शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कुंभी कारखाना भक्कमच; पी.एन.पाटलांनी त्यांच्या कारखान्यात काय दिवे लावले?, चंद्रदीप नरकेंचा पलटवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 16:04 IST

चुकीचे बोल पण रेटून बोलण्याची प्रवृत्ती असलेल्या बाळासाहेब खाडेंनी राजीनामा तयार ठेवावा

राजाराम लोंढे कोल्हापूर : कुंभी-कासारी साखर कारखाना स्वर्गीय डी. सी. नरके यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच सुरू असून, कारखाना ‘सक्षम’ आहे. व्यक्तिद्वेषातून स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी चांगल्या कारखान्याची बदनामी सुरू असून, आरोप करणाऱ्यांच्या नेत्यांनी त्यांच्या कारखान्यात काय दिवे लावले, हे जनतेला चांगले माहिती आहे. त्यामुळे ‘कुंभी’ वाचविण्याची भाषा करणाऱ्यांनी आपल्या पायाखाली काय जळतं ते आधी पाहावे, असा पलटवार सत्तारूढ पॅनलचे नेते, कुंभी-कासारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केला.नरके म्हणाले, एकीकडे ‘कुंभी बचाव’ म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला कारखान्याला ऊस घालू नका म्हणून सांगायचे, हे कसले राष्ट्रीय नेते? साखर निर्यातीचा योग्य निर्णय आणि चांगल्या व्यवस्थापनामुळेच पंधरवड्याला उसाची बिले देतोय. २०१७-१८ मधील एफआरपीपेक्षा अधिकचे शंभर रुपये दिले. ज्यांनी हे पैसे दिले नाहीत, तीच मंडळी आता ‘कुंभी’ची मापे काढत आहेत.विराेधक सहा लाख एक हजार ३२२ क्विंटल साखर ठेवून सत्ता सोडल्याची वल्गना करतात. या साखरेचे मूल्यांकन ८६.६४ काटी होते आणि त्यावर ७९.३१ कोटी कर्ज काढले होते. इतर देणीसह २६.६६ कोटींचा संचित तोटा केल्यानेच सभासदांनी त्यांना घरी बसविले. या मंडळींची निम्म्यापेक्षा अधिक देणी आम्ही सत्तेवर आल्यावर भागवली. त्यांच्या काळात नक्त मूल्य उणे १७ कोटी होते. आता ते अधिक १८ कोटी आहे. यावरूनच कारखाना कोणी चांगला चालविला हे लक्षात येते.जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांची एफआरपीसाठी घेतलेली कर्जे ८० ते ५०० कोटींपर्यंत आहेत. साखरेचे दर वाढत जातील, तशी या कर्जांची परतफेड होते.‘वीज प्रकल्पातून ५.६६ कोटी नफा’कारखान्याचा सहवीज प्रकल्प व कारखाना आधूनिकीकरण करण्यासाठी ११२ कोटींचे कर्ज काढले. गेल्या नऊ वर्षांत या कर्जाची परतफेड करून ५.६६ कोटींचा नफा झाला. या नफ्यातूनच अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना एफआरपी देता आल्याचे नरके यांनी सांगितले.खाडेंनी राजीनामा तयार ठेवावाचुकीचे बोल पण रेटून बोलण्याची प्रवृत्ती असलेले बाळासाहेब खाडे यांनी ‘कुंभी’च्या कर्जाबाबत केलेले आरोप चुकीचे निघाले तर ‘गोकुळ’च्या संचालक पदाचा राजीनाम्याचा ‘पण’ केला आहे. हे आरोप खोटे असून, त्यांचा ‘पण’ लवकरच पूर्ण होणार असून, त्यांनी राजीनामा तयार ठेवावा, असा टोला चंद्रदीप नरके यांनी लगावला.‘कुंभी’ची पत म्हणूनच जिल्हा बँकेचे कर्जकुंभी कारखान्याच्या सांगण्यावरून नव्हे, तर आर्थिक पत असल्यानेच जिल्हा बँकेने कर्ज दिले. त्याचे हप्ते आम्ही वेळेत परतफेड केले. आमच्यावर बोलणाऱ्यांच्या नेत्यांच्या कारखान्याला दिलेल्या कर्जाची परतफेड कशी होते? हे तपासावे, असा टोला नरके यांनी लगावला.एक दिवस तुमचेही हात पोळतीलभावाभावात भांडणे लावून स्वत:ची राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे एक दिवस हात पोळणार आहेत. सत्तेसाठी खालच्या दर्जाचे राजकारण करणाऱ्यांना सभासद धडा शिकवतील, असे नरके यांनी सांगितले.यांच्या घरात ‘गोकुळ’चे कर्मचारी किती‘गोकुळ’मधील सत्तेचा वापर विधानसभा, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत करणाऱ्यांना नैतिक अधिकार काय? आमची मापे काढणाऱ्यांच्या घरात ‘गोकुळ’चे कर्मचारी किती? तेथील सत्ता राजकारणासाठी वापरली नाही काय? राजकीय सत्तेची सहकाराला जोड देऊन विकास करण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असतो, असे नरके यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक