शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी, सर्व्हेला येणाऱ्यांना ठोकून काढा - राजू शेट्टी 

By भीमगोंड देसाई | Updated: April 4, 2024 18:20 IST

गुळगुळीत भूमिकेपेक्षा आक्रमक व्हा, लढला तरच शेती वाचणार 

कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाप्रश्नी गुळगुळीत भूमिका घेवून चालणार नाही. आक्रमक होवून लढलो तर जमिनी वाचणार आहेत. महामार्गासाठी जमीन मोजणी आणि सर्व्हेसाठी येणाऱ्यांना ठोकून काढा, असा आदेश स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.या लढ्याचे नेतृत्व कोणीही करा मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवा. आमच्यावर तुडवायची, बडवायची जबाबदारी दिली तरी आम्ही ती पेलू. अस्वलाला केसाचा हिशोब नसतो. त्याप्रमाणे आता असलेल्या आमच्या कोर्ट, केसीसीमध्ये पुन्हा वाढ होतील. त्याचीही आमची तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीतर्फे आयोजित शेतकरी निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, माजी आमदार संजय घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.माजी खासदार शेट्टी म्हणाले, शक्तीपीठ महामार्गामुळे केवळ शेतकरीच उध्दवस्त होणर नाही तर नवीन होणारे पूल, बोगद्यामुळे कोल्हापूर, सांगलीसह अनेक गावांना पुराचा धोका निर्माण होणार आहे. म्हणून शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढ्यात शेतकऱ्यांसोबत सामान्य जनतेलाही सहभागी करून घ्यावे लागेल.आमदार पाटील म्हणाले, शक्तीपीठ महामार्गासाठी ८६ हजार रूपये खर्च करून शेतकऱ्यांना उध्दवस्त करण्याऐवजी हाच निधी पर्यटनस्थळाच्या विकासासाठी द्यावा. ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी हा रस्ता करण्यात येणार आहे. म्हणून हा महामार्ग रद्द होईपर्यंत एकजुठीने लढावे लागणार आहे. या महामार्गाला काँग्रेस पक्षाचाही तीव्र विरोध असेल.डॉ. पाटणकर म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाच्या दोन्ही बाजूला कॉरीडॉर होणार आहे. त्यामुळे आता सर्व्हे करण्यात येण्यापेक्षा अधिकची जमीन संपादीत होणार आहे. त्याला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखो शेतकऱ्यांचा मोर्चा काढू.माजी आमदार घाटगे म्हणाले, नागपुरातून लवकर दारू पिण्यासाठी गोव्याला जाण्यासाठी हा महामार्ग करण्यात येणार आहे. यातून विकास होणार नाही.यावेळी माजी आमदार संपत पवार, गिरीष फोंडे, विक्रांत पाटील, महादेव धनवडे, हिरालाल परदेशी, अंबरीश घाटगे, मच्छिंद्र मुगडे यांची भाषणे झाली. राजेंद्र गड्यान्नावर, संपत देसाई, बाबुराव कदम, प्रसाद खोबरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी