शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

Kolhapur: ३०० गणेश मंडळांकडून दणदणाट; आरोपपत्र केवळ ३८ मंडळांवरच..

By उद्धव गोडसे | Updated: July 28, 2025 17:35 IST

आश्चर्यकारक म्हणजे कोल्हापूर, इचलकरंजीतील एकाही मंडळावर आरोपपत्र दाखल नाही

उद्धव गोडसेकोल्हापूर : गणेशोत्सवाचे वेध सुरू होताच पोलिसांकडून मंडळांना आवाज मर्यादेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातात. उत्सवात आवाजाच्या नोंदी घेतल्या जातात. मात्र, मंडळांवर कारवाई होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. गेल्या वर्षी ३०० मंडळांनी आवाज मर्यादेचे उल्लंघन केले होते. त्यापैकी केवळ ३८ मंडळांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले. ठोस कारवाई होत नसल्याने मंडळे पुन्हा येरे माझ्या मागल्या, या म्हणीप्रमाणे डीजेचा दणदणाट करून पोलिसांना आव्हान देतात.गणेशोत्सवात आगमन मिरवणूक आणि विसर्जन मिरवणुकीत बहुतांश मंडळांकडून डीजेचा दणदणाट केला जातो. यातून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन होते. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून आवाजाच्या नोंदी घेतल्या जातात. गेली काही वर्षे हा नित्य क्रम बनला आहे. दरवर्षी कारवाया करण्याचा इशारा पोलिसांकडून दिला जातो आणि दरवर्षी ठराविक मंडळांकडून आवाज मर्यादेचे उल्लंघन केले जाते.गेल्या वर्षी पोलिसांनी जिल्ह्यातील ४७९ मंडळांच्या ध्वनी यंत्रणांची तपासणी केली होती. त्यातील ३०० मंडळांनी आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. या सर्व मंडळांवर ठोस कारवाई करणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. मात्र, केवळ ३८ मंडळांवर आरोपपत्र दाखल झाले. हे खटले सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत. कारवाईच होत नसल्याने अनेक मंडळे यंदा पुन्हा डीजेचा दणदणाट करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

निवडणुकांमुळे आवाज वाढण्याची शक्यताआगामी निवडणुकांमुळे इच्छुक उमेदवारांकडून मंडळांना आर्थिक रसद मिळण्याची शक्यता आहे. यामुळे मंडळांकडून डीजेचा दणदणाट वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे टाळण्यासाठी पोलिसांना सुरुवातीपासूनच ठोस भूमिका घ्यावी लागेल.राजकीय हस्तक्षेप टळणार का?मंडळांवरील कारवाया टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी पोलिसांवर दबाव टाकतात. राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर मर्यादा येतात. विधायक उत्सवासाठी राज्यकर्त्यांनी मतांचे राजकारण थोडे बाजूला ठेवल्यास पारंपरिक उत्सव शक्य आहे.

शहरातील एकाही मंडळावर कारवाई नाहीपोलिस ठाण्यांकडून कारवाईचे प्रस्ताव उपअधीक्षक कार्यालयाला पाठवले जातात. पडताळणी करून आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे म्हणणे घेऊन उपअधीक्षक कार्यालयाकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाते. जिल्ह्यात सर्वाधिक दणदणाट कोल्हापूर आणि इचलकरंजीत होतो. मात्र, या दोन्ही शहरांतील एकाही मंडळावर आरोपपत्र दाखल झालेले नाही.गडहिंग्लज उपविभागाचा पुढाकारगडहिंग्लज उपविभागाकडे ४४ प्रस्ताव आले होते. त्यापैकी सहा प्रस्ताव त्रुटींमुळे परत पाठवले. उर्वरित ३८ मंडळांवर त्यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आरोप सिद्ध झाल्यास तीन ते पाच वर्षांपर्यंत कारावास, एक लाखाचा दंड यापैकी एक किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

..या आहेत आवाजाच्या मर्यादापरिसर - डेसिबल

  • शांतता झोन - ४० ते ५०
  • रहिवासी क्षेत्र - ४५ ते ५५
  • व्यावसायिक - ५५ ते ६५
  • औद्योगिक - ७० ते ७५

उपअधीक्षकांकडून झालेल्या कारवायाविभाग - आवाज तपासणी - उल्लंघन - नोटिसा - आरोपपत्र दाखल

  • शहर - ६७ - ६७ - ६७ - ००
  • करवीर - १८८ - १२१ - ०० ००
  • शाहूवाडी - ०९ - ०९ - ०० - ००
  • इचलकरंजी - ०० - ०० - ०० - ००
  • जयसिंगपूर - १६१ - ४९ - ०० - ००
  • गडहिंग्लज - ५४ - ५४ - ३८ - ३८