शहरं
Join us  
Trending Stories
1
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
2
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
3
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
4
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
5
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
6
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
7
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
8
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
9
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
10
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
11
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
12
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
13
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
14
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
15
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
16
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
17
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
18
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
19
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
20
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा

Maharashtra Election 2019 : राहुल गांधी यांनी मैदान सोडले : अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 16:28 IST

लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील निवडणूक महत्त्वाची असताना काँग्रेस पक्ष पळ काढत आहे. राहुल गांधी हे मैदान सोडून बाहेर गेले आहेत. त्यांनी उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहणे गरजेचे होते. त्यांनी आत्ताच पराभव मान्य केला आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी येथे केली.

ठळक मुद्देनिवडणूक महत्त्वाची असताना राहुल गांधी यांनी मैदान सोडले : अमित शहाकोल्हापूर विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत

कोल्हापूर : लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील निवडणूक महत्त्वाची असताना काँग्रेस पक्ष पळ काढत आहे. राहुल गांधी हे मैदान सोडून बाहेर गेले आहेत. त्यांनी उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहणे गरजेचे होते. त्यांनी आत्ताच पराभव मान्य केला आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी येथे केली.जत (जि. सांगली) येथील सभेला जाण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर सकाळी सव्वा अकराच्या सुमारास गृहमंत्री शहा आले. त्यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करताना त्यांनी कोल्हापूरमधील मतदारसंघांचा आढावा घेतला. त्यानंतर गृहमंत्री शहा म्हणाले, आम्ही त्रिपुरामध्ये मंडई आणि रस्त्यावर उभे राहून भाजपचे २५० सदस्य बनवले. त्यानंतर एक हजार लोकांची सभा घेतली.

त्रिपुरात सध्या भाजप सत्तेत आहे. महाराष्ट्रात महायुतीचे २२० हून अधिक उमेदवार निवडून येतील. दरम्यान, गृहमंत्री शहा यांचे विमानतळावर आगमन होताच भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी पुष्पगुच्छ त्यांचे स्वागत केले.

यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपा प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, भाजपा सरचिटणीस विजय जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, आदी उपस्थित होते.कोल्हापूरमध्ये सभा घेण्याचा प्रयत्न करुराज्यात अनेक ठिकाणी या आठवड्यात सभांचे नियोजन असल्याने कोल्हापूरसाठी वेळ मिळणे अवघड आहे. शेवटच्या दोन दिवसात शक्य झाल्यास कोल्हापूरमध्ये सभा घेण्याचा प्रयत्न करु असे मंत्री शहा यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना सांगितले. पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद साधल्यानंतर खासगी हेलिकॉप्टरने जतच्या दिशेने ते निघून गेले. शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता.ज्यादा जागा मिळायला हव्या होत्याजिल्ह्यातील बंडखोर उमेदवार आणि ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवित आहेत ते गृहमंत्री शहा यांनी जाणून घेतले. कोल्हापुरात कॉँग्रेसकडून अद्याप मोठी प्रचार सभा झाली नसल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी देताच शहा यांनी काँग्रेसवर टीका केली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर जिल्हा पिंजून काढत असल्याचे राहूल चिकोडे यांनी सांगितले. भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात ज्यादा जागा मिळायला हव्या होत्या, अशी अपेक्षा महेश जाधव यांनी व्यक्त केली. आई अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी पुन्हा कोल्हापूर मध्ये येण्याची विनंती जाधव यांनी केली.

 

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाkolhapurकोल्हापूर