शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Kolhapur: मेकरच्या संचालकांची अडीच कोटींची संपत्ती जप्त, मुख्य सूत्रधारासह १३ संशयितांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 11:42 IST

मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ५६ कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक 

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची ५६ कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मेकर ॲग्रो इंडिया प्रायव्हेट ग्रुपच्या २३ जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील १३ जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांची सुमारे अडीच कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती, तपास अधिकारी पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.मेकर ॲग्रो कंपनीने गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित केले. २०१० ते २०१८ या कालावधीत गुंतवणूकदारांची ५६ कोटी ५२ लाखांची फसवणूक केली. याबाबत डिसेंबर २०१८ मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी २३ संशयितांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, प्राथमिक तपास झाल्यानंतर पुढे या गुन्ह्याचा तपास रखडला होता.अखेर गुंतवणूकदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायाधीशांच्या आदेशाने तपासाला गती आली आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची सूत्रे स्वीकारल्यानंतर १० संशयितांना अटक केली. यात गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार रमेश महादेव वळसे-पाटील आणि त्याच्या पत्नीचाही समावेश आहे. अटकेतील संशयितांची दोन कोटी ३५ लाख १४ हजार ९३७ रुपयांची स्थावर मालमत्ता पोलिसांनी जप्त केली. तसेच दोन लाख १० हजारांची जंगम मालमत्ता जप्त केली. बँकेतील एक लाखाची मुदत ठेवही गोठविण्यात आली आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.आणखी मालमत्तांचा शोधया गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार रमेश वळसे-पाटील याच्या आकुर्डी (पुणे) आणि कारकुडी (ता. खेड, जि. रत्नागिरी) येथील फ्लॅटची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या दोन्ही मालमत्तांचे शासकीय मूल्यांकन करून जप्तीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. अन्य संशयितांच्या मालमत्तांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी