शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

कुंभी कारखाना भक्कमच; पी.एन.पाटलांनी त्यांच्या कारखान्यात काय दिवे लावले?, चंद्रदीप नरकेंचा पलटवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 16:04 IST

चुकीचे बोल पण रेटून बोलण्याची प्रवृत्ती असलेल्या बाळासाहेब खाडेंनी राजीनामा तयार ठेवावा

राजाराम लोंढे कोल्हापूर : कुंभी-कासारी साखर कारखाना स्वर्गीय डी. सी. नरके यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच सुरू असून, कारखाना ‘सक्षम’ आहे. व्यक्तिद्वेषातून स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी चांगल्या कारखान्याची बदनामी सुरू असून, आरोप करणाऱ्यांच्या नेत्यांनी त्यांच्या कारखान्यात काय दिवे लावले, हे जनतेला चांगले माहिती आहे. त्यामुळे ‘कुंभी’ वाचविण्याची भाषा करणाऱ्यांनी आपल्या पायाखाली काय जळतं ते आधी पाहावे, असा पलटवार सत्तारूढ पॅनलचे नेते, कुंभी-कासारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केला.नरके म्हणाले, एकीकडे ‘कुंभी बचाव’ म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला कारखान्याला ऊस घालू नका म्हणून सांगायचे, हे कसले राष्ट्रीय नेते? साखर निर्यातीचा योग्य निर्णय आणि चांगल्या व्यवस्थापनामुळेच पंधरवड्याला उसाची बिले देतोय. २०१७-१८ मधील एफआरपीपेक्षा अधिकचे शंभर रुपये दिले. ज्यांनी हे पैसे दिले नाहीत, तीच मंडळी आता ‘कुंभी’ची मापे काढत आहेत.विराेधक सहा लाख एक हजार ३२२ क्विंटल साखर ठेवून सत्ता सोडल्याची वल्गना करतात. या साखरेचे मूल्यांकन ८६.६४ काटी होते आणि त्यावर ७९.३१ कोटी कर्ज काढले होते. इतर देणीसह २६.६६ कोटींचा संचित तोटा केल्यानेच सभासदांनी त्यांना घरी बसविले. या मंडळींची निम्म्यापेक्षा अधिक देणी आम्ही सत्तेवर आल्यावर भागवली. त्यांच्या काळात नक्त मूल्य उणे १७ कोटी होते. आता ते अधिक १८ कोटी आहे. यावरूनच कारखाना कोणी चांगला चालविला हे लक्षात येते.जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांची एफआरपीसाठी घेतलेली कर्जे ८० ते ५०० कोटींपर्यंत आहेत. साखरेचे दर वाढत जातील, तशी या कर्जांची परतफेड होते.‘वीज प्रकल्पातून ५.६६ कोटी नफा’कारखान्याचा सहवीज प्रकल्प व कारखाना आधूनिकीकरण करण्यासाठी ११२ कोटींचे कर्ज काढले. गेल्या नऊ वर्षांत या कर्जाची परतफेड करून ५.६६ कोटींचा नफा झाला. या नफ्यातूनच अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना एफआरपी देता आल्याचे नरके यांनी सांगितले.खाडेंनी राजीनामा तयार ठेवावाचुकीचे बोल पण रेटून बोलण्याची प्रवृत्ती असलेले बाळासाहेब खाडे यांनी ‘कुंभी’च्या कर्जाबाबत केलेले आरोप चुकीचे निघाले तर ‘गोकुळ’च्या संचालक पदाचा राजीनाम्याचा ‘पण’ केला आहे. हे आरोप खोटे असून, त्यांचा ‘पण’ लवकरच पूर्ण होणार असून, त्यांनी राजीनामा तयार ठेवावा, असा टोला चंद्रदीप नरके यांनी लगावला.‘कुंभी’ची पत म्हणूनच जिल्हा बँकेचे कर्जकुंभी कारखान्याच्या सांगण्यावरून नव्हे, तर आर्थिक पत असल्यानेच जिल्हा बँकेने कर्ज दिले. त्याचे हप्ते आम्ही वेळेत परतफेड केले. आमच्यावर बोलणाऱ्यांच्या नेत्यांच्या कारखान्याला दिलेल्या कर्जाची परतफेड कशी होते? हे तपासावे, असा टोला नरके यांनी लगावला.एक दिवस तुमचेही हात पोळतीलभावाभावात भांडणे लावून स्वत:ची राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे एक दिवस हात पोळणार आहेत. सत्तेसाठी खालच्या दर्जाचे राजकारण करणाऱ्यांना सभासद धडा शिकवतील, असे नरके यांनी सांगितले.यांच्या घरात ‘गोकुळ’चे कर्मचारी किती‘गोकुळ’मधील सत्तेचा वापर विधानसभा, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत करणाऱ्यांना नैतिक अधिकार काय? आमची मापे काढणाऱ्यांच्या घरात ‘गोकुळ’चे कर्मचारी किती? तेथील सत्ता राजकारणासाठी वापरली नाही काय? राजकीय सत्तेची सहकाराला जोड देऊन विकास करण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असतो, असे नरके यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक