शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

Maharashtra Bandh : कोल्हापूर विभागातील एकही एस.टी. रस्त्यांवर धावली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 18:31 IST

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मुळे राज्य परिवहन महामंडळातील कोल्हापूर विभागातील एकही एस.टी. गुरुवारी रस्त्यावर धावली नाही. एस.टी.च्या इतिहासामध्ये प्रथमच आंदोलन काळात एस.टीची वाहतूक पूर्णपणे बंद होती. यासह रिक्षा, केएमटी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे ठप्प होती.

ठळक मुद्देकोल्हापूर विभागातील एकही एस.टी. रस्त्यांवर धावली नाहीइतिहासात प्रथमच पूर्णपणे वाहतूक बंद

कोल्हापूर : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मुळे राज्य परिवहन महामंडळातील कोल्हापूर विभागातील एकही एस.टी. गुरुवारी रस्त्यावर धावली नाही. एस.टी.च्या इतिहासामध्ये प्रथमच आंदोलन काळात एस.टीची वाहतूक पूर्णपणे बंद होती. यासह रिक्षा, केएमटी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे ठप्प होती.कोणत्याही ‘बंद’ काळात मुख्यकरून एस.टी.ची तोडफोड व जाळपोळ केली जाते. त्यामुळे एस.टी.चे मोठे नुकसान होते. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव महामंडळाच्यावतीने कोल्हापूर विभागातील सर्व वाहतूक रात्री बारानंतर पूर्णपणे बंद ठेवत प्रत्येक आगारात गाडी लावण्याबाबत चालक - वाहकांना सूचना देण्यात आल्या होत्या.

गुरुवारी दिवसभर सुरक्षिततेच्या कारणास्तव बसस्थानक व विभागीय कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद ठेवले. ‘बंद’ची माहिती अनेकांना असल्याने प्रवाशी वर्गाने गुरुवारी प्रवास करणे टाळल्याने नेहमी गजबजलेले मध्यवर्ती बसस्थानक, तसेच संभाजीनगर व रंकाळा बसस्थानकांवर दिवसभर शुकशुकाट होता.|रिक्षाचालकांनी स्वत:हून ‘बंद’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे सांयकाळपर्यंत एकही रिक्षा रस्त्यावर नव्हती; त्यामुळे लक्ष्मीपुरी, राजारामपुरी येथील प्रमुख व्यापारी पेठा, महाद्वार रोड, मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, शिवाजी रोड, ताराबाई रोड, रंकाळावेश, बिंदू चौक, राजारामपुरी मुख्य रस्ता, स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर, रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरातील रिक्षा स्टॉप मोकळे पडले होते. ‘के.एम.टी.’ने ‘बंद’मध्ये सहभागी सर्व बससेवा बंद ठेवली होती.

९३४ एस.टीं.ना ब्रेकराज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील सर्व आगारांतील ९३४ गाड्यांची वाहतूक पूर्ण बंद असल्याने विभागाचे सुमारे ७५ लाखांचे उत्पन्न बुडाले, तर दोन लाख ६० हजार किलोमीटर वाहतूक रद्द करण्यात आली.

पर्यंटकांचे हालरेल्वेने कोल्हापुरात आलेले काही पर्यटक व देवदर्शनासाठी आलेल्या नागरिकांना मात्र, एस.टी., रिक्षा व के.एम.टी. बंदचा फटका बसला. त्याना नियोजितस्थळी जाण्यासाठी पायपीट करतच जावे लागेल.

रेल्वेची वाहतूक सुरळीतरेल्वेची वाहतूक सुरळीत झाली. मात्र, प्रवाशी संख्या कमी होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. 

 

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदkolhapurकोल्हापूर