शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

गनिमी काव्याने सरकारला धडा शिकवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:21 IST

कोल्हापूर : पाऊस चांगला पडावा, पर्यावरण जपावे, जंगल वाढले पाहिजे म्हणून आम्हाला जंगलातून बाहेर काढले, शेतीला व पिण्यासाठी लोकांना ...

कोल्हापूर : पाऊस चांगला पडावा, पर्यावरण जपावे, जंगल वाढले पाहिजे म्हणून आम्हाला जंगलातून बाहेर काढले, शेतीला व पिण्यासाठी लोकांना मिळावे म्हणून धरणक्षेत्रातील नागरिकांना बाहेर काढले, पण पुनर्वसनही केले नाही. अनेक वर्षे आम्ही शांततेने आंदोलन केले. आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने आंदोलन करून सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी शपथ मंगळवारी प्रकल्पग्रस्तांनी अभयारण्याच्या ठिकाणी घेतली.

चांदोली अभयारण्य व वारणा धरणग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या २५ दिवसांपासून आंदाेलन सुुरू आहे. जिल्हाधिकारी पुनर्वसनाबाबत सकारात्मक असताना पुनर्वसनाशी संबंधित विभागांकडून या दिवसांत ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे जागतिक जल दिनाचे औचित्य साधून या अभयारण्यग्रस्तांनी हे अभिनव आंदोलन केले. यावेळी आजपर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलने केली व काही मागण्या मान्य करून घेतल्या; परंतु पुढल्या काळात जर आमचे प्रश्न सुटले नाहीत तर आम्ही गनिमी काव्याने सरकारला धडा शिकवू, अशी शपथ घेण्यात आली. यावेळी मारुती पाटील, भगवान काळे, अशोक पाटील, आनंदा आमकर, दगडू पाटील, सुरेश पाटील, पांडुरंग कोठारी, भगवान बोडके, शंकर पाटील, शामराव उंडे, शामराव पाटील उपस्थित होते.

--

फोटो नं २३०३२०२१-कोल-श्रमिक मुक्ती दल

ओळ : प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. याअंतर्गत बुधवारी अभयारण्याच्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांनी गनिमी काव्याने आंदोलन करण्याची शपथ घेतली.

--