शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Kolhapur: रात्री उशिरापर्यंत पार्ट्या, गोंधळ; जाब विचारल्याबद्दल राजेश क्षीरसागरांकडून शेजाऱ्याला दमदाटी

By उद्धव गोडसे | Updated: December 11, 2023 17:26 IST

मारहाणीचे चित्रीकरण व्हायरल, पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप

कोल्हापूर : शनिवार पेठेतील शिवगंगा संकुलच्या टेरेसवर रात्री उशिरापर्यंत दारुपार्ट्या करून गोंधळ घातल्याचा जाब विचारल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या मुलाने मारहाण केल्याचा आरोप या संकुलातील रहिवाशी राजेंद्र ज्ञानदेव वरपे (वय ५७) यांनी केला आहे. फ्लॅट सोडण्यासाठी क्षीरसागर कुटुंबाकडून दमदाटी सुरू असूनही, लक्ष्मीपुरी पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. याबाबत तातडीने गुन्हा दाखल न झाल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा वरपे कुटुंबीयांनी सोमवारी (दि. ११) पत्रकार परिषदेत दिला.वरपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी आमदार क्षीरसागर हे शिवगंगा संकुलातील पाचव्या मजल्यावर राहतात, तर याच संकुलात सहाव्या मजल्यावर वरपे कुटुंबीय राहते. गेल्या वर्षभरापासून क्षीरसागर यांच्याकडून संकुलाच्या टेरेसचा गैरवापर होत आहे. रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांसोबत दारूपार्ट्या रंगतात. याबद्दल तक्रारी केल्या असता, फ्लॅट सोडून दुसरीकडे निघून जा, असे सांगितले जाते. शुक्रवारी (दि. ८) रात्री उशिरापर्यंत टेरेसवर गोंधळ सुरू असल्याने राजेंद्र वरपे हे जाब विचारण्यासाठी टेरेसवर गेले.

त्यावेळी क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. त्याचवेळी माजी आमदार क्षीरसागर आणि त्यांचा मुलगा ऋतुराज यांनीही शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर वरपे फिर्याद देण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गेले. मात्र, पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेण्याऐवजी केवळ तक्रार अर्ज घेतला.पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्याचा राग मनात धरून रविवारी दिवसभर क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिल्याचा आरोप वरपे कुटुंबीयांनी केला आहे. फ्लॅटमधील विद्युत पुरवठा खंडित केला. सीसीटीव्ही कॅमे-यांची मोडतोड केली. विनयभंग केला. तसेच फ्लॅट सोडून निघून जाण्यासाठी दमदाटी केली. या प्रकारानंतर दाखल झालेल्या पोलिसांनी वरपे कुटुंबीयांना काही दिवसांसाठी इतरत्र राहण्यासाठी जाण्याची विनंती केली. त्यानुसार घाबरलेले वरपे शाहूपुरी येथील नातेवाईकांच्या घरी गेले.गेल्या सात-आठ महिन्यांपासून माजी आमदार क्षीरसागर यांच्याकडून सातत्याने दमदाटी होत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वरपे कुटुंबीयांनी केली आहे. अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेसाठी राजेंद्र वरपे, त्यांची पत्नी शुभांगी, मुलगी सिद्धी आणि मुलगा शौर्य यांच्यासह माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, धनंजय सावंत, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरCrime Newsगुन्हेगारी