शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दाढीवाल्या बाबांनी महागाई लादली, संध्याताई सव्वालाखे यांचे भाजपवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 11:23 IST

देशात २०१४ ला सत्तांतर झाले आणि दाढीवाले बाबा सत्तेवर आले. सर्वसामान्य जनतेला वाटलं आता महागाई कमी होईल, रोजगार मिळतील, महिलांवरील अत्याचार कमी होतील. पण उलटेच घडले.

कोल्हापूर : देशात २०१४ ला सत्तांतर झाले आणि दाढीवाले बाबा सत्तेवर आले. सर्वसामान्य जनतेला वाटलं आता महागाई कमी होईल, रोजगार मिळतील, महिलांवरील अत्याचार कमी होतील. पण उलटेच घडले. दाढीवाले बाबा आले आणि त्यांनी महागाई लादली. महिलांवर अत्याचार वाढले, लोकांचे रोजगार गेले, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

बुधवारी रात्री लक्ष्मीपुरी येथे घेण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. केंद्रातील भाजप सरकार महिलांविरोधी असल्याचे सांगत सव्वालाखे म्हणाल्या की, महिलांवर सर्वाधिक अत्याचार उत्तरप्रदेशात होत आहेत. पण आमच्या विचित्रा (चित्रा) वाघ त्यावर बोलत नाहीत.

दाढीवाले बाबा बेटी बचाव, बेटी पढावचा नारा देतात, पण त्यांना महिलांवरील अत्याचार दूर करता आले नाहीत. साडेतीनशे रुपये गॅस सिलिंडर झाले, तेव्हा स्मृती इराणी डोक्यावर सिलिंडर घेऊन संसदेच्या दारात नाचल्या होत्या. आता एक हजारावर गॅस गेला, मग या इराणी बाई कोठे गेल्या?

यावेळी हर्षल सुर्वे, भारती पोवार, कल्याणी माणगावे यांचीही भाषणे झाली. सरलाताई पाटील, संध्या घोटणे, सुलोचना नाईकवडे, स्मिता गवळी, निलोफर आजरेकर, हरिदास सोनवणे, गशी आजरेकर, आश्पाक आजरेकर उपस्थित होते.

कोल्हापूरच्या संस्कृतीच पायमल्ली : मालोजीराजे

निवडणुकीच्या दरम्यान मतदारांना भीती घालणे, कार्यकर्त्यांना धमक्या देणे, पायताण हातात घेण्याची भाषा करणे असले प्रकार यापूर्वी कधीही कोल्हापुरात घडले नाहीत. पण या निवडणुकीत भाजपकडून असले प्रकार घडले. त्यांनी कोल्हापूरच्या संस्कृतीची पायमल्ली केल्याची टीका मालोजीराजे यांनी केली.

त्यावेळी तुमचे हिंदुत्व कोठे गेले? : क्षीरसागर

गणपती उत्सव आला की चंद्रकांत पाटील यांनी गणेशोत्सवात साऊंड सिस्टीम लावायचा नाही म्हणून अनेकांना पैसे दिले, मंडळांना पैसे वाटले. मग त्यावेळी तुमचे हिंदुत्व कोठे गेले होते? अशी विचारणा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली. जातीपातीचे राजकारण शिवसेना करीत नसून भाजप करीत असल्याचे आराेप त्यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसInflationमहागाईNarendra Modiनरेंद्र मोदी