शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

‘लॉकडाऊन’चे गांभीर्य नसणाऱ्या घटकांना सरळ करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:25 AM

कोल्हापूर : कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच पोलीस यंत्रणा जिवाची बाजी लावून रस्त्यावर उतरून सक्षमपणे कार्यरत आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून कडक लॉकडाऊनला ...

कोल्हापूर : कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच पोलीस यंत्रणा जिवाची बाजी लावून रस्त्यावर उतरून सक्षमपणे कार्यरत आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून कडक लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण काही घटकांकडून अद्याप लॉकडाऊन गांभीर्याने घेतला जात नाही, त्यांच्यावर कायद्याचा बडगा आणून त्यांनाही सरळ करणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

गेले तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन केले आहे. त्यासाठी तीन सत्रात पोलीस प्रामाणिकपणे बंदोबस्तात रस्त्यावर राहून कर्तव्य बजावत असल्याने अधीक्षक बलकवडे यांनी समाधान व्यक्त केले. कोरोनाला हरवण्यासाठी कडक लॉकडाऊनला नागरिकांचाही प्रतिसाद चांगला लाभत आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. घरातून बाहेर पडण्यासाठी पूर्णपणे निर्बंध असताना अद्याप मॉर्निंग वॉक व इव्हिनिंग वॉकच्या नावाखाली तसेच कुत्री घेऊन मिरवण्यासाठी रस्त्यावर फिरणाऱ्या घटकाने लॉकडाऊन अद्याप मनावर घेतल्याचे दिसत नाही. अशांवर कारवाईचे सत्र सुरू असले तरीही, त्यांच्यावर येथून पुढे आणखी तीव्र कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आता रात्री कठड्यावरील गप्पा नाहीत रंगणार

रात्रीच्यावेळी जेवल्यानंतर काही चौका-चौकात कठड्यावर गप्पा मारत बसणाऱ्यांनाही कायद्याचा बडगा दाखवून त्यांच्याही कृतीला चाप लावणार आहे.

दरम्यान, काही अल्पवयीन मुलांकडून अथवा सक्षम व्यक्तींकडूनही बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांची जाणून-बुजून चेष्टा-मस्करी करून त्यांना त्रास दिला जात आहे. अशांच्या कारवायांनाही लगाम घालण्याची वेळ आली आहे. अशा चेष्टा-मस्करी करणाऱ्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्यावर गुन्हे नोंदवणार असल्याचेही अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.