शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

गनिमी काव्याने सरकारला धडा शिकवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:21 IST

कोल्हापूर : पाऊस चांगला पडावा, पर्यावरण जपावे, जंगल वाढले पाहिजे म्हणून आम्हाला जंगलातून बाहेर काढले, शेतीला व पिण्यासाठी लोकांना ...

कोल्हापूर : पाऊस चांगला पडावा, पर्यावरण जपावे, जंगल वाढले पाहिजे म्हणून आम्हाला जंगलातून बाहेर काढले, शेतीला व पिण्यासाठी लोकांना मिळावे म्हणून धरणक्षेत्रातील नागरिकांना बाहेर काढले, पण पुनर्वसनही केले नाही. अनेक वर्षे आम्ही शांततेने आंदोलन केले. आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने आंदोलन करून सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी शपथ मंगळवारी प्रकल्पग्रस्तांनी अभयारण्याच्या ठिकाणी घेतली.

चांदोली अभयारण्य व वारणा धरणग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या २५ दिवसांपासून आंदाेलन सुुरू आहे. जिल्हाधिकारी पुनर्वसनाबाबत सकारात्मक असताना पुनर्वसनाशी संबंधित विभागांकडून या दिवसांत ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे जागतिक जल दिनाचे औचित्य साधून या अभयारण्यग्रस्तांनी हे अभिनव आंदोलन केले. यावेळी आजपर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलने केली व काही मागण्या मान्य करून घेतल्या; परंतु पुढल्या काळात जर आमचे प्रश्न सुटले नाहीत तर आम्ही गनिमी काव्याने सरकारला धडा शिकवू, अशी शपथ घेण्यात आली. यावेळी मारुती पाटील, भगवान काळे, अशोक पाटील, आनंदा आमकर, दगडू पाटील, सुरेश पाटील, पांडुरंग कोठारी, भगवान बोडके, शंकर पाटील, शामराव उंडे, शामराव पाटील उपस्थित होते.

--

फोटो नं २३०३२०२१-कोल-श्रमिक मुक्ती दल

ओळ : प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. याअंतर्गत बुधवारी अभयारण्याच्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांनी गनिमी काव्याने आंदोलन करण्याची शपथ घेतली.

--