शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

'शक्तिपीठ' विरोधात पुन्हा एल्गार; कोल्हापूरसह १२ जिल्ह्यांत सोमवारी महाधरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 12:01 IST

संघर्ष समिती आक्रमक

कोल्हापूर : महायुती सरकार शक्तिपीठ महामार्गाला स्थगिती दिल्याचे सांगत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला सरकार मागच्या दाराने पर्यावरण विभागाकडे महामार्गाच्या मान्यतेचा प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. या विषयात अधिवेशन दरम्यान १५ दिवसांत लोकप्रतिनिधींची बैठक घेणार असल्याचे सरकारने सांगितले होते. मात्र, अजून ती बैठकही झालेली नाही. म्हणून पुन्हा एकदा शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीतर्फे महामार्ग जाणाऱ्या १२ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर १२ ऑगस्टला महाधरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. शक्तिपीठ महामार्गासाठी आग्रही असणारा सरकारचा लाडका ठेकेदार कोण ? याचा शोध घ्यावा लागणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.संघर्ष समितीतर्फे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग अनावश्यक आहे. यामुळे १२ जिल्ह्यांतील शेतकरी बाधित होणार आहेत. ठेकेदाराच्या हितासाठी हा महामार्ग रेटला जात आहे. विरोधानंतर सरकार आम्ही शक्तिपीठ महामार्ग लोकांना सोबत घेऊन करणार असल्याचे सांगते. मात्र, प्रत्यक्षात महामार्ग करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. म्हणून बाधित जिल्ह्यातील शेतकरी १२ रोजी समितीच्या नेतृत्वाखाली महाधरणे आंदोलन करतील. शक्तिपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. लढ्याची पुढील दिशा निश्चितीसाठी येथे राज्यव्यापी परिषद घेण्यासंबंधी विचारविनिमय सुरू आहे.पत्रकार परिषदेस गिरीश फोंडे, शिवाजी मगदूम, सम्राट मोरे, गोकुळ संचालक प्रकाश पाटील, के. डी. पाटील, शिवाजी कांबळे, प्रकाश पाटील, आनंदा पाटील, युवराज पाटील, नितीन मगदूम, तानाजी भोसले, युवराज शेटे, नवनाथ पाटील, कृष्णा भारतीय, श्रीपाद साळे, अजित बेले, आदी उपस्थित होते.

महाडिक लोकांसोबत नाहीतटोल माफी आंदोलनावरून माझ्यावर टीका करून आपण लोकांसोबत नाही हे दाखवून दिले, अशी टीका धनंजय महाडिक यांचे नाव न घेता आमदार पाटील यांनी केले. किणी टोल नाक्याची कागदपत्रे मिळाली की समजेल तो थर्ड पार्टी कोणाकडे चालवायला आहे, असेही सूचक विधान त्यांनी केले. टोल माफीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायचे हे सरकारचे चुकीचे धोरण आहे. आम्ही तिथे होतो आमच्यावर का गुन्हे दाखल केले नाहीत, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गcongressकाँग्रेसagitationआंदोलन