शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

Lok Sabha Election 2019 लोकशाही धोक्यात असल्याने आघाडीसोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 01:08 IST

हातकणंगले : शेतकऱ्यांच्या सर्वच प्रश्नांवर मोदी सरकारला घेरल्यामुळे दिल्लीवरून आदेश आल्याने शासकीय यंत्रणेला हाताशी धरून माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल करून ...

हातकणंगले : शेतकऱ्यांच्या सर्वच प्रश्नांवर मोदी सरकारला घेरल्यामुळे दिल्लीवरून आदेश आल्याने शासकीय यंत्रणेला हाताशी धरून माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल करून भाजपतील नेतेमंडळी माझ्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवत आहेत. सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी आहे. माझी चळवळ वंचित, दलित, शोषित आणि शेतकऱ्यांसाठी आहे. संविधान व लोकशाही धोक्यात असल्यामुळे मी महाआघाडीसोबत आहे, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.हातकणंगले येथील नेहरू चौकात आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील यांनी सहकाऱ्यांसह राजू शेट्टी यांना पाठिंबा जाहीर केला.खा. शेट्टी यांनी मोदी सरकारने कर्जमुक्ती, शेतकºयांच्या शेतमालाला हमीभाव यासह सर्वच शेतकºयांच्या प्रश्नांवर दिलेली आश्वासने पाळली नसल्यामुळे सर्व शेतकरी संघटना एकत्र करून आवाज उठवला म्हणून दिल्लीवरून आदेश आल्यामुळे भाजप नेते बिथरले आहेत. ते माझ्या चुका आणि हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. मात्र, ५६ पक्षांची आमची महाआघाडी माझ्या भक्कम पाठीशी आहे असे मत व्यक्त केले.प्रमोद पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लोकसभेमध्ये प्रथम राजू शेट्टी यांनी आवाज उठवला. शरद पवारांनंतर खासदार शेट्टी यांनीच शेतकºयांसाठी लढा उभा केला. शेतकरी जगला तर देश आहे. शेतकरी चळवळीचा नेता म्हणून आम्ही राजू शेट्टी यांच्याबरोबर राहणार असल्याचे सांगितले.यावेळी काँग्रेसचे राजू आवळे, हातकणंगलेचे माजी सरपंच अजित पाटील, गुंडा इंरकर, रोहीत मलमे, हातकणंगले तालुका काँग्रेस अध्यक्ष भगवान जाधव आदींनी मत व्यक्त केले. यावेळी भगवान काटे, राहुल आवाडे, संदीप कारंडे, अरुण जानेवकर, दीपक वाडकर, सुदेश मोरे, राजेश पाटील, जयकुमार कोले, बाळगोंडा पाटील, बाबासाहेब चौगुले, मिश्रीलाल जाजू, अ‍ॅड. सुरेश पाटील, आप्पा ऐडके, अमित पाटील, वैभव कांबळे आदी उपस्थित होते.भाजप सरकारची केवळ घोषणाबाजीकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे म्हणाले, भाजप सरकारविरुद्धजनतेच्या मनात प्रचंड चीड आहे. गोरगरिबांना पाच वर्षे कागदपत्रांसाठी रांगेत उभा केले. त्यामुळे जनता खवळून उठली आहे. हे सरकार घोषणाबाज आहे. थापा मारणारे आहे.सर्व पातळींवर अपयशी ठरलेले हे सरकार आता जाणार आहे. म्हणून जातीयवादी राजकारण सुरू आहे. मात्र, कष्टकºयांच्या चळवळीमध्ये रस्त्यावर उतरणाºया राजू शेट्टींसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी ताकतीने काम करत आहे. सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये इर्ष्या सुरू आहे ती कोणत्या मतदारसंघात राजू शेट्टींना लिड मिळणार यासाठी.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक