शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Maharashtra Gram Panchayat Election Results: 'एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील'

By कुणाल गवाणकर | Updated: January 18, 2021 17:23 IST

Maharashtra Gram Panchayat Election Results: काँग्रेस, राष्ट्रवादीला हाताशी घेऊनही चंद्रकांत पाटील अपयशी; खानापुरात शिवसेनेची सरशी

कोल्हापूर: अनेकांना पुण्यात सेटल व्हावंसं वाटतं. मात्र मला तसं वाटत नाही. त्यामुळे मी कोल्हापुरला परत जाणार नाही, असं म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच गावात धक्का बसला आहे. कोल्हापुरातल्या खानापुरात भाजपला जोरदार धक्का बसला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपनं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली होती. मात्र तरीही शिवसेनेनं भाजपला धक्का दिला. त्यामुळे भाजपप्रणित पॅनलला सत्ता गमवावी लागली आहे.गारगोटीजवळ असलेल्या खानापूर गावामध्ये शिवसेनाप्रणित पॅनेलने ९ पैकी ६ जागा जिंकून चंद्रकांत पाटलांना धक्का दिला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना खानापूरमध्ये वेगळीच युती पाहायला मिळाली. राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असं चित्र असताना खानापुरात शिवसेना विरुद्ध भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस असा सामना होता. मात्र तरीही शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटानं सरशी साधली. हा पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.खानापूरमधील ग्रामस्थांनी दिलेला कौल आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. 'खानापूर माझं गाव आहे. ते माझ्या मतदारसंघात येत नाही. माझा मतदारसंघ कोथरुड आहे. पण तरीही खानापूरातील जनतेनं दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. खानापुरात आमचा काही दारूण पराभव झालेला नाही. ६ पैकी ३ जागा भाजपला मिळाल्या आहेत. या जागा आम्ही २००-२०० च्या अंतरानं जिंकल्या आहेत. एक जागा आम्ही १७ मतांनी, तर दुसरी ६३ मतांनी आमच्या हातून गेली. अन्यथा निकाल ५-४ लागला असता. पण दोन जागा थोडक्यात हातून गेल्यानं निकाल ६-३ असा लागला,' असं पाटील म्हणाले. एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील आणि तिथे आमची विजयी घोडदौड सुरू असल्याचं त्यांनी पुढे म्हटलं. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलPrakash abitkarप्रकाश आबिटकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस