शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

एलईडी बल्ब बसविण्याचा प्रकल्प रद्द

By admin | Updated: January 1, 2015 00:13 IST

स्थायी समिती सभा : ‘बीओटी’ प्रकल्पांचे अपयशाचे खापर अधिकाऱ्यांच्या माथी, पाच तास अधिकाऱ्यांची खरडपट्टी

कोल्हापूर : केवळ उदासीनता, विकासकामांकडे दुर्लक्ष आणि टक्केवारीच्या प्रभावाखाली दबल्यामुळे शहरातील बीओटी प्रकल्प अपयशी ठरल्याचा ठपका महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर ठेवत आज, बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत अधिकाऱ्यांची तब्बल पाच तास चांगलीच खरडपट्टी करण्यात आली. तांत्रिकदृष्ट्या कोणतीही माहिती न दिल्यामुळे शहरात एलईडी बल्ब बसविण्याचा प्रकल्प आजच्या सभेत रद्द करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती सचिन चव्हाण होते. आजची सभा ही सभापती चव्हाण यांची अखेरची होती. त्यातच गेल्या वर्षभरातील विकासकामांचा मुद्देसूद पंचनामा करून अधिकाऱ्यांना फैलावर घेण्यात आले; त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली. काही अधिकारी तर ऐन थंडीतही घामाघूम झाले. शहरात राबविण्यात येत असलेला एकही बीओटी प्रकल्प सुरळीत सुरू नाही, हे अधिकाऱ्यांचे अपयश असल्याचा आरोप सभेत करण्यात आला. अधिकारी कामे करीत नसतील, जबाबदाऱ्या घेत नसतील आणि पालिकेचे हित सांभाळत नसतील तर त्यांना पगार तरी का द्यायचा, असा सवालही सभेत अनेक सदस्यांनी उपस्थित केला. शहरातील पावसाच्या पाण्याची निर्गत होण्यासाठी ज्या मोठ्या गटारी केल्या आहेत, त्यामध्ये गवत उगवले असून या गटारींची कामे निकृष्ट झाल्याचा आक्षेप यावेळी नोंदविण्यात आला. सध्या सुरू असलेल्या या कामांबरोबरच नगरोत्थान रस्त्यांच्या कामातही गोंधळ सुरू आहे. जर कन्सल्टंट नीट कामे करीत नसतील त्यांची बिले देऊ नका, अशी मागणीही यावेळी पुढे आली. गटारीच्या कामांची मूळ इस्टिमेट तपासून चौकशी करावी, अशी मागणीही झाली. थेट पाईपलाईन योजनेचे पितळही सभागृहात उघडे करण्यात आले. डीपीआर करणारी आणि योजनेची कन्सल्टंट एकच कंपनी कशी नेमली, अशी विचारणा झाली. वर्क आॅर्डर दिल्यानंतर अनेक तांत्रिक त्रुटी समोर आल्या आहेत. काही अडचणी आल्या आहेत. उद्या योजनेचे काम बंद पडले आणि नुकसान व्हायला लागले तर त्याला जबाबदार कोण ? असा सवालही अधिकाऱ्यांना केला.यावेळी झालेल्या चर्चेत सुभाष रामुगडे, दिगंबर फराकटे, शारंगधर देशमुख, राजेश लाटकर, सतीश लोळगे, राजू घोरपडे, आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)रिलायन्स, तापडियांचे करार तपासा