शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

Maharashtra Floods : राज्यभरातून महावितरणचे अनेक हात कोल्हापूरच्या मदतीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 11:59 IST

पुरामुळे रोहित्र, खांब, वीजमीटर तसेच अनेक तांत्रिक साहित्य नादुरुस्त झाले आहेत. ते बदलण्यासाठी शनिवारपासून राज्यभरातून साहित्य घेऊन 50 ट्रक कोल्हापूर-सांगलीकडे निघाले आहेत.

ठळक मुद्देपुरामुळे रोहित्र, खांब, वीजमीटर तसेच अनेक तांत्रिक साहित्य नादुरुस्त झाले आहेत. राज्यभरातून साहित्य घेऊन 50 ट्रक कोल्हापूर-सांगलीकडे निघाले आहेत.वीजवाहिन्यांसाठी लागणारे रिले बोटीच्या साह्याने कोल्हापुरात पोहोचले देखील आहेत.

प्रवीण देसाई

कोल्हापूर -  पुरामुळे रोहित्र, खांब, वीजमीटर तसेच अनेक तांत्रिक साहित्य नादुरुस्त झाले आहेत. ते बदलण्यासाठी शनिवारपासून राज्यभरातून साहित्य घेऊन 50 ट्रक कोल्हापूर-सांगलीकडे निघाले आहेत. यातील 7 ट्रक शिरोली येथे दाखल झाले असून पुणे-बंगळुरू महामार्गावर अजूनही जवळपास चार फूट पाणी असल्याने ते तिथे थांबले आहेत. पाणी ओसल्यावर ते कोल्हापूरमध्ये येतील.

महावितरणचे राज्यभरातील हजारो हात कोल्हापूर व सांगलीचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मदतीला धावून आहेत. पुणे, सातारा, सोलापूर, कल्याण, औरंगाबाद, परभणी यासह राज्यभरातून नवीन रोहित्र, खांब, मीटर आदी सहित्याचे जवळपास 50 ट्रक कोल्हापूर, सांगलीकडे येत आहेत. यामध्ये 100 किलोव्हॅटची 46 रोहित्रे, 5000 थ्री फ़ेज मीटर यांचा समावेश आहे. तसेच वीजवाहिन्यांसाठी लागणारे रिले बोटीच्या साह्याने कोल्हापुरात पोहोचले देखील आहेत. सर्व साहित्य पूर ओसरण्यापूर्वीच पोहचविण्यासाठी महावितरण प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर काटेकोर नियोजन केले आहे.

महापुरामुळे दोन जिल्ह्यातील 3 लाखांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खबरदारीपोटी खंडित करावा लागला होता. शनिवारपासून पाणीपातळी संथ गतीने कमी होत आहे. तसा खंडित झालेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या कामानेही वेग घेतला आहे. कोल्हापूर शहरातील विक्रमनगर भागातील 10 रोहित्र व त्यावरील 1 हजार ग्राहक, शुक्रवार गेट वाहिनीवरील  5 हजार व लक्ष्मीपुरी भागातील 1 हजार 400 अशा 36 रोहित्र व त्यावरील 7 हजार 400 ग्राहकांचा वीजपुरवठा आज सुरळीत करण्यास महावितरण शहर विभागाला यश आले. 

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात 38 हजार व आतापर्यंत 94 हजार 353 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण युद्धपातळीवर प्रयत्न करत असून शनिवारी दिवसभरात दोन जिल्ह्यातील मिळून 44 हजार 773 तर आतापर्यंत तीन दिवसांत 1 लाख 11 हजार 467 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

ग्रीन कॉरिडॉर करणा

ग्रीन कॉरिडॉर द्वारे साहित्य शहरात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.  वीज ही अत्यावश्यक बाब असल्याने वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून शिरोली येथे थांबलेले ट्रक पाणी ओसरल्यावर ग्रीन कॉरिडॉरद्वारे शहरात आणण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरRainपाऊसelectricityवीज