावंत म्हणाले, आम्हाला आरक्षण कशा पद्धतीने देणार आहात, याची माहिती देण्यासाठी विशेष अधिवेशनाची आम्ही मागणी केली.

आपला स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल, तर चारचाकी वाहन मोर्चाद्वारे मुंबईत धडक देणे आवश्यक आहे. सचिन तोडकर, स्वप्निल भांदिगरे, प्रताप माने, वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, आदींनी मोर्चाबाबतची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर उपस्थित समन्वयक आणि समाजबांधवांनी हात उंचावून मुंबईतील दि. ४ सप्टेंबरचा मोर्चा काढण्याबाबतचा निर्धार व्यक्त केला.

आधी झालेल्या नियोजनाप्रमाणे मुंबईतील चारचाकी वाहन मोर्चा होणार आहे. त्याची सुरुवात दि. ४ सप्टेंबरला सकाळी साडेनऊ वाजता ऐतिहासिक दसरा चौकातून होणार आहे. अन्य १९ मागण्यांबाबत सरकारने कोल्हापुरात येऊन निवेदन करावे.- वसंतराव मुळीक

 

आरक्षण देण्याबाबतची जबाबदारी घेणार का? आणि मुख्यमंत्र्यांवर तुमचा विश्वास आहे का? अशी विचारणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना केली असता ते निरुत्तर झाले. जर, त्यांचाच मुख्यमंत्र्यांवर विश्वास नसेल, तर मग आम्ही कसा विश्वास ठेवायचा? त्यामुळे सकल मराठा समाजाच्या निर्धारानुसार शांततेत, पण ताकदीनिशी आणि स्वाभिमानाने मुंबईतील चारचाकी वाहन मोर्चा होईल.-दिलीप देसाई

 

‘हम आयेंगे बार बार लगातार’‘हम आयेंगे बार बार लगातार’ हे ब्रीदवाक्य घेऊन आमचा ‘मराठा स्वाभिमान गाडी मार्च’ मुंबईत निघणार आहे. त्यात राज्यातील समाजबांधव सहभागी आहेत. गेटवे आॅफ इंडियासमोर किमान तीन दिवस राहण्याच्या दृष्टीने समाजबांधवांनी यावे, असे आवाहन इंद्रजित सावंत यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर