शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

महिलांपेक्षा तिप्पट संख्येने वाढल्या पुरुषांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : व्यवसायातील नुकसान, कौटुंबिक अडचणी, कोरोनामुळे उद्‌ध्वस्त झालेले जीवनमान, दीर्घ आजार आदी कारणांमुळे माणसांमध्ये नैराश्येची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : व्यवसायातील नुकसान, कौटुंबिक अडचणी, कोरोनामुळे उद्‌ध्वस्त झालेले जीवनमान, दीर्घ आजार आदी कारणांमुळे माणसांमध्ये नैराश्येची भावना वाढत आहे. गेल्या सव्वा दोन वर्षात जिल्ह्यात तब्बल १३३० जणांनी स्वत:चे जीवन संपवले. या आत्महत्येमध्ये सुमारे ९९७ पुरुषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आत्महत्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण तिप्पट आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीतही नैराश्येची भावना वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

स्पर्धात्मक युगात माणसाच्या कामाची गती प्रचंड वाढली. स्पर्धा व्यवसायातील असो अगर राजकारणातील, तेथेही माणसांच्या अपेक्षा उंचावत आहेत. त्या प्रमाणात अपेक्षा झटपट पूर्ण होत नसल्याने माणसात नैराश्येची भावना वाढीस लागत आहे. कमी वेळेत झटपट पैसा मिळवण्यासाठी स्वत:ची दगदग वाढवून घेऊन माणसाला व्याधीने ग्रासले आहे. त्यातून अंतिम क्षणी पदरात फक्त नैराश्यच पडत चालले आहे. त्यामुळे नैराश्येतून आत्महत्यासारखे टोकाचे निर्णय घेतले जात आहेत. आत्महत्या केल्यामुळे प्रश्न सुटत नाहीत तर ते अधिक जटील होतात. त्या व्यक्तीवर अवलंबून असणारे सारे कुटुंबच उघड्यावर पडते. त्यामुळे एखाद्या घटनेचा धक्का बसला अगर नुकसान झाले तर काही वेळ शांत राहण्याची सहनशीलता बाळगण्याची आवश्यकता आहे, पण आत्महत्या हा मार्ग नव्हे, हे आपण समजून घेतले पाहिजे.

सध्या महाराष्ट्रातही आत्महत्येचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. गेल्या सव्वा दोन वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल १३३० जणांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांकडे झाली. यामध्ये पुरुषांचे प्रमाण मोठे आहे. यापूर्वी महिलेचा छळ झाल्याने महिलेच्या आत्महत्येच्या प्रमाणात मोठी वाढ असायची, त्याच्या नोंदीही पोलीस डायरीत भरायच्या; पण सध्या महिलाही सक्षम बनल्या. पुरुषांच्या खांद्याला -खांदा लावून काम करू लागल्या. त्यामुळे महिलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण कमी होत आले. ही समाधानकारक बाब आहे.

नैराश्येचे वाढते प्रमाण

उद्योग-व्यवसायातील मंदी, आर्थिक नुकसान, प्रेम प्रकरणातील निराशा, कौटुंबिक अडचणी, प्रदीर्घ आजारपण, वाढती व्यसनाधीनता, कोरोनामुळे उद्‌ध्वस्त झालेले जीवनमान आदी संकटांचा सामना करताना अनेकांचा जीव मेटाकुटीस आला आहे. त्यातून आत्महत्येचे विचार वाढत आहेत. विशेषत; पुरुषांमध्येच आत्महत्येचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

आत्महत्या प्रमाण

१) २०१९ वर्षे : ५७० (पुरुष-४४०, महिला-१३०)

२) २०२० वर्षे : ६१९ (पुरुष-४६५, महिला-१५४)

३) जानेवारी ते एप्रिल २०२१ : १४१ (पुरुष-९२, महिला-४९)