शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भरतीत मराठा उमेदवार आरक्षणापासून वंचित, शासनाकडून दाखले वेळेत देण्याचा निर्णय न झाल्याने फटका

By भीमगोंड देसाई | Updated: March 14, 2024 12:25 IST

मुदत वाढीसाठी साकडे घालावे

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचे दाखले आणि नॉन क्रिमिलेअर देण्याच्या आदेशास शासनाकडून विलंब झाला. परिणामी, मराठा उमेदवारांना १७ हजार इतक्या महापोलिस भरतीत दहा टक्के आरक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्याचा मोठा फटका मराठा समाजातील उमेदवारांना बसला आहे. शासनाने आरक्षण जाहीर करूनही वेळेत दाखला न मिळाल्यानंतर त्यांना खुल्या वर्गातून अर्ज भरण्याची वेळ आली आहे.शासनाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण दिले. आरक्षण देऊन दोन आठवडे झाले तरी आरक्षणाचे दाखला आणि नॉन क्रिमिलेअर देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना शासनाकडून आले नाहीत. दरम्यान, अलीकडच्या काही वर्षांतील सर्वांत मोठी पोलिस शिपाई पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली.

पाच मार्चपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दहा टक्के आरक्षित कोट्यातून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी जातीचा दाखला असणे बंधनकारक आहे. त्यामुळे मराठा समाजातील युवक-युवती नव्याने जाहीर केलेल्या दहा टक्के आरक्षणातून अर्ज करण्यासाठी दाखला काढण्यासाठी महसूल यंत्रणेकडे हेलपाटे मारत राहिले. मात्र, दाखले देण्याचे आदेश सरकारकडून आले नव्हते. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून ११ मार्चचा दाखले आणि क्रिमिलेअरचे दाखले देण्याचे आदेश देण्यात आले.पण जातीच्या दाखल्यासाठी अर्ज केल्यापासून ४५ दिवसांची तर नॉनक्रिमिलेअरसाठी १५ दिवसांची मुदत असते. यामुळे हे दोन्ही दाखले पोलिस भरतीसाठीच्या अर्ज दाखल करण्याच्या ३१ मार्चपर्यंतच्या अंतिम मुदतीत मिळविणे शक्य नाही. म्हणूनच या पोलिस भरतीत मराठा उमेदवारांना दहा टक्के आरक्षणाचा लाभ होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेकांनी आरक्षणासाठी संघर्ष केला. पण शासकीय अनास्थेमुळे दाखले देण्याचा आदेश तातडीने झाला नाही. पोलिस भरतीत आरक्षणास मराठा उमेदवारांना मुकावे लागले.

मुदत वाढीसाठी साकडे घालावेलोकसभा निवडणूक जवळ आली आहेत. सर्वच आमदारांना मराठा समाजाची मते हवी आहेत. निवडणुकीत मराठा समाजाची मते मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या लोकप्रतिनिधींनी खरोखर मराठा समाजातील बेरोजगार उमेदवारांच्या कल्याणासाठी दहा टक्के आरक्षणाचे दाखले मिळण्याच्या कालावधीपर्यंत महापोलिस भरतीची अर्ज दाखल करण्याची मुदत वाढविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालावे, अशी मागणी होत आहे.

मराठा समाजातील आमदार, खासदारांनी पोलिस भरतीच्या अर्जाची मुदत वाढविण्यासाठी सरकारवर दबाव आणावा. अन्यथा आम्ही शासनास जाब विचारू. -वसंतराव मुळिक, उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणPoliceपोलिस