शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Kolhapur: थेट पाइपलाइनची चाचणी करताना गळती, अर्जुनवाडा फाट्याजवळ व्हॉल्व्ह तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 12:21 IST

मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले, शेतीचे नुकसान झाले

तुरंबे : कोल्हापूर शहरासाठीच्या काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेचे काम महिन्यात पूर्ण करण्यासाठी टेस्टिंग सुरू आहे. बुधवारी अर्जुनवाडा फाट्याजवळ एअर व्हॉल्व्हला भगदाड पडल्यामुळे रस्त्याच्या कडेला मोठा खड्डा पडून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. तसेच शेतीचे नुकसान झाले. हे पाहण्यासाठी कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.दिवाळीच्या आधीच काळम्मावाडी धरणाचे पाणी उपलब्ध होईल. धरणस्थळावरील जॅकवेलची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. बुधवारी पन्नास हॉर्स पॉवरच्या पंपाद्वारे जलवाहिनीत पाणी सोडून टेस्टिंगचे काम सुरू होते. अर्जुनवाडा फाट्याजवळ २८ किलोमीटरमध्ये काळम्मावाडीपासून जलवाहिनीत पाणी आले. सायंकाळी चारच्या सुमारास पाइपच्या एअर व्हॉल्व्हचे लॉक तुटल्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह पाइपमधून बाहेर पडत होता सुमारे ५० मीटर परिसरात पाण्याचे फवारे उडाले होते; तसेच त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला होता. घटनास्थळी पाइपला एअर व्हॉल्व्हसाठी पाइप कट करून ठेवली होती; परंतु त्याला वेल्ड मारली नव्हती. त्याच्यावर ठेवण्यात आलेला पत्रा व पत्र्यावर टाकलेला मुरूम पाण्याच्या दबावामुळे परिसरात विस्कटलेला होता. पाण्यामुळे सचिन केरबा पाटील या शेतकऱ्याच्या ऊस पिकाचे नुकसान झाले.जल अभियंता नेत्रदीप सरनोबत म्हणाले, ‘काळम्मावाडीच्या थेट पाइपलाइनचे टेस्टिंग सुरू आहे. इयर व्हॉल्व्ह कट झाल्यामुळे किलोमीटर २८ ते ३० च्या दरम्यान गळती झाली आहे. गळतीचा व्हॉल्व्ह बंद करण्यासाठी कर्मचाऱ्यांची टीम पाठवून दिली आहे.’

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी