शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Kolhapur: मांडरेतील विषबाधेचे गुढ वाढले, अनेक प्रश्न अनुत्तरीत; उलटसुलट चर्चेला उधाण

By उद्धव गोडसे | Updated: December 17, 2024 12:08 IST

पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

उद्धव गोडसे कोल्हापूर : मांडरे (ता. करवीर) येथील विषबाधा प्रकरणात तिघांनी जीव गमावला, तर एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे. विषबाधेच्या घटनेला महिना पूर्ण झाला, तरी अजूनही याचा उलगडा झालेला नाही. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्याशिवाय तपास पुढे सरकणार नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.मात्र, विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होत नसल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. नजरचुकीने झालेली विषबाधा की जाणीवपूर्वक केलेला विषप्रयोग असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. घटना आणि तपासाच्या पातळीवर अनेक प्रश्न अनुत्तरीत असल्याने याचे गूढ वाढले आहे.जबाबात विसंगती का?पांडुरंग पाटील यांच्यासह त्यांच्या तीन मुलांनी मुंगूस चावून दगावलेली कोंबडी शिजवून खाल्ल्याचे निमित्त झाले आणि त्यांच्यासह दोन मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १५ नोव्हेंबरला विषबाधेची घटना घडल्यानंतर १५ दिवसांत तिघांचा बळी गेला. त्यानंतर करवीर पोलिसांनी पाटील यांची सून गंगा आणि बचावलेला लहान मुलगा प्रदीप यांचे जबाब नोंदवले. मात्र, दोघांच्या जबाबात विसंगती येत आहे. विषबाधा झाल्याच्या दिवशी घरात कूकरमध्ये भात शिजवल्याचे गंगा यांनी सांगितले, तर शिट्टी खराब झाल्याने कूकर बंद असून वहिनीने पातेल्यात भात शिजवला होता, असा जबाब प्रदीपने दिला आहे.

मृतांचे कपडे का जाळले?विषबाधा झाल्यानंतर रुग्णांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांनी उलट्या केल्यानंतर कपड्यांवर त्याचे अंश पडले होते. रुग्णालयातून माहिती मिळताच पोलिसांनी कपडे जप्त करणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. मृतदेहांचे दहन करतानाच नातेवाइकांनी मृतांचे कपडे जाळून टाकले. कपडे जाळण्यास कोणी पुढाकार घेतला? तपासासाठी ते पोलिसांच्या ताब्यात का दिले नाहीत? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.विष चिकनच्या रश्श्यात की भातात?पहिल्या दिवशी जेवलेले पांडुरंग पाटील यांच्यासह दोन मुले कृष्णात आणि रोहित यांना विषबाधा झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेवलेला लहान मुलगा प्रदीप यालाही विषबाधा झाली. दोन्ही दिवसांत घरात जेवलेल्या गंगा आणि त्यांच्या पाच वर्षीय मुलीला काहीच झाले नाही. दरम्यान, पहिल्या दिवशी एका शेजाऱ्यानेही तेच चिकन खाल्ले होते. त्यांनाही काही झाले नाही. त्यामुळे विष नेमके चिकनमध्ये होते की भातात होते? याचा उलगडा होणे गरजेचे आहे.

नेमके कोणते विष?मृतांच्या पोटातील काही अंश तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत. त्यांना कोणत्या विषाची बाधा झाली? याचा उलगडा फॉरेन्सिकच्या अहवालावरून होईल. दरम्यान, पाटील यांच्या घरात पोलिसांना तणनाशकाची बाटली मिळाली आहे. त्याच तणनाशकाचे अंश मृतांच्या पोटात मिळाल्यास विषप्रयोग झाल्याच्या संशयाला बळकटी मिळणार आहे. मात्र, विषप्रयोग कोणी आणि का केला? याचाही उलगडा पोलिसांना करावा लागेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfood poisoningअन्नातून विषबाधाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस