शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

Lok Sabha Election 2019 : अर्जासाठी कागदपत्रे जमवताना उमेदवारांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 13:33 IST

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास २८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे, विविध प्रकारचे ‘ना हरकत दाखले’ जमविण्यासाठी उमेदवारांची धावपळ उडाली आहे. खास विश्वासू माणसांकडे ही जबाबदारी सोपवून उमेदवार प्रचारात मग्न आहेत.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक: अर्जासाठी कागदपत्रे जमवताना उमेदवारांची दमछाकवकिलांच्या मदतीने अर्ज भरण्याची यंत्रणा कार्यान्वित

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास २८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे, विविध प्रकारचे ‘ना हरकत दाखले’ जमविण्यासाठी उमेदवारांची धावपळ उडाली आहे. खास विश्वासू माणसांकडे ही जबाबदारी सोपवून उमेदवार प्रचारात मग्न आहेत.

ही ‘खास यंत्रणा’ वकिलांच्या मदतीने अर्ज भरून घेण्यास व्यस्त असल्याचे दिसत आहे. यावर्षीपासून निवडणुकीपुरते उमेदवारांचे स्वतंत्र बँक खाते उघडणे आणि फौजदारी गुन्हे दाखल असल्याबद्दलच्या जाहिराती करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून आल्याने त्यासाठी धावाधाव सुरू आहे.पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यापासून ते मतदान होईपर्यंतच्या कालखंडात प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा असतो. निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार राहणार की जाणार हे ठरविणाऱ्या या टप्प्याची सार्वजनिक पातळीवर फारशी चर्चा होत नसली तरी यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असल्याने पडद्यामागे ही यंत्रणा राबताना दिसते.

अर्जात एकही त्रुटी राहिली तर छाननीत अर्ज बाद ठरू शकतो, यासाठी विरोधी गोटाकडून सर्व तयारी केली जात असल्याने डोळ्यांत तेल घालूनच हे काम करावे लागते. नामनिर्देशनचा अर्ज विहीत नमुन्यातच भरावा लागत असल्याने त्यात कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून उमेदवार सहसा वकिलांमार्फत अर्ज भरून घेतात.सहा पानांचा असलेल्या या अर्जातील एकही रकाना रिकामा ठेवून चालत नाही. निवडणुकीचा खर्च, कौटुंबिक, शैक्षणिक, गुन्हेगारी पार्श्वभूमी, संपत्ती यासंदर्भातील एकही माहिती लपवून ठेवून चालत नाही. त्यासाठी मूल्यांकन करणाऱ्यांचा आधार घेतला जातो.

उमेदवार व त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर असलेली जमीन व घराचे सध्याच्या रेडिरेकनरकडून मूल्यांकन करून घेतले तर बँक बॅलेन्सचे स्टेटमेंट जोडावे लागते. सोने असल्यास सध्याच्या दरानुसार मूल्यांकन करून घेतले जाते. या सर्वांची माहिती निवडणूक अर्जात भरावी लागते. हे सर्व करण्यासाठी चार-पाच हजाराचा खर्च येतो.

थकबाकी नसल्याचा दाखला अनिवार्यआयकर, वीज, पाणी, टेलिफोन, घरफाळा यांची कोणत्याही प्रकारची थकबाकी नसल्याचा ‘ना हरकत दाखला’ संबंधित संस्थांकडून घ्यावा लागतो. ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे, तेथील मतदार यादीत नाव आहे की नाही हे देखील पाहावे लागते.

उमेदवारांचे कारनामे जाहिरातीद्वारे उघड होणारगुन्हे दाखल आहेत अथवा नाहीत यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून ‘ना हरकत दाखला’ घ्यावा लागतो. गुन्हे असतील तर गुन्ह्याचा प्रकार टीव्ही, वृत्तपत्रे यात तीनवेळा जाहिरात देऊन त्याचे सार्वजनिकीकरण करावे लागते. देशभरातील गुन्हे तपासले जातात.

खुल्या प्रर्गासाठी २५ हजार रुपये व अनुसूचित जाती जमातीसाठी १२ हजार ५०० रुपये अनामत रक्कम अर्जासोबत भरावी लागते. एकूण मतांच्या एक षष्टमांश मते न पडल्यास ही अनामत रक्कम जप्त होते. मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवाराला एक सूचक तर अमान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवाराला १० सूचक द्यावे लागतात.

निवडणूक खर्चाची मर्यादा ७० लाख रुपये आहे. निवडणूक काळात तीनवेळा खर्चाचा तपशील निवडणूक विभागाकडे सादर करावयाचा आहे. प्रत्यक्षात एकेका उमेदवाराचा खर्च १५ कोटींवर जातो; पण ७० लाखांतच तो खर्च बसविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडे ‘खास यंत्रणा’ तैनात असते. यावेळी खर्चाच्या पडताळणीसाठी निवडणूक विभागात व्हीएसटी टीम करत आहे; पण त्यांना चकवा देणारी यंत्रणाही तितकीच तत्पर आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapurकोल्हापूर