शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Vidhan Sabha Election 2024: ठेकेदारांवरील प्रेम, कुणाचा करणार गेम; प्रचारात मुद्दा केंद्रस्थानी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 14:17 IST

जनतेच्या विकासापेक्षा ठराविक लोकांचेच भले झाल्याचा आरोप

कोल्हापूर : काही वर्षांपूर्वी एक काळ असा होता की, प्रामुख्याने बांधकाम ठेकेदार हे राजकीय नेत्यांना अगदी गरज असेल तेव्हा पडद्यामागे राहायचे आणि आर्थिक रसद पुरवायचे. परंतु काळ बदलला आणि ठेकेदारच इतके मातब्बर झाले की, ते नेत्यांनाही भारी पडू लागले. सध्या जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये या ठेकेदारांचीच चर्चा जोरात सुरू आहे. ठेकेदारांवरील प्रेम हाच काही मतदारसंघात प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला आहे. मतदारसंघाचा नव्हे तर सरकारच्या तिजोरीतून ठेकेदारांचेच भले झाल्याचा आरोप काही ठिकाणी प्रचाराच्या केंद्रस्थानी आला आहे.वीस वर्षांपूर्वी ठेकेदार सर्रास नेत्यांसोबत फिरताना दिसत नसत. विकासकामाचे भूमिपूजन करताना आणि नंतर उद्घाटनावेळी ठेकेदार दिसायचे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या की हे ठेकेदार संबंधित नेत्यांना आर्थिक मदत करायचे. त्याचा फारसा गाजावाजाही होत नसे. कारण एकतर यंत्रणा आणून कामे करणारे ठेकेदारही मर्यादित होते आणि त्यांचाही बडेजाव नसायचा.

परिस्थिती बदलू लागली. राज्याचा अर्थसंकल्प वाढायला लागला. योजना वाढल्या. साहजिकच ठेकेदारांची संख्याही वाढली. ‘साहेबांच्या’ ठेकेदारांची मुलेही सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होऊन बाजारात उतरली. पूर्वी जो ठेकेदार निवडणुकीला आतून मदत करायचा त्यालाच जिल्हा परिषद, पंचायत समितीचा सदस्य होण्याची स्वप्ने पडू लागली. मग तोदेखील जोडण्या लावू लागला. एकतर कामे वाढल्यामुळे खासदार, आमदारही आपल्या स्वीय सहायकासह प्रमुख तीन, चार ठेकेदारांवर अवलंबून राहू लागले. इतरांनाही कामाचे वाटप करायची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात येऊ लागली.कामे ‘मॅनेज’ होऊ लागली. यातून ज्यांना कामे मिळत नव्हती असे छोटे ठेकेदार टक्केवारीची बाहेर चर्चा करू लागले. खासदार, आमदारांची आणि बांधकाम विभागाच्या शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंतच्या टक्केवारीचे दरपत्रकच चर्चेत येऊ लागले. कोट्यवधींच्या योजना आणायच्या आणि त्या आपल्या पद्धतीने करायची नवी पद्धत सुरू झाली. त्याच्या दर्जाबाबत फारसे कोणी आग्रही राहिनासे झाले. चुकून एखादा अधिकारी अधिक चौकशी करू लागला तर त्यालाही दाबण्याची भाषा होऊ लागली. यातूनच मग ठेकेदार इतके मोठे झाले की नेत्यांच्या सभांना लोक आणण्यापासून ते त्यांचा अर्ज भरण्यापर्यंतच्या गर्दीत ठेकेदार दिसू लागले. निवडणुकीची बरीच यंत्रणाही ठेकेदारच हलवू लागले आहेत.

बहुतांशी बडे ठेकेदार नेत्यांचे कारभारीसध्या जिल्ह्यातील अनेक उमेदवारांची यंत्रणा राबविण्यात ठेकेदारच अग्रभागी आहेत. या योगदानाच्या बळावरच त्यांची पुढची कंत्राटे निश्चित होत असल्याने अनेकांनी पडद्यामाागे न राहता थेट व्यासपीठावरून भाषणे ठोकायलाच सुरुवात केली आहे. त्यातल्या त्यात कागल, चंदगड, भुदरगड, शाहुवाडी तालुक्यातील ठेकेदारांचा मुद्दा ऐरणीवर येऊ लागला आहे. यातूनच मग आपल्याला काम न देणाऱ्या नेत्याच्याविरोधात जिल्हा परिषदेच्या समोर उभे राहून बोलण्याची हिंमत हे ठेकेदार दाखवू लागले आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024