शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

महाराणी ताराबाई यांचा शौर्यशाली इतिहास जगासमोर येणे गरजेचे, डॉ. प्रा. जयसिंगराव पवार यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:43 IST

पन्हाळ्यात मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई विद्वत परिषद

पन्हाळा : महाराणी ताराबाई यांच्या राज्य कारभाराचा, त्यांनी गाजवलेल्या शौर्याचा इतिहास प्रसिद्धीपासून दूर आहे. तो महाराष्ट्रातच नाही, तर जगासमोर येणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. प्रा. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केले. ते राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे पन्हाळगडावर महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जन्म वर्षानिमित्त आयोजित मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई विद्वत परिषदेत बोलत होते. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे खा. शाहू छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन झाले.डॉ. प्रा. जयसिंगराव पवार म्हणाले की, छत्रपती ताराबाई यांचा उपेक्षित इतिहास जनतेसमोर नसल्याने मी तो मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आठशे पानांचा छत्रपती ताराबाईंचा इतिहास येत्या जानेवारीत न्यू पॅलेसमध्ये खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते प्रकाशन करणार आहोत. त्यातील प्रसंग सांगताना प्रा. पवार म्हणाले की, अमेरिकेतील रिचर्ड लॅटिन हे भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले होते. त्यांच्या भेटीत रिचर्ड लॅटिन म्हणतात की, संपूर्ण जगाच्या इतिहासात मध्ययुगीन काळातील कर्तृत्ववान महिला या एकमेव छत्रपती ताराबाई होत्या, पण त्यांचा इतिहास जगासमोर आला नाही.खासदार शाहू छत्रपती म्हणाले की, छत्रपती ताराबाई यांनी स्वराज्याचे रक्षण केले, हे महत्त्व महाराष्ट्रातील जनतेला अजूनही समजलेच नाही. मग जगासमोर कसे येणार. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या परिषदेबद्दल त्यांचे आभार मानतो. यावेळी शाहीर आझाद नायकवडी आणि सहकाऱ्यांनी पोवड्याचे सादरीकरण करून परिसर शिवमय केला होता.

ताराबाई यांचा पन्हाळगडावर पुतळा उभारावाछत्रपती ताराबाई यांचा पुतळा पन्हाळगडावर उभा करावा, ही मागणी पन्हाळ्यातील जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे केली. ती तत्काळ मान्य करत, त्यासाठी लागणारे निवेदन तयार करवून घेतले. त्या निवेदनावर पहिली सही त्यांनी स्वतः केली, तर दुसरी सही डॉ. प्रा. जयसिंगराव पवार यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhistoryइतिहास