शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

Maharashtra Bandh : कोल्हापूर विभागातील एकही एस.टी. रस्त्यांवर धावली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 18:31 IST

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मुळे राज्य परिवहन महामंडळातील कोल्हापूर विभागातील एकही एस.टी. गुरुवारी रस्त्यावर धावली नाही. एस.टी.च्या इतिहासामध्ये प्रथमच आंदोलन काळात एस.टीची वाहतूक पूर्णपणे बंद होती. यासह रिक्षा, केएमटी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे ठप्प होती.

ठळक मुद्देकोल्हापूर विभागातील एकही एस.टी. रस्त्यांवर धावली नाहीइतिहासात प्रथमच पूर्णपणे वाहतूक बंद

कोल्हापूर : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मुळे राज्य परिवहन महामंडळातील कोल्हापूर विभागातील एकही एस.टी. गुरुवारी रस्त्यावर धावली नाही. एस.टी.च्या इतिहासामध्ये प्रथमच आंदोलन काळात एस.टीची वाहतूक पूर्णपणे बंद होती. यासह रिक्षा, केएमटी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे ठप्प होती.कोणत्याही ‘बंद’ काळात मुख्यकरून एस.टी.ची तोडफोड व जाळपोळ केली जाते. त्यामुळे एस.टी.चे मोठे नुकसान होते. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव महामंडळाच्यावतीने कोल्हापूर विभागातील सर्व वाहतूक रात्री बारानंतर पूर्णपणे बंद ठेवत प्रत्येक आगारात गाडी लावण्याबाबत चालक - वाहकांना सूचना देण्यात आल्या होत्या.

गुरुवारी दिवसभर सुरक्षिततेच्या कारणास्तव बसस्थानक व विभागीय कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद ठेवले. ‘बंद’ची माहिती अनेकांना असल्याने प्रवाशी वर्गाने गुरुवारी प्रवास करणे टाळल्याने नेहमी गजबजलेले मध्यवर्ती बसस्थानक, तसेच संभाजीनगर व रंकाळा बसस्थानकांवर दिवसभर शुकशुकाट होता.|रिक्षाचालकांनी स्वत:हून ‘बंद’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे सांयकाळपर्यंत एकही रिक्षा रस्त्यावर नव्हती; त्यामुळे लक्ष्मीपुरी, राजारामपुरी येथील प्रमुख व्यापारी पेठा, महाद्वार रोड, मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, शिवाजी रोड, ताराबाई रोड, रंकाळावेश, बिंदू चौक, राजारामपुरी मुख्य रस्ता, स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर, रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरातील रिक्षा स्टॉप मोकळे पडले होते. ‘के.एम.टी.’ने ‘बंद’मध्ये सहभागी सर्व बससेवा बंद ठेवली होती.

९३४ एस.टीं.ना ब्रेकराज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील सर्व आगारांतील ९३४ गाड्यांची वाहतूक पूर्ण बंद असल्याने विभागाचे सुमारे ७५ लाखांचे उत्पन्न बुडाले, तर दोन लाख ६० हजार किलोमीटर वाहतूक रद्द करण्यात आली.

पर्यंटकांचे हालरेल्वेने कोल्हापुरात आलेले काही पर्यटक व देवदर्शनासाठी आलेल्या नागरिकांना मात्र, एस.टी., रिक्षा व के.एम.टी. बंदचा फटका बसला. त्याना नियोजितस्थळी जाण्यासाठी पायपीट करतच जावे लागेल.

रेल्वेची वाहतूक सुरळीतरेल्वेची वाहतूक सुरळीत झाली. मात्र, प्रवाशी संख्या कमी होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. 

 

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदkolhapurकोल्हापूर