शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

राजकीय वादातून घटना : आरळे येथील खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 9:57 AM

यातील आरोपी सुरेश पाटील यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे न्यायालयात सिद्ध झाले; त्यामुळे न्यायालयाने पाटील यांना जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांचा तुरुंगवास अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास करवीरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांनी केला.

ठळक मुद्दे इतर आरोपी झाले निर्दोष

कोल्हापूर : आरळे (ता. करवीर) येथील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष असलेले पांडुरंग रामचंद्र देसाई (वय ५५) यांचा २१ फेबु्रवारी २००८ रोजी राजकीय वैमनस्यातून झालेल्या वादातून गोळीबार करून खून केल्याप्रकरणी आरोपी सुरेश भाऊसाो पाटील (वय ४३, रा. आरळे, ता. करवीर) यांना दोषी ठरवत गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. विठलानी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

गावातील सरपंच पदाची निवडणूक २००८ ला बिनविरोध झाली. त्या कारणाने भरत भाऊसाो पाटील व त्यांच्या गटातील कार्यकर्ते नाराज होते; त्यामुळे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हिंदुराव विष्णू पाटील व भरत पाटील या दोन राजकीय गटांमध्ये वैमनस्य झाले होते. या घटनेवरून २१ फेबु्रवारी २००८ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हिंदुराव पाटील यांच्या संस्थेच्या शाळेच्या पटांगणात भरत पाटील व त्यांच्या गटातील लोक काठ्या, कुºहाडी व तलवार, आदी शस्त्र घेऊन त्यांनी हिंदुराव पाटील गटातील लोक व संस्थेचे उपाध्यक्ष मृत पांडुरंग देसाई यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, सुरेश पाटील यांनी आपल्याकडील बंदुकीने पांडुरंग देसाई यांच्यावर गोळीबार केला. त्यात ते मृत झाले. त्यानंतर पोलिसांनी भरत पाटील यांच्यासह पांडुरंग दिनकर पाटील, बाजीराव निवृत्ती पाटील, तानाजी मारूती पाटील, नामदेव निवृत्ती पाटील (सर्व रा. आरळे) यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

यातील आरोपी सुरेश पाटील यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे न्यायालयात सिद्ध झाले; त्यामुळे न्यायालयाने पाटील यांना जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांचा तुरुंगवास अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास करवीरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांनी केला. सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी अन्य चार व वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. यासोबतच न्यायवैद्य प्रयोगशाळेचा बॅलेस्टिक अहवाल व सरकारी वकील अ‍ॅड. एन. बी. आयरेकर यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. इतर आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय