शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Maharashtra Bandh : कोल्हापूर विभागातील एकही एस.टी. रस्त्यांवर धावली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 18:31 IST

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मुळे राज्य परिवहन महामंडळातील कोल्हापूर विभागातील एकही एस.टी. गुरुवारी रस्त्यावर धावली नाही. एस.टी.च्या इतिहासामध्ये प्रथमच आंदोलन काळात एस.टीची वाहतूक पूर्णपणे बंद होती. यासह रिक्षा, केएमटी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे ठप्प होती.

ठळक मुद्देकोल्हापूर विभागातील एकही एस.टी. रस्त्यांवर धावली नाहीइतिहासात प्रथमच पूर्णपणे वाहतूक बंद

कोल्हापूर : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मुळे राज्य परिवहन महामंडळातील कोल्हापूर विभागातील एकही एस.टी. गुरुवारी रस्त्यावर धावली नाही. एस.टी.च्या इतिहासामध्ये प्रथमच आंदोलन काळात एस.टीची वाहतूक पूर्णपणे बंद होती. यासह रिक्षा, केएमटी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे ठप्प होती.कोणत्याही ‘बंद’ काळात मुख्यकरून एस.टी.ची तोडफोड व जाळपोळ केली जाते. त्यामुळे एस.टी.चे मोठे नुकसान होते. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव महामंडळाच्यावतीने कोल्हापूर विभागातील सर्व वाहतूक रात्री बारानंतर पूर्णपणे बंद ठेवत प्रत्येक आगारात गाडी लावण्याबाबत चालक - वाहकांना सूचना देण्यात आल्या होत्या.

गुरुवारी दिवसभर सुरक्षिततेच्या कारणास्तव बसस्थानक व विभागीय कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद ठेवले. ‘बंद’ची माहिती अनेकांना असल्याने प्रवाशी वर्गाने गुरुवारी प्रवास करणे टाळल्याने नेहमी गजबजलेले मध्यवर्ती बसस्थानक, तसेच संभाजीनगर व रंकाळा बसस्थानकांवर दिवसभर शुकशुकाट होता.|रिक्षाचालकांनी स्वत:हून ‘बंद’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे सांयकाळपर्यंत एकही रिक्षा रस्त्यावर नव्हती; त्यामुळे लक्ष्मीपुरी, राजारामपुरी येथील प्रमुख व्यापारी पेठा, महाद्वार रोड, मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, शिवाजी रोड, ताराबाई रोड, रंकाळावेश, बिंदू चौक, राजारामपुरी मुख्य रस्ता, स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर, रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरातील रिक्षा स्टॉप मोकळे पडले होते. ‘के.एम.टी.’ने ‘बंद’मध्ये सहभागी सर्व बससेवा बंद ठेवली होती.

९३४ एस.टीं.ना ब्रेकराज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील सर्व आगारांतील ९३४ गाड्यांची वाहतूक पूर्ण बंद असल्याने विभागाचे सुमारे ७५ लाखांचे उत्पन्न बुडाले, तर दोन लाख ६० हजार किलोमीटर वाहतूक रद्द करण्यात आली.

पर्यंटकांचे हालरेल्वेने कोल्हापुरात आलेले काही पर्यटक व देवदर्शनासाठी आलेल्या नागरिकांना मात्र, एस.टी., रिक्षा व के.एम.टी. बंदचा फटका बसला. त्याना नियोजितस्थळी जाण्यासाठी पायपीट करतच जावे लागेल.

रेल्वेची वाहतूक सुरळीतरेल्वेची वाहतूक सुरळीत झाली. मात्र, प्रवाशी संख्या कमी होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. 

 

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदkolhapurकोल्हापूर