शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

वस्त्रोद्योगाला सोलर सिटी बनवणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 13:39 IST

घरगुती वीज बिलात लवकरच ३० टक्के कपात केली जाईल

इचलकरंजी : आपले सरकार आल्यावर आम्ही वस्त्रोद्योगाला सोलर सिटी बनवून वीज बिलमुक्त करणार आहे. त्यामुळे वीज बिलाचा प्रश्न संपेल आणि आपल्या उत्पादन खर्चात कपात होईल. त्यातून वस्त्रोद्योगाला उभारी मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महायुतीमधील भाजपचे उमेदवार राहुल आवाडे यांची ‘विजय निर्धार सभा’ थोरात चौकात झाली. त्यावेळी ते बोलत होते.फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले आहे. येणाऱ्या काळात त्यांच्यासाठीही सोलर योजना राबविणार आहे. तसेच घरगुती वीज बिलात लवकरच ३० टक्के कपात केली जाईल. इचलकरंजी शहराला आवश्यक असलेल्या पाणी योजनेत मी स्वत: पुढाकार घेऊन त्यातून योग्य मार्ग काढून शहरवासीयांना आठवड्याचे सातही दिवस २४ तास पाणी देईन. ज्यांनी आपल्याला विरोध केला, ते राम-कृष्ण म्हणत आहेत. त्यातूनच भगव्याची जादू चालू झाल्याचे दिसते. जनतेने खरे साधू कोण आहेत आणि संधीसाधू कोण आहेत, हे ओळखावे. आता आवाडे आणि हाळवणकर एकत्र आले आहेत. म्हणजे मताधिक्याचे रेकॉर्ड ब्रेक होणार, असा विश्वास व्यक्त केला.राहुल आवाडे म्हणाले, वीज सवलतीमुळे ९२ कोटी रुपये आम्हाला दिले. विकासासाठी सव्वाशे कोटी रुपये दिले. आता पुढे सुळकूड योजना आम्हाला पाहिजे. तुम्ही मदत करून त्यात पुढाकार घेतला पाहिजे.आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, यंत्रमागासाठी मी जी योजना आणली त्याचा लाभ विरोध करणाऱ्या लोकांनीही घेतला. आता विरोधक फक्त माझ्या कुटुंबाला शिव्या देत आहेत. आम्हालाही गंमतशीर बोलता येते; पण आम्ही मर्यादा पाळतोय. शिव्या घालून विकास होत नाही.सुरेश हाळवणकर, अनिल डाळ्या, मिश्रीलाल जाजू, बाळ महाराज, अशोक स्वामी यांची भाषणे झाली. यावेळी प्रकाश दत्तवाडे, रवींद्र माने, अमृत भोसले, स्वप्निल आवाडे, सावकार मादनाईक, आदी उपस्थित होते.

मराठा समाजाचा पाठिंबाशहरातील मराठा समाजाने राहुल आवाडे यांना पाठिंबा दिला. त्यासंदर्भातील पत्रही त्यांनी फडणवीस यांना दिले. याचा राहुल यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.लाव रे तो व्हिडीओफडणवीस यांचे भाषण सुरू असताना त्यांनी आपले भाषण मध्येच थांबवून सज्जाद नोमानी यांचा व्हिडीओ लावण्याचे आवाहन केले. तो व्हिडीओ संपल्यानंतर या समाजाने महाविकास आघाडीला १७ मागण्यांचे पत्र दिले. त्याला त्यांनी मान्यता दिली, याचा उल्लेख करत चांगलाच समाचार घेतला. तसेच यांना रोखण्यासाठी मताचे धर्मयुद्ध करावे लागेल; अन्यथा पुढील पिढी माफ करणार नाही, असे सांगितले.मतांचा पाऊसआम्हाला काही लोक सांगतात, पावसात भिजलो की, आता निवडून येणार. मी त्यांना सांगतो की, निवडून येण्याकरिता मतांचा पाऊस लागतो. येथे कुठल्याही बाजूला माझी नजर गेली तर मला लोकच लोक दिसत आहेत. सर्वांत जास्त लाडक्या बहिणी दिसत आहेत. या मतांचा पाऊस पडणार.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ichalkaranji-acइचलकरंजीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024