शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

करा दावा, आधी उमेदवार कोण हे तरी ठरवा...! काँग्रेसची स्थिती

By विश्वास पाटील | Updated: August 12, 2023 08:01 IST

 पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आजपासून दोन दिवस दोन्ही मतदारसंघांची  तयारीसाठी बैठक होत आहे.

विश्वास पाटील

कोल्हापूर : बंडामुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस कमकुवत झाल्याने लोकसभेसाठी काँग्रेसला संधी आणि त्या पक्षाची जबाबदारीही आता वाढली आहे. कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवण्याची काँग्रेसला तब्बल २५ वर्षांनंतर संधी आली आहे. फक्त या पक्षाकडे सद्य:स्थितीत ही निवडणूक लढवायची कुणी, हाच प्रश्न आहे.  पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आजपासून दोन दिवस दोन्ही मतदारसंघांची  तयारीसाठी बैठक होत आहे. या बैठकीत कोल्हापूर मतदारसंघावर पक्ष जरूर दावा सांगेल; परंतु उमेदवार कोण, हा गुंता सोडविल्याशिवाय लढत सोपी नाही. शिवसेनेतील आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर काँग्रेसबद्दल जनमानसात पुन्हा सहानुभूती तयार होताना दिसत आहे. परंतु ती मतपेटीपर्यंत नेण्यासाठी तगडा उमेदवार व नेत्यांची एकी महत्त्वाची आहे. 

आमदार सतेज पाटील आणि पी. एन. पाटील यांना आमदारकी सोडायची नाही.एक झेंडा खांद्यावर घेऊन आयुष्यभर वाटचाल ही पी. एन.  यांची मोठी जमेची बाजू आहे.  त्यांची उमेदवारी ही विजयाचे नाणे आहे; परंतु ते लोकसभा अंगाला लावून घ्यायला तयार नाहीत. अशा स्थितीत पक्षाकडे भक्कम पर्याय नाही. पक्षाकडे आताच्या घडीला बाजीराव खाडे, चेतन नरके यांनी उमेदवारी मागितली आहे.

करवीर विधानसभा मतदारसंघातील राजकारणातून पी. एन. यांना नरके हवे आहेत. परंतु सतेज पाटील यांनी अजून त्यांना ग्रीन सिग्नल दिलेला नाही.  खाडे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ आहेत; परंतु लोकसभेसाठी तेवढीच पात्रता पुरेशी ठरत नाही.    आमदार सतेज पाटील यांनी राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांतही  संघटनात्मक बांधणी केली आहे.  अशा स्थितीत  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस हवा निर्माण करू शकते.

 हातकणंगलेत शेट्टी यांना बाय शक्य.. 

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ हे भाजपसोबत गेल्याने राष्ट्रवादी (पवार गट) कमकुवत झाला. गेल्या निवडणुकीत दोन्ही जागा भाजप-शिवसेनेने जिंकल्या होत्या. महाविकास आघाडीतील ठाकरे शिवसेनेकडे उमेदवार असले तरी सहाही मतदारसंघांत राजकीय ताकद कमी आहे. याउलट काँग्रेसची स्थिती आहे. हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडी राजू शेट्टी यांनाच बाय देण्याच्या स्थितीत दिसते.

 कोल्हापूरला १९९९ पासून हात गायब

कोल्हापूर मतदारसंघ १९७१ पासून तब्बल सातवेळा या पक्षाकडे राहिला. पक्षात फुट पडून राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर १९९९ ला पक्षाचे दोन्ही मतदारसंघातील उमेदवार अनुक्रमे उदयसिंहराव गायकवाड आणि कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा पराभव झाला. कोल्हापुरात त्यानंतर काँग्रेसच्या वाट्याला ही जागाच आली नाही. इचलकरंजीत मात्र जातीच्या राजकारणाचा विचार करून राष्ट्रवादीनेच ही जागा काँग्रेसला दिली व तिथे कल्लाप्पाण्णा आवाडे २०१४ ला लढले; परंतु त्यांचा पराभव झाला.

ताकद तगडी असूनही.. 

ठाकरे गटात फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेले. त्यामुळे त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे. आता भाजप-शिंदे शिवसेना व अजित पवार राष्ट्रवादी ही पक्षीय ताकद तसेच केंद्र व राज्यातील सत्तेची आर्थिक, माध्यमीय ताकद त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे हे आव्हान तगडे आहे; परंतु तरीही वेगवेगळ्या माध्यम संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये शिंदे शिवसेनेच्या चौदापैकी दोनच जागा (श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळेे) सुरक्षित असल्याचे चित्र पुढे येत आहे. ते तसेच कायम राहिल्यास भाजपकडून उमेदवार बदलण्याची शक्यता जास्त आहे. खासदार संजय मंडलिक व खासदार माने यांना भाजपने आजही स्वीकारलेले दिसत नाही.

 कोल्हापूर लोकसभेचे १९७१ पासूनचे खासदार 

१९७१ : राजाराम दादासाहेब निंबाळकर (काँग्रेस)१९७७ : दाजीबा बळवंतराव देसाई (शेकाप)१९८० : उदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस)१९८४ : उदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस)१९८९ : उदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस)१९९१ : उदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस)१९९६ : उदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस)१९९८ : सदाशिवराव मंडलिक (काँग्रेस)१९९९ : सदाशिवराव मंडलिक (राष्ट्रवादी)२००४ : सदाशिवराव मंडलिक (राष्ट्रवादी)२००९ : सदाशिवराव मंडलिक (अपक्ष-काँग्रेस सहयोगी सदस्य)२०१४ : धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)२०१९ : प्रा. संजय मंडलिक (शिवसेना)

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील