शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

Maharashtra Election 2019 : राहुल गांधी यांनी मैदान सोडले : अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 16:28 IST

लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील निवडणूक महत्त्वाची असताना काँग्रेस पक्ष पळ काढत आहे. राहुल गांधी हे मैदान सोडून बाहेर गेले आहेत. त्यांनी उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहणे गरजेचे होते. त्यांनी आत्ताच पराभव मान्य केला आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी येथे केली.

ठळक मुद्देनिवडणूक महत्त्वाची असताना राहुल गांधी यांनी मैदान सोडले : अमित शहाकोल्हापूर विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत

कोल्हापूर : लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील निवडणूक महत्त्वाची असताना काँग्रेस पक्ष पळ काढत आहे. राहुल गांधी हे मैदान सोडून बाहेर गेले आहेत. त्यांनी उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहणे गरजेचे होते. त्यांनी आत्ताच पराभव मान्य केला आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी येथे केली.जत (जि. सांगली) येथील सभेला जाण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर सकाळी सव्वा अकराच्या सुमारास गृहमंत्री शहा आले. त्यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करताना त्यांनी कोल्हापूरमधील मतदारसंघांचा आढावा घेतला. त्यानंतर गृहमंत्री शहा म्हणाले, आम्ही त्रिपुरामध्ये मंडई आणि रस्त्यावर उभे राहून भाजपचे २५० सदस्य बनवले. त्यानंतर एक हजार लोकांची सभा घेतली.

त्रिपुरात सध्या भाजप सत्तेत आहे. महाराष्ट्रात महायुतीचे २२० हून अधिक उमेदवार निवडून येतील. दरम्यान, गृहमंत्री शहा यांचे विमानतळावर आगमन होताच भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी पुष्पगुच्छ त्यांचे स्वागत केले.

यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपा प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, भाजपा सरचिटणीस विजय जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, आदी उपस्थित होते.कोल्हापूरमध्ये सभा घेण्याचा प्रयत्न करुराज्यात अनेक ठिकाणी या आठवड्यात सभांचे नियोजन असल्याने कोल्हापूरसाठी वेळ मिळणे अवघड आहे. शेवटच्या दोन दिवसात शक्य झाल्यास कोल्हापूरमध्ये सभा घेण्याचा प्रयत्न करु असे मंत्री शहा यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना सांगितले. पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद साधल्यानंतर खासगी हेलिकॉप्टरने जतच्या दिशेने ते निघून गेले. शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता.ज्यादा जागा मिळायला हव्या होत्याजिल्ह्यातील बंडखोर उमेदवार आणि ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवित आहेत ते गृहमंत्री शहा यांनी जाणून घेतले. कोल्हापुरात कॉँग्रेसकडून अद्याप मोठी प्रचार सभा झाली नसल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी देताच शहा यांनी काँग्रेसवर टीका केली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर जिल्हा पिंजून काढत असल्याचे राहूल चिकोडे यांनी सांगितले. भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात ज्यादा जागा मिळायला हव्या होत्या, अशी अपेक्षा महेश जाधव यांनी व्यक्त केली. आई अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी पुन्हा कोल्हापूर मध्ये येण्याची विनंती जाधव यांनी केली.

 

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाkolhapurकोल्हापूर