शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

Maharashtra Floods : राज्यभरातून महावितरणचे अनेक हात कोल्हापूरच्या मदतीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 11:59 IST

पुरामुळे रोहित्र, खांब, वीजमीटर तसेच अनेक तांत्रिक साहित्य नादुरुस्त झाले आहेत. ते बदलण्यासाठी शनिवारपासून राज्यभरातून साहित्य घेऊन 50 ट्रक कोल्हापूर-सांगलीकडे निघाले आहेत.

ठळक मुद्देपुरामुळे रोहित्र, खांब, वीजमीटर तसेच अनेक तांत्रिक साहित्य नादुरुस्त झाले आहेत. राज्यभरातून साहित्य घेऊन 50 ट्रक कोल्हापूर-सांगलीकडे निघाले आहेत.वीजवाहिन्यांसाठी लागणारे रिले बोटीच्या साह्याने कोल्हापुरात पोहोचले देखील आहेत.

प्रवीण देसाई

कोल्हापूर -  पुरामुळे रोहित्र, खांब, वीजमीटर तसेच अनेक तांत्रिक साहित्य नादुरुस्त झाले आहेत. ते बदलण्यासाठी शनिवारपासून राज्यभरातून साहित्य घेऊन 50 ट्रक कोल्हापूर-सांगलीकडे निघाले आहेत. यातील 7 ट्रक शिरोली येथे दाखल झाले असून पुणे-बंगळुरू महामार्गावर अजूनही जवळपास चार फूट पाणी असल्याने ते तिथे थांबले आहेत. पाणी ओसल्यावर ते कोल्हापूरमध्ये येतील.

महावितरणचे राज्यभरातील हजारो हात कोल्हापूर व सांगलीचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मदतीला धावून आहेत. पुणे, सातारा, सोलापूर, कल्याण, औरंगाबाद, परभणी यासह राज्यभरातून नवीन रोहित्र, खांब, मीटर आदी सहित्याचे जवळपास 50 ट्रक कोल्हापूर, सांगलीकडे येत आहेत. यामध्ये 100 किलोव्हॅटची 46 रोहित्रे, 5000 थ्री फ़ेज मीटर यांचा समावेश आहे. तसेच वीजवाहिन्यांसाठी लागणारे रिले बोटीच्या साह्याने कोल्हापुरात पोहोचले देखील आहेत. सर्व साहित्य पूर ओसरण्यापूर्वीच पोहचविण्यासाठी महावितरण प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर काटेकोर नियोजन केले आहे.

महापुरामुळे दोन जिल्ह्यातील 3 लाखांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खबरदारीपोटी खंडित करावा लागला होता. शनिवारपासून पाणीपातळी संथ गतीने कमी होत आहे. तसा खंडित झालेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या कामानेही वेग घेतला आहे. कोल्हापूर शहरातील विक्रमनगर भागातील 10 रोहित्र व त्यावरील 1 हजार ग्राहक, शुक्रवार गेट वाहिनीवरील  5 हजार व लक्ष्मीपुरी भागातील 1 हजार 400 अशा 36 रोहित्र व त्यावरील 7 हजार 400 ग्राहकांचा वीजपुरवठा आज सुरळीत करण्यास महावितरण शहर विभागाला यश आले. 

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात 38 हजार व आतापर्यंत 94 हजार 353 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण युद्धपातळीवर प्रयत्न करत असून शनिवारी दिवसभरात दोन जिल्ह्यातील मिळून 44 हजार 773 तर आतापर्यंत तीन दिवसांत 1 लाख 11 हजार 467 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

ग्रीन कॉरिडॉर करणा

ग्रीन कॉरिडॉर द्वारे साहित्य शहरात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.  वीज ही अत्यावश्यक बाब असल्याने वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून शिरोली येथे थांबलेले ट्रक पाणी ओसरल्यावर ग्रीन कॉरिडॉरद्वारे शहरात आणण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरRainपाऊसelectricityवीज