शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर उत्तर'मध्ये ‘काँग्रेस’ची अस्तित्वासाठी धडपड, शिवसेनेसमोर आरोप खोडून काढण्याचे आव्हान

By भारत चव्हाण | Updated: November 15, 2024 16:58 IST

भारत चव्हाण कोल्हापूर : सत्तारुढ पक्षातील ताकदवान उमेदवार विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्ता अशी लढत ‘ कोल्हापूर उत्तर’मतदार संघात होत आहे. ...

भारत चव्हाणकोल्हापूर : सत्तारुढ पक्षातील ताकदवान उमेदवार विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्ता अशी लढत ‘कोल्हापूर उत्तर’मतदार संघात होत आहे. शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी निवडणूक लढवायचीच असा निर्धार करून मतदार संघातील प्रत्येक प्रभागात नियोजनबद्ध तयारी केली, विकास कामे केली. काँग्रेसमधून मात्र उमेदवारी कोणाला द्यायची हा घोळ माघारीच्या दिवसापर्यंत सुरू राहिला. शेवटी राजेश लाटकर सारख्या अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करण्याची वेळ आली. या पार्श्वभूमीवर येथील मतदार संपर्कात असलेल्या कार्यकर्त्याला मदत करतात की सर्वसामान्य कार्यकर्त्याला हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.राजेश क्षीरसागर यांची गत निवडणुकीत हॅटट्रिक चुकली. पराभव झाला म्हणून ते थांबले नाहीत. सामाजिक कार्यात, लोकांच्या संपर्कात राहिले. एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पराभव झाल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी क्षीरसागर यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद दिले. त्यामुळे त्यांच्यातील कार्यकर्त्याला बळ मिळाले. शहरासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु शिवसेनेत फूट पडली आणि राज्यातील सत्ता बदलली. त्यावेळी ते ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. सत्तेसोबत राहिल्याने त्यांचा नक्की फायदा झाला. कोल्हापूर शहरासाठी त्यांनी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेस पक्षातून आधी उमेदवारी जाहीर झालेल्या राजेश लाटकर यांना विरोध झाला. त्यामुळे पक्षाला त्यांची उमेदवारी बदलावी लागली. पक्षाची गरज म्हणून मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली. या गोंधळामुळे काँग्रेस पक्षात संशयकल्लोळ निर्माण झाला. पक्ष नेतृत्वावर त्याचा कमांड राहिला नाही. जो घोळ व्हायचा तो उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी कोल्हापूरकरांनी पाहिला. काँग्रेसचा उमेदवार ठरविताना पक्षाला बरेच धक्के बसले. क्षीरसागर यांचा प्रचार सुरू झाला असताना काँग्रेस पक्षात मात्र रुसवे -फुगवे काढण्यात, ताणतणाव शांत करण्यात, सहकारी पक्षांच्या नेत्यांची समजूत काढण्यात सगळा वेळ गेला. अजूनही काही आलबेल असल्याचे दिसत नाही.

प्रचारात क्षीरसागर यांच्यावर काही गंभीर आरोप होत आहेत. परंतु क्षीरसागर यांना हा काही नवीन अनुभव नाही. त्यांनी संयम सोडलेला नाही. ‘माझं काम बोलतंय’ हा त्यांचा दावा आहे. टीकेला उत्तर देण्यापेक्षा केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांना देण्यास सुरुवात केली आहे. प्रचाराचा त्यांचा हाच मुद्दा प्रभावी ठरत आहे. लाटकर यांच्यासमोर तर आत्ता काही सांगण्यासारखं नसलं तरी निवडून आल्यावर काय करणार हे सांगताना दिसत आहेत. रस्त्यावरील सर्वसामान्य, गरीब कुटुंबातील तत्वनिष्ठ उमेदवार अशी छबी निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे.

हा असा आहे फरक

  • क्षीरसागर यांचा मतदार संघात जनसंपर्क आहे. लाटकर यांच्यावर बऱ्याच मर्यादा आहेत.
  • क्षीरसागर यांच्याकडे विकास कामांचे आकडे आहेत तर लाटकर यांच्याकडे व्हीजन आहे. मंडळांना मदत केल्याने क्षीरसागर यांचा थेट संपर्क आहे.
  • लाटकर यांना मंडळापर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे.
  • क्षीरसागर यांच्याकडे राजकारणातील सर्व गुण आहेत, लाटकर यांच्याकडे सर्वसामान्य कार्यकर्ता ही बिरुदावली आहे. 

कोल्हापूर उत्तर मतदार संघ

  • एकूण मतदान - ३ लाख ०१ हजार ७४३
  • पुरुष मतदार - १ लाख ४८ हजार ८०९
  • महिला मतदार - १ लाख ५२ हजार ९१६
  • महापालिकेचे एकूण प्रभाग - ५४, संपूर्ण शहरी भाग.

२०१९ मध्ये काय घडलं?

  • स्व. चंद्रकांत जाधव - काँग्रेस (विजयी) - ९१ हजार ०५३
  • राजेश क्षीरसागर - शिवसेना - ७५ हजार ८५४
  • स्व. चंद्रकांत जाधव यांना १५ हजार १९९ चे मताधिक्य.

- २०२२ ला पोटनिवडणुकीत जयश्री जाधव ९७३३२ मते घेऊन विजयी- शाहू छत्रपती यांना लोकसभेला मिळालेले मताधिक्य -१३ हजार ८०८

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024