शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
3
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
4
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
5
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
6
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
7
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
8
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
9
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
10
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
11
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
12
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
13
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
14
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
15
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
16
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
17
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
18
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
19
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
20
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)

Kolhapur: मांडरेतील विषबाधेचे गुढ वाढले, अनेक प्रश्न अनुत्तरीत; उलटसुलट चर्चेला उधाण

By उद्धव गोडसे | Updated: December 17, 2024 12:08 IST

पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

उद्धव गोडसे कोल्हापूर : मांडरे (ता. करवीर) येथील विषबाधा प्रकरणात तिघांनी जीव गमावला, तर एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे. विषबाधेच्या घटनेला महिना पूर्ण झाला, तरी अजूनही याचा उलगडा झालेला नाही. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्याशिवाय तपास पुढे सरकणार नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.मात्र, विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होत नसल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. नजरचुकीने झालेली विषबाधा की जाणीवपूर्वक केलेला विषप्रयोग असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. घटना आणि तपासाच्या पातळीवर अनेक प्रश्न अनुत्तरीत असल्याने याचे गूढ वाढले आहे.जबाबात विसंगती का?पांडुरंग पाटील यांच्यासह त्यांच्या तीन मुलांनी मुंगूस चावून दगावलेली कोंबडी शिजवून खाल्ल्याचे निमित्त झाले आणि त्यांच्यासह दोन मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १५ नोव्हेंबरला विषबाधेची घटना घडल्यानंतर १५ दिवसांत तिघांचा बळी गेला. त्यानंतर करवीर पोलिसांनी पाटील यांची सून गंगा आणि बचावलेला लहान मुलगा प्रदीप यांचे जबाब नोंदवले. मात्र, दोघांच्या जबाबात विसंगती येत आहे. विषबाधा झाल्याच्या दिवशी घरात कूकरमध्ये भात शिजवल्याचे गंगा यांनी सांगितले, तर शिट्टी खराब झाल्याने कूकर बंद असून वहिनीने पातेल्यात भात शिजवला होता, असा जबाब प्रदीपने दिला आहे.

मृतांचे कपडे का जाळले?विषबाधा झाल्यानंतर रुग्णांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांनी उलट्या केल्यानंतर कपड्यांवर त्याचे अंश पडले होते. रुग्णालयातून माहिती मिळताच पोलिसांनी कपडे जप्त करणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. मृतदेहांचे दहन करतानाच नातेवाइकांनी मृतांचे कपडे जाळून टाकले. कपडे जाळण्यास कोणी पुढाकार घेतला? तपासासाठी ते पोलिसांच्या ताब्यात का दिले नाहीत? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.विष चिकनच्या रश्श्यात की भातात?पहिल्या दिवशी जेवलेले पांडुरंग पाटील यांच्यासह दोन मुले कृष्णात आणि रोहित यांना विषबाधा झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेवलेला लहान मुलगा प्रदीप यालाही विषबाधा झाली. दोन्ही दिवसांत घरात जेवलेल्या गंगा आणि त्यांच्या पाच वर्षीय मुलीला काहीच झाले नाही. दरम्यान, पहिल्या दिवशी एका शेजाऱ्यानेही तेच चिकन खाल्ले होते. त्यांनाही काही झाले नाही. त्यामुळे विष नेमके चिकनमध्ये होते की भातात होते? याचा उलगडा होणे गरजेचे आहे.

नेमके कोणते विष?मृतांच्या पोटातील काही अंश तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत. त्यांना कोणत्या विषाची बाधा झाली? याचा उलगडा फॉरेन्सिकच्या अहवालावरून होईल. दरम्यान, पाटील यांच्या घरात पोलिसांना तणनाशकाची बाटली मिळाली आहे. त्याच तणनाशकाचे अंश मृतांच्या पोटात मिळाल्यास विषप्रयोग झाल्याच्या संशयाला बळकटी मिळणार आहे. मात्र, विषप्रयोग कोणी आणि का केला? याचाही उलगडा पोलिसांना करावा लागेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfood poisoningअन्नातून विषबाधाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस