शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Maratha Reservation : सर्व पक्षीय आमदार, खासदार मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 20:47 IST

मराठा आरक्षणावर चर्चा करूण निर्णय घेण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्याकरिता सर्व पक्षीय आमदार, खासदार यांचे शिष्टमंडळ मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे.

ठळक मुद्देसर्व पक्षीय आमदार, खासदार मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणारमराठा आरक्षणाकरिता विशेष अधिवेशनाची मागणी करणार

कोल्हापूर : मराठा आरक्षणावर चर्चा करूण निर्णय घेण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्याकरिता सर्व पक्षीय आमदार, खासदार यांचे शिष्टमंडळ मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. तसा निर्णय शनिवारी सायंकाळी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या शिष्टमंडळात राज्यातील सर्वच आमदार, खासदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.मराठा आरक्षणाबाबत कोल्हापुरातील आमदार, खासदारांची नेमकी भूमिका काय आहे, ते कशा प्रकारे याप्रकरणी प्रयत्न करीत आहेत हे जाणून घेण्याकरिता शनिवारी सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत १० पैकी ९ आमदार व खासदार राजू शेट्टी उपस्थित होते.सुरुवातील दिलीप देसाई व इंद्रजित सावंत यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. सरकार फक्त मराठा समाजाला आश्वासन देऊन फसवणूक करीत आहे. मुंबईत मोर्चा काढला तेव्हा सगळ्या मागण्या मान्य केल्या. तसे लेखी दिले. मात्र, त्यांची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही. आताही नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षण देणार असे सांगितले जाते. मात्र, ते कसे देणार, कधी देणार हे स्पष्ट केले जात नाही.

आमची एकच मागणी आहे की, तुम्ही जे काही करणार आहात ते विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून त्यामध्येच सांगा आणि अधिवेशन कधी बोलावणार याची तारीख सांगा. जोपर्यंत तुम्ही निर्णय जाहीर करीत नाही तोपर्यंत मंगळवार (दि. ४ सप्टेंबर)चा मुंबईतील गाडी मोर्चा आणि आमचे आंदोलन थांबणार नाही, असे देसाई व सावंत यांनी ठासून सांगितले.त्यानंतर खासदार राजू शेट्टी यांच्यासह सर्व आमदारांनी त्यांची बाजू मांडली. आम्ही मराठा समाजाचे घटक आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे. त्यामुळे तुम्ही जो आदेश द्याल त्याप्रमाणे आंदोलनात सहभागी होण्याची आमची तयारी राहील, असेच सर्वांनी स्पष्ट केले.खासदार शेट्टी यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पक्षीय आमदार, खासदारांना एकत्र बोलावून अशी बैठक घ्यावी. सर्व आमदार, खासदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळाद्वारे भेटून विशेष अधिवेशनाची मागणी करावी, अशा सूचना करतानाच जर मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर मात्र व्यापक मोर्चा काढावा, असेही सांगितले.

आमदार हसन मुश्रीफ यांनी सुद्धा शिष्टमंडळाला व्यापकता येण्यासाठी सर्व महाराष्ट्रातील आमदारांना आवाहन करावे, अशी सूचना केली. तसेच आंदोलनाबाबत आम्हाला आदेश द्या, किती गाड्या आणायचे ते सांगा, आमची तशी तयारी असेल, असेही त्यांनी सांगितले.आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक असते. याच वेळी मुख्यमंत्र्याना भेटतो. फक्त खासदार शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांची वेळ घ्यावी, अशी सूचना केली. आमदार राजेश क्षीरसागर यांनी राज्यातील सर्वच आमदार, खासदारांना या शिष्टमंडळात समाविष्ट होण्याचे आवाहन करा, अशी सूचना केली. तसेच शिवसेनेने यापूर्वीच विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर