शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Floods : राज्यभरातून महावितरणचे अनेक हात कोल्हापूरच्या मदतीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 11:59 IST

पुरामुळे रोहित्र, खांब, वीजमीटर तसेच अनेक तांत्रिक साहित्य नादुरुस्त झाले आहेत. ते बदलण्यासाठी शनिवारपासून राज्यभरातून साहित्य घेऊन 50 ट्रक कोल्हापूर-सांगलीकडे निघाले आहेत.

ठळक मुद्देपुरामुळे रोहित्र, खांब, वीजमीटर तसेच अनेक तांत्रिक साहित्य नादुरुस्त झाले आहेत. राज्यभरातून साहित्य घेऊन 50 ट्रक कोल्हापूर-सांगलीकडे निघाले आहेत.वीजवाहिन्यांसाठी लागणारे रिले बोटीच्या साह्याने कोल्हापुरात पोहोचले देखील आहेत.

प्रवीण देसाई

कोल्हापूर -  पुरामुळे रोहित्र, खांब, वीजमीटर तसेच अनेक तांत्रिक साहित्य नादुरुस्त झाले आहेत. ते बदलण्यासाठी शनिवारपासून राज्यभरातून साहित्य घेऊन 50 ट्रक कोल्हापूर-सांगलीकडे निघाले आहेत. यातील 7 ट्रक शिरोली येथे दाखल झाले असून पुणे-बंगळुरू महामार्गावर अजूनही जवळपास चार फूट पाणी असल्याने ते तिथे थांबले आहेत. पाणी ओसल्यावर ते कोल्हापूरमध्ये येतील.

महावितरणचे राज्यभरातील हजारो हात कोल्हापूर व सांगलीचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मदतीला धावून आहेत. पुणे, सातारा, सोलापूर, कल्याण, औरंगाबाद, परभणी यासह राज्यभरातून नवीन रोहित्र, खांब, मीटर आदी सहित्याचे जवळपास 50 ट्रक कोल्हापूर, सांगलीकडे येत आहेत. यामध्ये 100 किलोव्हॅटची 46 रोहित्रे, 5000 थ्री फ़ेज मीटर यांचा समावेश आहे. तसेच वीजवाहिन्यांसाठी लागणारे रिले बोटीच्या साह्याने कोल्हापुरात पोहोचले देखील आहेत. सर्व साहित्य पूर ओसरण्यापूर्वीच पोहचविण्यासाठी महावितरण प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर काटेकोर नियोजन केले आहे.

महापुरामुळे दोन जिल्ह्यातील 3 लाखांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खबरदारीपोटी खंडित करावा लागला होता. शनिवारपासून पाणीपातळी संथ गतीने कमी होत आहे. तसा खंडित झालेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या कामानेही वेग घेतला आहे. कोल्हापूर शहरातील विक्रमनगर भागातील 10 रोहित्र व त्यावरील 1 हजार ग्राहक, शुक्रवार गेट वाहिनीवरील  5 हजार व लक्ष्मीपुरी भागातील 1 हजार 400 अशा 36 रोहित्र व त्यावरील 7 हजार 400 ग्राहकांचा वीजपुरवठा आज सुरळीत करण्यास महावितरण शहर विभागाला यश आले. 

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात 38 हजार व आतापर्यंत 94 हजार 353 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण युद्धपातळीवर प्रयत्न करत असून शनिवारी दिवसभरात दोन जिल्ह्यातील मिळून 44 हजार 773 तर आतापर्यंत तीन दिवसांत 1 लाख 11 हजार 467 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

ग्रीन कॉरिडॉर करणा

ग्रीन कॉरिडॉर द्वारे साहित्य शहरात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.  वीज ही अत्यावश्यक बाब असल्याने वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून शिरोली येथे थांबलेले ट्रक पाणी ओसरल्यावर ग्रीन कॉरिडॉरद्वारे शहरात आणण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरRainपाऊसelectricityवीज