शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
4
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
5
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
6
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
7
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
8
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
9
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
10
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
11
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
12
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
13
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
14
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
15
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
16
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
17
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
18
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
19
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार

पन्हाळा तालुक्यातील नावलीत जमिन खचली, सहा कुटूंबांचे स्थलांतर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 3:50 PM

पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूस्खलन होत असल्याच्या तक्रारीनंतर आता पन्हाळा तालुक्यातील नावलीपैकी जांभळेवाडी या गावातील जमिनी खचत असल्यामुळे या गावातील सहा कुटूंबातील ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे. या कुटूंबांचे स्थलांतर करुन त्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्यात याव्यात असे आदेश पन्हाळ्याचे तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ठळक मुद्देपन्हाळा तालुक्यातील नावलीत जमिन खचलीसहा कुटूंबांचे स्थलांतर करण्याचे तहसिलदारांचे आदेश

कोल्हापूर : पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूस्खलन होत असल्याच्या तक्रारीनंतर आता पन्हाळा तालुक्यातील नावलीपैकी जांभळेवाडी या गावातील जमिनी खचत असल्यामुळे या गावातील सहा कुटूंबातील ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे. या कुटूंबांचे स्थलांतर करुन त्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्यात याव्यात असे आदेश पन्हाळ्याचे तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पन्हाळा तालुक्यातील नावलीपैकी जांभळेवाडी येथील जमिनीचा काही भाग खचलेला असल्यामुळे गावातील गट नंबर ३२५, ३२६, ३२७ आणि ३३८ या जमिनीमधील रहिवाशी असणाऱ्या कुटूंबांस धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात जांभळेवाडी येथील ग्रामस्थांनी तहसिलदारांकडे सूचना दिली होती. तहसिलदारांनी तत्काळ संबंधित तलाठ्यांना यासंदर्भात चौकशी करुन अहवाल देण्यास सांगितले होते. तलाठ्यांनी ८ जुलै रोजी प्रत्यक्ष पाहणी करुन या जमिनी खचत असल्याचा अहवाल तहसिलदारांकडे दिल्यानंतर या कुटूंबांचे स्थलांतर करण्याबाबतच्या सूचना पन्हाळा गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मौजे जांभळेवाडी येथे सर्जेराव आप्पाजी जांभळे, बाळू गणपती जांभळे, शिवाजी मारुती जांभळे, सुभाष मारुती जांभळे, पांडुरंग आप्पा जांभळे, आणि नामदेव आनंदा जाधव यांची घरे आहेत. अतिवृष्टीमुळे या जमिनी खचून या कुटूंबांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित कुटूुबांतील व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे आणि त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात आणि तसा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश पन्हाळ्याचे तहसिलदारांनी पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर