शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

जगणे कुलूप बंद-सांस्कृतिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:22 IST

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे सामाजिक-सांस्कृतिक-क्रीडा अशा क्षेत्रांत अलौकिक कार्य करणाऱ्या ...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे सामाजिक-सांस्कृतिक-क्रीडा अशा क्षेत्रांत अलौकिक कार्य करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीला मानाच्या राजर्षी शाहू पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा हा पुरस्कार वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक व प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर झाला आहे. मात्र, कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाने केवळ पुरस्काराची घोषणा केली, वितरणाचा कार्यक्रम झाला नाही.

--

सांस्कृतिक च‌ळवळींना ब्रेक गायन समाज देवल क्लब, भालजी पेंढारकर केंद्र, संस्कारभारती, करवीर नगर वाचन मंदिर, गुणीदास फौंडेशन, अंतरंग या सांस्कृतिक संस्थांसह कोल्हापुरात अनेक लहान मोठ्या संस्था व व्यक्ती वैयक्तिक पातळीवर गायन, वादन, नृत्यांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. उन्हाळ्यात शिबिर होतात. ही मेजवानी यंदा झालीच नाही.

--

विचारांचा जागर थांबला : शहरात पुरोगामी विचारांचा जागर करीत शहरात चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा मोठ्या प्रमाणात होतात. अवि पानसरे व्याख्यानमाला, तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमाला, वि. स. खांडेकर व्याख्यानमाला, दिगंबर जैन बोर्डिंग, राजर्षी शाहू व्याख्यानमाला असा विचारांचा जागर थांबला.

--

चित्र-शिल्पकलेचा कॅनव्हास सुना : कोल्हापूरला चित्र-शिल्पकलेची मोठी परंपरा असून, व्यावसायिक कलाकारांपासून ते हौशी कलेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंतची संख्या तीन हजारांवर आहे. गेली दहा महिने चित्र-शिल्प प्रदर्शन बंद आहेत.

--

महोत्सवांना ब्रेक

महिलांसाठी झिम्मा-फुगडी स्पर्धांसह कलागुण सादर करण्याची संधी, कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, गृहिणी-भगिनी महोत्सव, महिला मंडळांचे कार्यक्रम, ताराराणी महोत्सव, कलामहोत्सव, कृषी महाेत्सव, नवरात्रौत्सवात गरबा-दांडिया अशा विविध महोत्सवांनी कोल्हापूर कायम फुललेले असते. या महोत्सवांनाही यंदा ब्रेक लागला आहे.

---

गौरी-गणपती, दसरा, दिवाळीही थंड

श्रावणापासून सणांना सुरुवात होते तशी बाजारपेठेला उभारी मिळते. यंदा मात्र गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया, श्रावण, गौरी गणपती या काळात कोरोनाने थैमान घातल्याने लॉकडाऊनच सुरू होते. कोणालाही सणाचा आनंद लुटता आला नाही. नवरात्रौत्सवापासून रुग्णांची संख्या कमी होऊ लागली; पण लॉकडाऊनने नागरिकांचा आर्थिक कणाच मोडल्याने बाजारपेठेत शांतता होती. दिवाळीला मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर आले; पण ही खरेदी गरजेपुरतीच, पैसे हातचे राखूनच होती, पण आठ महिन्यांच्या तुलनेत व्यावसायिकांसाठी हेही तसे थोडके होते. गाठी-भेटी करायलाही लोक घाबरले.

--

पर्यटन थांबले

उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांनी कोल्हापूर हाऊसफुल्ल होते. मात्र, कोरोनामुळे अंबाबाई, जोतिबा मंदिरांसह पर्यटन स्थळेही बंद होती. दिवाळीनंतर धास्तीमुळे लोक पर्यटनासाठी बाहेर पडले नाहीत. स्थानिक पातळीपासून ते राज्यांतर्गत, देशातील विविध ठिकाणे व परदेशातील पर्यटनही थांबले.

--

--

लग्न-समारंभ ५० माणसात

विवाह सोहळा धुमधडाक्यात आणि अविस्मरणीय करण्यासाठी महिनोनमहिने तयारी केली जाते, यंदा मात्र लग्न असाे, वा बारसं, मुंज, स्वागत समारंभ असे सगळे कौटूंबिक सोहळे ५० माणसांच्या मर्यादेत करावे लागले, तेही अगदी साधेपणाने. ज्या कुटुंबांमध्ये हे शक्य नाही त्यांनी सगळे कार्यक्रम पुढे ढकलले.

--

जत्रा-यात्रा बंद

जिल्ह्यातील ग्रामीण भागात अगदी गावागावांमध्ये माही, स्थानिक देवतांच्या जत्रा, यात्रा मोठ्या प्रमाणात होतात. यंदा एकाही गावात अशा जत्रा, यात्रा झाल्या नाहीत. प्रतीकात्मक मंदिरात पूजा आणि घराघरांतच नैवेद्य दाखवून हा दिवस साजरा करावा लागला.

----

तिसरी घंटा वाजलीच नाही

कोरोनामुळे यंदा राज्य नाट्य स्पर्धा झालीच नाही, हौशी, व्यावसायिक, संस्कृत, हिंदी, संगीत नाटक, बाल नाट्य अशा वेगवेगळ्या विभागात ही स्पर्धा रंगते. यंदा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ही स्पर्धा न घेतल्याने नाट्य चळवळीची पिछेहाट झाली. दुसरीकडे नाट्यगृहांना ५० टक्के आसन क्षमतेची मर्यादा घालून नाट्य, सांगीतिक कार्यक्रम सादरीकरणाला परवानगी मिळाली असली तरी आर्थिक गणितात हे बसत नसल्याने अजूनही तिसरी घंटा वाजली नाही, आणि रंगमंचाचा पडदा उघडला नाही.

---