शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

महिलांपेक्षा तिप्पट संख्येने वाढल्या पुरुषांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : व्यवसायातील नुकसान, कौटुंबिक अडचणी, कोरोनामुळे उद्‌ध्वस्त झालेले जीवनमान, दीर्घ आजार आदी कारणांमुळे माणसांमध्ये नैराश्येची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : व्यवसायातील नुकसान, कौटुंबिक अडचणी, कोरोनामुळे उद्‌ध्वस्त झालेले जीवनमान, दीर्घ आजार आदी कारणांमुळे माणसांमध्ये नैराश्येची भावना वाढत आहे. गेल्या सव्वा दोन वर्षात जिल्ह्यात तब्बल १३३० जणांनी स्वत:चे जीवन संपवले. या आत्महत्येमध्ये सुमारे ९९७ पुरुषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आत्महत्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण तिप्पट आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीतही नैराश्येची भावना वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

स्पर्धात्मक युगात माणसाच्या कामाची गती प्रचंड वाढली. स्पर्धा व्यवसायातील असो अगर राजकारणातील, तेथेही माणसांच्या अपेक्षा उंचावत आहेत. त्या प्रमाणात अपेक्षा झटपट पूर्ण होत नसल्याने माणसात नैराश्येची भावना वाढीस लागत आहे. कमी वेळेत झटपट पैसा मिळवण्यासाठी स्वत:ची दगदग वाढवून घेऊन माणसाला व्याधीने ग्रासले आहे. त्यातून अंतिम क्षणी पदरात फक्त नैराश्यच पडत चालले आहे. त्यामुळे नैराश्येतून आत्महत्यासारखे टोकाचे निर्णय घेतले जात आहेत. आत्महत्या केल्यामुळे प्रश्न सुटत नाहीत तर ते अधिक जटील होतात. त्या व्यक्तीवर अवलंबून असणारे सारे कुटुंबच उघड्यावर पडते. त्यामुळे एखाद्या घटनेचा धक्का बसला अगर नुकसान झाले तर काही वेळ शांत राहण्याची सहनशीलता बाळगण्याची आवश्यकता आहे, पण आत्महत्या हा मार्ग नव्हे, हे आपण समजून घेतले पाहिजे.

सध्या महाराष्ट्रातही आत्महत्येचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. गेल्या सव्वा दोन वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल १३३० जणांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांकडे झाली. यामध्ये पुरुषांचे प्रमाण मोठे आहे. यापूर्वी महिलेचा छळ झाल्याने महिलेच्या आत्महत्येच्या प्रमाणात मोठी वाढ असायची, त्याच्या नोंदीही पोलीस डायरीत भरायच्या; पण सध्या महिलाही सक्षम बनल्या. पुरुषांच्या खांद्याला -खांदा लावून काम करू लागल्या. त्यामुळे महिलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण कमी होत आले. ही समाधानकारक बाब आहे.

नैराश्येचे वाढते प्रमाण

उद्योग-व्यवसायातील मंदी, आर्थिक नुकसान, प्रेम प्रकरणातील निराशा, कौटुंबिक अडचणी, प्रदीर्घ आजारपण, वाढती व्यसनाधीनता, कोरोनामुळे उद्‌ध्वस्त झालेले जीवनमान आदी संकटांचा सामना करताना अनेकांचा जीव मेटाकुटीस आला आहे. त्यातून आत्महत्येचे विचार वाढत आहेत. विशेषत; पुरुषांमध्येच आत्महत्येचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

आत्महत्या प्रमाण

१) २०१९ वर्षे : ५७० (पुरुष-४४०, महिला-१३०)

२) २०२० वर्षे : ६१९ (पुरुष-४६५, महिला-१५४)

३) जानेवारी ते एप्रिल २०२१ : १४१ (पुरुष-९२, महिला-४९)