शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

Maharashtra Gram Panchayat Election Results: 'एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील'

By कुणाल गवाणकर | Updated: January 18, 2021 17:23 IST

Maharashtra Gram Panchayat Election Results: काँग्रेस, राष्ट्रवादीला हाताशी घेऊनही चंद्रकांत पाटील अपयशी; खानापुरात शिवसेनेची सरशी

कोल्हापूर: अनेकांना पुण्यात सेटल व्हावंसं वाटतं. मात्र मला तसं वाटत नाही. त्यामुळे मी कोल्हापुरला परत जाणार नाही, असं म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच गावात धक्का बसला आहे. कोल्हापुरातल्या खानापुरात भाजपला जोरदार धक्का बसला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपनं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली होती. मात्र तरीही शिवसेनेनं भाजपला धक्का दिला. त्यामुळे भाजपप्रणित पॅनलला सत्ता गमवावी लागली आहे.गारगोटीजवळ असलेल्या खानापूर गावामध्ये शिवसेनाप्रणित पॅनेलने ९ पैकी ६ जागा जिंकून चंद्रकांत पाटलांना धक्का दिला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना खानापूरमध्ये वेगळीच युती पाहायला मिळाली. राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असं चित्र असताना खानापुरात शिवसेना विरुद्ध भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस असा सामना होता. मात्र तरीही शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटानं सरशी साधली. हा पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.खानापूरमधील ग्रामस्थांनी दिलेला कौल आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. 'खानापूर माझं गाव आहे. ते माझ्या मतदारसंघात येत नाही. माझा मतदारसंघ कोथरुड आहे. पण तरीही खानापूरातील जनतेनं दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. खानापुरात आमचा काही दारूण पराभव झालेला नाही. ६ पैकी ३ जागा भाजपला मिळाल्या आहेत. या जागा आम्ही २००-२०० च्या अंतरानं जिंकल्या आहेत. एक जागा आम्ही १७ मतांनी, तर दुसरी ६३ मतांनी आमच्या हातून गेली. अन्यथा निकाल ५-४ लागला असता. पण दोन जागा थोडक्यात हातून गेल्यानं निकाल ६-३ असा लागला,' असं पाटील म्हणाले. एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील आणि तिथे आमची विजयी घोडदौड सुरू असल्याचं त्यांनी पुढे म्हटलं. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलPrakash abitkarप्रकाश आबिटकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस