शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

जिल्हा परिषदेचे साडे बत्तीस कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 13:25 IST

Flood Kolhapur Zp : महापुराच्या काळात जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचे ३२ कोटी ३७ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अजूनही काही ठिकाणचे पाणी पूर्ण ओसरले नसल्याने तेथील इमारतींचे किती नुकसान झाले हे निश्चित करता आलेले नाही. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचे साडे बत्तीस कोटींचे नुकसानमहापुराचा परिणाम, प्राथमिक अंदाज, आकडा वाढण्याची शक्यता

समीर देशपांडेकोल्हापूर : महापुराच्या काळात जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचे ३२ कोटी ३७ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अजूनही काही ठिकाणचे पाणी पूर्ण ओसरले नसल्याने तेथील इमारतींचे किती नुकसान झाले हे निश्चित करता आलेले नाही. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.गेल्या आठवड्यातील प्रचंड पावसामुळे जिल्ह्याला महापुराचा फटका बसला. यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिरोळ तालुक्यातील घालवाड आणि नृसिंहवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे प्रामुख्याने नुकसान झाले आहे. अरळगुंडी ता. गडहिंग्लज, असळज ता. गगनबावडा, उपकेंद्र पिपळे, केखले ता. पन्हाळा आणि आवळी बु. ता. राधानगरी या आरोग्य केंद्रांचे नुकसान झाले आहे.महापुराचा सर्वाधिक फटका जिल्हा परिषदेच्या रस्त्यांना बसला आहे. इतर जिल्हा आणि ग्रामीण मार्ग अशा ७० रस्त्यांचे नुकसान झाले असून याच्या दुरूस्तीसाठी १० कोटी रूपयांची गरज भासणार आहे. तर जि.प. कडील आणखी ३६ रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यासाठी ८ कोटी ६० लाख रूपयांची गरज भासणार आहे. जिल्ह्यातील १०४ शाळा आणि प्रशासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. यामध्ये शिरोळ तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या ठिकाणी ७१ शाळांना आणि पाच प्रशासकीय इमारतींना महापुराचा फटका बसला आहे.चौकटसात ठिकाणी कोसळली दरडराधानगरी तालुक्यातील पनोरी फेजिवडे, बाजरीचा धनगरवाडा, दुर्गमनवाड ते मिसाळवाडी रस्त्यावर दरड कोसळली आहे. तसेच पन्हाळा तालुक्यात बुधवारपेठ ते सुपात्रे रस्ता, म्हाळुंगे मसाई देवालय रस्ता, बोरपाडळे ते भाडळे रस्ता खचला आहे. गगनबावडा तालुक्यातील म्हासुर्ली, बावेलीपासून पुढे मिळणाऱ्या रस्त्यावर तर शाहूवाडी तालुक्यातील करंजफेण पाल सावर्डी ते इजोली आणि शाहूवाडी ते येळवडी रस्त्यावर दरड कोसळली आहे.अ.न. विभाग तपशील संख्या अंदाजे नुकसान१ ग्रामीण पाणी पुरवठा पा.पु.योजना ४८७ ९ कोटी ८० लाख२ बांधकाम रस्ते ७० १० कोटी, इमारती १०४ १ कोटी ६७ लाख३ मुख्य./प्रधानमंत्री सडक रस्ते ३६ ८ कोटी ६० लाख४ शिक्षण शाळा ९८ १ कोटी ९६ लाख५ अंगणवाडी इमारती १२ ९ लाख६ आरोग्य प्रा.आरोग्य केंद्रे,/उपकेंद्रे ५ १० लाख ६५ हजार७ पशूसंवर्धन पशूधन ६३ १५ लाख १३ हजारएकूण ३२ कोटी ३७ लाखसंपर्क तुटलेली गावे ४११

  • स्थलांतरित कुटुंब संख्या ३४ हजार २८६
  • स्थलांतरित लोकसंख्या १ लाख ५० हजार ६५७
  • नातेवाईकांकडे स्थलांतरित १ लाख २६ हजार ४५५
  • शासकीय निवारागृहे २९९
  • निवारागृहात स्थलांतरित १ लाख ६३ हजार ३९९
  • कोविड बाधित पूरग्रस्त निवारागृहे १९
  • दाखल कोविडबाधित पूरग्रस्त १२१
  • स्थलांतरित जनावरे ६१ हजार ७२०
  • बंद पडलेल्या पाणी योजना ४८७

शेतकऱ्यांच्या दक्षतेने वाचले पशूधनमहापुराचा अंदाज आल्यानंतर यंदा शेतकरी शांत बसले नाहीत. त्यांनी सुरक्षित ठिकाणी पशूधन नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर पशूधनाला महापुराचा फटका बसला नाही. जिल्ह्यातील ६० हजार ७९५ जनावरांना पशूपालकांनी महापुराआधीच सुरक्षित ठिकाणी हलवले होते. तर शिरोळ तालुक्यातील तीन आणि करवीर तालुक्यातील दोन अशा पाच छावण्यांमध्ये ९२५ पशूधन स्थलांतरित करण्यात आले.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी महापुराच्या बैठकांमध्ये चर्चा केली आहे. कोरोनामुळे एकीकडे जिल्हा परिषदेवरील कामाचा ताण वाढला आहे. अशातच महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे याबाबत शासनाकडून तातडीने निधी मिळवून देण्याची विनंती केली आहे. प्राधान्याने करावी लागणाऱ्या कामांची यादी तयार करण्यास सांगण्यात आले आहे.राहूल पाटील,अध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर

नुकसानीचा हा प्राथमिक अंदाज आहे. अजूनही काही गावातील पूर्ण पाणी ओसरले नाही. काही ठिकाणी जाता आलेले नाही. त्यामुळे आणखी काही दिवसांत नेमके किती नुकसान झाले हे निश्चित होईल. प्रशासकीय सुचनांप्रमाणे याचे अहवाल तयार करण्यात येत आहेत. त्यानुसार निधीची मागणी केली जाईल.-संजयसिंह चव्हाणमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर