शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Lokmat Kolhapur Maha Marathon 2018 : अंध अमरजितसिंग यांचा शतकोत्तर मॅरेथॉन धावण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 18:26 IST

दोन्ही डोळ्यांनी पूर्णत: दिसत नसतानाही नाशिक, औरंगाबाद व नागपूर येथे आयोजित केलेल्या लोकमत महामॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले ६२ वर्षांचे अमरजितसिंग चावला हे  रविवारी होणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटरच्या स्पर्धेत धावणार आहेत.

ठळक मुद्देअंध अमरजितसिंग यांचा शतकोत्तर मॅरेथॉन धावण्याचा निर्धार८३ अर्धमॅरेथॉन सहजरीत्या पूर्ण चावला यांचे १०१ अर्धमॅरेथॉन पूर्ण करणे लक्ष्य

कोल्हापूर : दोन्ही डोळ्यांनी पूर्णत: दिसत नसतानाही नाशिक, औरंगाबाद व नागपूर येथे आयोजित केलेल्या लोकमत महामॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले ६२ वर्षांचे अमरजितसिंग चावला हे  रविवारी होणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटरच्या स्पर्धेत धावणार आहेत.मूळचे मुंबईकर असलेल्या अमरजितसिंग चावला यांनी नागपूर येथे झालेली २१ किलोमीटर अर्धमॅरेथॉन पूर्ण करीत उपस्थितांचे लक्ष वेधले होते. वयाच्या ४९ व्या वर्षी अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यापासून त्यांनी आतापर्यंत ८३ अर्धमॅरेथॉन सहजरीत्या पूर्ण केल्या आहेत. यासह दहावेळा पुणे मॅरेथान व तीनवेळा अल्ट्रा रन (दीर्घ धावणे) पूर्ण तसेच ४९ वेळा १० किलोमीटर शर्यत पूर्ण करणारे चावला यांचे लक्ष्य १०१ अर्धमॅरेथॉन पूर्ण करणे हे आहे.बीब कलेक्शनसाठी आलेले चावला एस्कॉर्ट असलेले युवा लाझर नाडर व डॉ. अमितसिंग माने यांच्यासह कोल्हापुरात दाखल झाले. याबाबत बोलताना धावपटू चावला म्हणाले, कोल्हापुरातील ‘लोकमत’ची ही माझी ८४ वी मॅरेथॉन आहे. वयाच्या तेराव्या वर्षी ‘मॅकेलर डिजनरेशन’ या असाध्य आजाराने माझी दृष्टी कमी आली. त्यानंतर ४०व्या वर्षी मला दोन्ही डोळ्यांना दिसणे पूर्णत: बंद झाले. यावर मी जीवनात हरलो नाही.

आयुष्यात काहीतरी करण्यासाठी माझे मन मला काही स्वस्थ बसू देईना. २००५ साली वयाच्या ४९व्या वर्षी मी एका शर्यतीत सहभाग घेतला आणि ती पूर्णही केली. त्यानंतर मी मागे बघितले नाही. ‘लोकमत सर्किट रन’च्या रूपाने हा उपक्रम सर्वांना धावण्याची सवय लावण्यासारखा आहे. तुम्हीही सवय लावून घ्या. मला शंभरपेक्षा अधिक मॅरेथॉनमध्ये धावायचे आहे.

 

रन फॉर लाईफमाणसाच्या शरीराला व्यायाम नसेल तर त्याचे जीवन व्यर्थ आहे. परिणामी त्या व्यक्तीला अनेक व्याधींना सामोरे जावे लागते; म्हणून प्रत्येकाने जीवनात व्यायाम करणे आवश्यक नव्हे, तर सक्तीचे आहे. त्यात धावणे हा स्वस्तातील व्यायाम आहे. स्वास्थ्य उत्तम तर सर्व जीवन सुरळीत होते. त्यामुळे जगण्यासाठी धावणे आवश्यक आहे. ‘लोकमत महामॅरेथॉन’ ही करवीरकरांना मोठी पर्वणी ठरली आहे. हीच ‘लोकमत’ची क्रीडासंस्कृती चिरकाल राहो.-तिरूपती काकडे,अतिरिक्त पोलीस अधीक्षक 

 

टॅग्स :Lokmat Kolhapur Maha Marathon 2018लोकमत कोल्हापूर महामॅरेथॉन २०१८kolhapurकोल्हापूर