शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांना कुरघोडीचे राजकारण अंगलट

By admin | Updated: May 6, 2015 00:17 IST

पाय खेचाखेची : आत्मपरीक्षणाची वेळ

गणपती कोळी - कुरुंदवाड -शिरोळ राजकीयदृष्ट्या सुज्ञ व क्रांतिकारी समजला जातो; मात्र ‘कोजिमाशि’ व ‘गोकुळ’च्या निवडणुकीत शिरोळ-हातकणंगले तालुक्यांतील सत्ताधारी व विरोधी उमेदवारांचा पराभव करण्यात दोन्ही तालुके पिछाडीवर राहिले आहेत. निर्णायक मतदार असतानाही एकमेकांचे पाय खाली खेचण्याच्या वृत्तीमुळे राजकारण अंगलट आले आहे. त्यामुळे या निकालावरून आता तरी पूर्वेकडील नेते, कार्यकर्त्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.शिरोळ तालुका सामाजिक, शैक्षणिकतेबरोबर राजकीयदृष्ट्या सुज्ञ व सक्षम ओळखला जातो. त्यामुळे निवडणुकीत कितीही जातीयवादी राजकारण झाले, धनशक्तीचा वापर झाला, तरी चांगल्या उमेदवाराला मतदान करून आपला स्वाभिमान राखला आहे. त्यामुळे तालुक्याचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. असे असतानाही ‘कोजिमाशि’ व ‘गोकुळ’ निवडणुकीतून जिल्ह्याच्या राजकारणात तालुका पिछाडीवर असल्याचे सिद्ध झाले आहे.‘कोजिमाशि’ निवडणुकीत सत्ताधारी दादा लाड यांच्या विरोधात राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने काट्याची टक्कर दिली. या निवडणुकीत हातकणंगले व शिरोळ तालुक्यात निर्णायक मतदार असल्याने दोन्ही आघाडीने सक्षम उमेदवार दिले होते. यामध्ये हातकणंगलेतून सत्ताधारीकडून धोंडिराम बाबर (रुकडी), संगीता मांगलेकर (मजले), तर विरोधी आघाडीतून सुरेश कोळी (इचलकरंजी) उमेदवार होते. शिरोळमधून सत्ताधारीकडून गौतम पाटील (कोथळी), आनंदराव काटकर (सैनिक टाकळी), तर विरोधी गटातून राजगोंडा झुणके (शिरदवाड), अशोक पलंगे (हेरवाड) हे उमेदवार होते.एकमेकांचे पाय ओढण्यात माहीर असलेले नेते, कार्यकर्त्यांच्या वृत्तीने या उमेदवारांचा बळी गेला. सत्ताधारी गटातील काटकरांचा निसटता विजय वगळता दोन्ही तालुक्यांतील दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांचा पराभव झाला. याउलट कोल्हापूर, कागल, भुदरगड भागांतील नेते कार्यकर्त्यांनी गट-तट विसरून दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांना मतदान करीत शिरोळ-हातकणंगले तालुक्याची जागाही आपल्याकडेच खेचत धूर्त राजकीय खेळी केली आहे.नेतृत्वही संपुष्टातगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत शिरोळ व हातकणंगले तालुक्यांना एक जागा देत सत्ताधाऱ्यांकडून दिलीप पाटील, तर विरोधी गटातून भीमगोंडा बोरगावे उमेदवार होते. दोन्ही तालुक्यांना मिळून एक उमेदवार असतानाही दोनही उमेदवारांचा पराभव करीत गोकुळमधील या तालुक्याचे नेतृत्वही संपुष्टात आले आहे.राज्याच्या, देशाच्या राजकारणात दबदबा निर्माण करणाऱ्या या तालुक्यांना जिल्ह्याच्या राजकारणात अपयश आले आहे.आतातरी शहाणपण शिकणार का ?खुन्नशी वृत्तीतून एकमेकांचे पाय खेचण्याच्या कुरघोडीने राजकारण तालुक्याच्या अंगलट आले. त्यामुळे या निकालातून तालुक्यातील नेते, कार्यकर्ते आतातरी शहाणपण शिकणार का, असा प्रश्न सामान्य लोक करीत आहेत.