शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मध्येच बोलले...
2
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
3
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
4
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
5
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
6
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
7
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
8
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
9
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
10
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
11
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
12
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
13
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
14
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
15
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
16
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार
17
खळबळजनक! T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, वेगवेगळ्या नंबरवरून आले फोन
18
ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री
19
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
20
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी

घाईमुळे अनेक ध्वज नियमबाह्य, अधिकारी तणावात

By समीर देशपांडे | Published: August 11, 2022 12:02 PM

समीर देशपांडे कोल्हापूर ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असताना प्रशासकीय अधिकारी वेगळ्याच तणावात आहेत. एकीकडे घराघरावर ...

समीर देशपांडेकोल्हापूर ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असताना प्रशासकीय अधिकारी वेगळ्याच तणावात आहेत. एकीकडे घराघरावर ध्वज फडकवायचा आहे. परंतु तो शासकीय नियमानुसार असला पाहिजे. त्यामुळे घाई गडबडीत तयार केलेले नियमबाह्य ध्वज पुरवले जाऊ नयेत यासाठी प्रशासनाला डोळ्यात तेल घालून ध्वजांची तपासणी करावी लागत आहे.केंद्र शासनाने ‘हर घर तिरंगा’ची घोषणा गेल्या महिन्यात केल्यानंतर त्या दृष्टीने नियोजनासाठी बैठकांवर बैठकांचा सपाटा लावण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा पोलीस प्रमुख या चार महत्त्वाच्या प्रशासकीय यंत्रणांचे स्वतंत्र नियोजन सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांना याबाबत जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु एवढ्या मोठ्या संख्येने ध्वज मिळवताना प्रशासनाची दमछाक होत आहे.जिल्हा प्रशासनाने पाच लाख ध्वजांची मागणीजिल्हा प्रशासनाने एकूण पाच लाख ध्वजांची मागणी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे केली होती. त्यापैकी सोमवार अखेर ४ लाख ५ हजार ध्वज जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले असून ते ११ तालुक्यांकडे रवाना करण्यात आले आहेत. मंगळवारी आणखी एक लाख ध्वज उपलब्ध होणार आहेत. पाच साखर कारखान्यांनी ध्वज मागणी केली असून त्या त्या तालुक्यात ते पोहाच करण्यात आले आहेत.मागणी वाढल्यामुळे टंचाईसर्वच देशभरातून एकाचवेळी ध्वजांची मागणी वाढल्यामुळे मोठी टंचाई निर्माण झाली आहे. इचलकरंजीमध्येही अशा पध्दतीने ध्वज निर्मितीवर मर्यादा आल्या आहेत. तर कोल्हापूरसाठी सांगलीमध्ये ध्वज तयार करण्याचे काम वेगावले आहे. परंतु हे करत असताना खराब ध्वज येण्याचे प्रमाणही अधिक आहे.

नीट न कापलेले, काही ठिकाणी फाटलेलेपहिल्या टप्प्यात ग्रामपंचायत विभागाकडे ६० हजार ध्वज मिळाले होते. परंतु यातील अनेक ध्वज हे संहितेनुसार नव्हते. काही ध्वज खालच्या बाजूला फाटलेले होते. काही ध्वजांचा रंग एकमेकांमध्ये मिसळला होता. टीप उसवली होती. तीनही बाजूंनी शिलाई आवश्यक असताना ते मारली गेली नव्हती. काही ध्वज चुकीच्या पध्दतीने कापण्यात आले आहेत.

तालुका पातळीवर तपासणीचे काम

जिल्हा पातळीवर लाखो ध्वज तपासणीचे काम शक्य नसल्याने त्या त्या तालुक्यांमध्ये सर्व ध्वज तपासून वितरित करावे अशी सूचना सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी बारा तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये संहितेनुसारच असलेल्या ध्वजांचे वितरण करा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndependence Dayस्वातंत्र्य दिन