शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापुराबाबत सामूहिक व्यवस्थापन हवे, मार्चमध्ये कोल्हापुरात जनपरिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 14:37 IST

या जनपरिषदेसाठी बाराही तालुक्यांत जनजागरण करण्यात येणार आहे. त्यांची मते ऐकून घेतली जाणार आहेत.

कोल्हापूर : अनेकांचे बळी घेणाऱ्या, कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या महापुराबाबत तात्पुरत्या मलमपट्ट्या उपयुक्त नाहीत. त्यासाठी विविध विभागांचा समन्वय साधणारे, कारणांच्या मुळाशी जाणारे आणि लोकप्रिय निर्णय न घेता निसर्गाची दखल घेणारे सामूहिक व्यवस्थापन आवश्यक आहे. यासाठी आम्ही सरकारशी संवाद साधणार आहोतच. परंतु जनजागरणाचा एक भाग म्हणून मार्चमध्ये कोल्हापुरात जनपरिषद घेणार असल्याची माहिती जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे आणि सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.‘जनआंदोलनाची संघर्ष समिती’ यांच्या वतीने याच विषयावर लक्ष्मीपुरीतील श्रमिक सभागृहात बैठक झाली. त्यामध्ये विविध विषयांतील तज्ज्ञांनी चर्चा केली.प्रदीप पुरंदरे म्हणाले, महापूर हा केवळ पावसामुळेच येत नाही. त्याला अनेक कारणे आहेत. परिस्थिती विसंगत होत निघाली आहे. महापुराची पूर्वसूचना, तात्पुरते स्थलांतर, नदीमध्ये गाळ कुठून येतो, तो काढायचा तर किती प्रमाणात काढायचा, पूररेषेतील बांधकामे अशा अनेक गोष्टींचा साकल्याने विचार करावा लागेल.

उल्का महाजन म्हणाल्या, महापुराबाबत शास्त्रीय उत्तरांचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. भांडवली आणि मानवी व्यवस्था यासाठी कारणीभूत आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत फिरून माहिती घेण्यात आली आहे. महापुराच्या कारणमीमांसेवर आधारित उपाययोजना करावी लागणार आहे. त्यामुळे मंत्री, जिल्हाधिकारी यांना भेटूनही आमची मते त्यांना सांगणार आहोत.

परिसरशास्त्राचे अभ्यासक डॉ. गुरुदास नूलकर म्हणाले, निसर्गाशी आणि नदीशी मानवी आचरण सुधारण्याची गरज आहे. आतापर्यंत जसे वागत आलो आहोत तसेच वागणार असू तर सत्यानाश अटळ आहे. भूगर्भशास्त्राचे अभ्यासक सिद्धार्थ पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या अवतीभोवती असलेल्या पाच जिल्ह्यांत हजाराहून अधिक ठिकाणी गेल्या पावसाळ्यात भूस्खलखन झाले आहे. याचा फक्त पावसाशी नाही, तर खडक रचनेशीही संबंध आहे.

महेश कांबळे म्हणाले, विकासाच्या योजनेमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचाही समावेश हवा. नवी आपत्ती टाळण्यासाठीचे नियोजन आवश्यक आहे. यावेळी दिलीप पवार, शिवाजीराव परूळेकर, अतुल दिघे, बाबूराव कदम, उदय गायकवाड, गिरीश फोंडे आणि अमोल कोरगावकर उपस्थित होते.

महापुराच्या काळात दरवाजा अडकला असता तर...

गेल्या डिसेंबरमध्ये राधानगरी धरणाचा दरवाजा अडकला आणि प्रचंड पाणी नदीतून वाहून गेले. नदीची पाणीपातळीही वाढली. हीच दुर्घटना जर भर पावसात महापुराच्या काळात झाली असती तर काय झाले असते, असा प्रश्न पुरंदरे यांनी यावेळी उपस्थित केला.

वडनेरे अहवालातील गंभीर मुद्द्यांचा विचार झाला नाहीवडनेरे समितीने जो अहवाल दिला त्यातील अनेक गंभीर मुद्द्यांचा विचार झालेला नाही. तत्कालीन राजकीय गरज म्हणून न पाहता वास्तव ओळखण्याची गरज आहे. अलमट्टीला तातडीने निर्दोष ठरवता येणार नाही, असेही पुरंदरे यांनी सांगितले.

गावोगावी जनजागरण

या जनपरिषदेसाठी बाराही तालुक्यांत जनजागरण करण्यात येणार आहे. त्यांची मते ऐकून घेतली जाणार आहेत. यानंतर मग कोल्हापुरात जनपरिषद घेण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. त्यानुसार आता प्रत्येक तालुक्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर