शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
20
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : मुंबईतील ‘मराठा स्वाभिमान गाडी मार्च’ होणारच; सकल मराठा समाजाचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 11:05 IST

पूर्वनियोजनाप्रमाणे सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे दि. ४ सप्टेंबरला मुंबईत ‘मराठा स्वाभिमान गाडी मार्च’ हा चारचाकी वाहनासमवेतचा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा शांततेत, पण पूर्ण ताकदीनिशी काढण्याचा ठाम निर्धार कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे समन्वयक, बांधवांनी केला.

ठळक मुद्देमुंबईतील ‘मराठा स्वाभिमान गाडी मार्च’ होणारच; सकल मराठा समाजाचा निर्धारचार सप्टेंबरला कोल्हापुरातून निघणार

कोल्हापूर : पूर्वनियोजनाप्रमाणे सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे दि. ४ सप्टेंबरला मुंबईत ‘मराठा स्वाभिमान गाडी मार्च’ हा चारचाकी वाहनासमवेतचा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा शांततेत, पण पूर्ण ताकदीनिशी काढण्याचा ठाम निर्धार कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे समन्वयक, बांधवांनी केला.मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याच्या मागणीबाबत जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमवेत केलेल्या चर्चेची माहिती सकल मराठा समाजाच्या समन्वयक, बांधवांना शासकीय विश्रामगृहातील बैठकीमध्ये शुक्रवारी दिली. त्यानंतर मुंबईतील दि. ४ सप्टेंबरच्या आंदोलनाबाबत दिशा ठरविण्यासाठी जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची बैठक झाली.

यामध्ये नंदिनी बाभूळकर म्हणाल्या, आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी विश्वास दिला, तर आयोगाचा अहवाल येईपर्यंत थांबण्याचा विचार करता येईल. मात्र, त्यांनी विश्वास दिला नाही तर आंदोलनाची धार वाढवूया. इंद्रजित सावंत म्हणाले, आम्हाला आरक्षण कशा पद्धतीने देणार आहात, याची माहिती देण्यासाठी विशेष अधिवेशनाची आम्ही मागणी केली.

आपला स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल, तर चारचाकी वाहन मोर्चाद्वारे मुंबईत धडक देणे आवश्यक आहे. सचिन तोडकर, स्वप्निल भांदिगरे, प्रताप माने, वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, आदींनी मोर्चाबाबतची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर उपस्थित समन्वयक आणि समाजबांधवांनी हात उंचावून मुंबईतील दि. ४ सप्टेंबरचा मोर्चा काढण्याबाबतचा निर्धार व्यक्त केला.

आधी झालेल्या नियोजनाप्रमाणे मुंबईतील चारचाकी वाहन मोर्चा होणार आहे. त्याची सुरुवात दि. ४ सप्टेंबरला सकाळी साडेनऊ वाजता ऐतिहासिक दसरा चौकातून होणार आहे. अन्य १९ मागण्यांबाबत सरकारने कोल्हापुरात येऊन निवेदन करावे.- वसंतराव मुळीक

 

आरक्षण देण्याबाबतची जबाबदारी घेणार का? आणि मुख्यमंत्र्यांवर तुमचा विश्वास आहे का? अशी विचारणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना केली असता ते निरुत्तर झाले. जर, त्यांचाच मुख्यमंत्र्यांवर विश्वास नसेल, तर मग आम्ही कसा विश्वास ठेवायचा? त्यामुळे सकल मराठा समाजाच्या निर्धारानुसार शांततेत, पण ताकदीनिशी आणि स्वाभिमानाने मुंबईतील चारचाकी वाहन मोर्चा होईल.-दिलीप देसाई

 

‘हम आयेंगे बार बार लगातार’‘हम आयेंगे बार बार लगातार’ हे ब्रीदवाक्य घेऊन आमचा ‘मराठा स्वाभिमान गाडी मार्च’ मुंबईत निघणार आहे. त्यात राज्यातील समाजबांधव सहभागी आहेत. गेटवे आॅफ इंडियासमोर किमान तीन दिवस राहण्याच्या दृष्टीने समाजबांधवांनी यावे, असे आवाहन इंद्रजित सावंत यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर