शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
सरकारी कोट्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपले! IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही
4
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
5
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
6
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
7
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
8
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
9
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
10
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
11
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
12
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
13
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
14
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
15
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
17
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
18
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
19
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
20
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच

‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे कोल्हापूरात शानदार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 16:37 IST

ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी आपली गावे समृध्द झाली पाहिजेत. ती समृध्द झाली तरच गावाकडची ओढ वाढते. केवळ पोटाची भूक भागली म्हणजे विकास नव्हे तर मानसिक समाधानही महत्वाचे आहे. असे वैविध्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या सरपंच आणि पदाधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी ‘लोकमत’ ने आयोजित केलेला सरपंच अ‍ॅवार्ड उपक्रम ग्रामविकासाला बळ देणारा आहे असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे कोल्हापूरात शानदार वितरणगावे समृध्द झाली तरच गावाकडची ओढ वाढेल : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी आपली गावे समृध्द झाली पाहिजेत. ती समृध्द झाली तरच गावाकडची ओढ वाढते. केवळ पोटाची भूक भागली म्हणजे विकास नव्हे तर मानसिक समाधानही महत्वाचे आहे. असे वैविध्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या सरपंच आणि पदाधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी ‘लोकमत’ ने आयोजित केलेला सरपंच अ‍ॅवार्ड उपक्रम ग्रामविकासाला बळ देणारा आहे असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.‘बी. के. टी. टायर्स प्रस्तूत ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ वितरण सोहळा शुक्रवारी कोल्हापूरात व्ही. टी. पाटील सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ होते. ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. भालकर कला अकॅडमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या ‘गणेश वंदनाने पुरस्कार वितरर सोहळ्यास प्रारंभ झाला.मंत्री पाटील म्हणाले, समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर ‘लोकमत’ ने नेहमीच कौतुकाची थाप मारली. विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांना पुरस्काराच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते, त्यातूनच पोपरेवाडीच्या ‘राहीबाई’चे शेतीमधील काम संपुर्ण महाराष्ट्रासमोर आणले.

गेल्या दोन वर्षापासून सरपंच अवॉर्ड च्या माध्यमातून ग्रामपंचायतींना प्रोत्साहीत केले. गावांत सगळ्या सुविधा मिळाल्या तर शहराकडे होणारे स्थलांतर थांबेल. त्यादृष्टीने ग्रामपंचायतींनी वाटचाल ठेवावी. सरकारच्या वतीने अनेक योजना सुरू आहेत, पण योजना खेचून आणून प्रामाणिकपणे खर्च केला तर गावचा विकास होण्यास वेळ लागणार नाही.आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘लोकमत’ ने ग्रामपंचायती पासून संसदे पर्यंत चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचे काम केल्याने धन्यवाद देतो. पुरस्कारांमुळे ग्रामपंचायतींमध्ये इर्षा व स्पर्धा वाढेल आणि त्यातून गावांचा विकास वेगाने होईल. चौदावा वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना येतो, त्याचा विनियोग चांगला व्हायला पाहिजे. पण काही ठिकारी यावरून भांडणे होतात. ग्रामीण रस्ते चांगले नाहीत, अंतर्गत रस्ते चांगले नसल्याचे त्यांनी मंत्री पाटील यांना निदर्शनास आणून दिले.बीकेटी टायर्स अ‍ॅग्रो सेल्सचे राज्याचे प्रमुख जुबेर शेख म्हणाले, सरपंच अवॉर्डच्या माध्यमातून ग्रामीण भागात पोहचण्याची ‘लोकमत’ मुळे आम्हाला चांगली संधी मिळाली. बीकेटी जागतिक दर्जाची कंपनी असून १३० देशात निर्यात केली जाते. २७०० विविध श्रेणीमध्ये टायर बनविल्या जातात. व्यावसायिक टायर आम्ही बनवत नाही. एकूण उत्पन्नापैकी ३.७५ टक्के खर्च सामाजिक कामावर करतो. त्यातून दीड लाख महिला मोफत शिक्षण, दीड लाखांहून अधिक मुलांना दुपारची जेवण दिले जाते.‘लोकमत’ चे संपादक वसंत भोसले यांनी प्रास्ताविकात ‘लोकमत’ सरपंच अवॉर्ड मागील भूमिका विशद केली. यावेळी ‘लोकमत’ चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, ‘लोकमत’चे व्हाईस प्रेसिडंट (जाहीरात) अलोक श्रीवास्तव, राजेंद्र गंटे (तिरूपती टायर्स, गोकुळ शिरगाव), विजयराव मांगोरे (गोपाल टायर्स, मूरगूड), शशिकांत तेंडूलकर (तेंडूलकर टायर्स, कोल्हापूर), अशोक राजमाने (पार्श्व टायर्स, हालोंडी) आदी उपस्थित होते. मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी आभार मानले.यावेळी ‘सरपंच आॅफ दि इयर’ पुरस्काराने सांगरूळ (ता. करवीर)चे सरपंच सदाशिव खाडे, ‘उद्योन्मुख सरपंच’म्हणून सुभाष भोसले (पिराचीवाडी) यांच्यासह ‘जलव्यवस्थापन’ सागर माने (जाखले, पन्हाळा) , ‘वीज व्यवस्थापन’ वर्षा गायकवाड (आळवे, पन्हाळा), शैक्षणिक सुविधा (चेन्मेकुपी, गडहिग्लज), स्वच्छता ललिता बरगाले (नृसिंहवाडी), आरोग्य प्रकाश जाधव (पोर्ले, पन्हाळा), पायाभूत सेवा (विद्या संकेश्वरे, नांदणी), ग्रामरक्षण राजकुंवर पाटील (सरूड, शाहूवाडी), पर्यावरण संवर्धन अमरसिंह पाटील (तळसंदे, हातकणंगले), लोकसहभाग-ई लर्निंग उदय गीते (कबनूर, हातकणंगले), रोजगार निर्मिती रूपाली कांबळे (लोंघे, गगनबावडा), कृषी तंत्रज्ञान अशोक फराकटे (कसबा वाळवे, राधानगरी). 

 

टॅग्स :Lokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्kolhapurकोल्हापूर